AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काँग्रेस नेत्यांनी भाजपला हाताशी धरुन पत्र लिहिल्याचे राहुल गांधी म्हणालेच नाहीत : गुलाम नबी आझाद

काँग्रेस पक्षाच्या पुनर्रचनेबाबत 23 नेत्यांनी सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रानंतर आज (24 ऑगस्ट) पक्षाच्या कार्यकारीणीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली (Ghulam Nabi AZad on Rahul Gandhi statement).

काँग्रेस नेत्यांनी भाजपला हाताशी धरुन पत्र लिहिल्याचे राहुल गांधी म्हणालेच नाहीत : गुलाम नबी आझाद
| Updated on: Aug 24, 2020 | 5:13 PM
Share

नवी दिल्ली : “काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षाच्या काही नेत्यांनी भाजपशी हातमिळवणी करुन काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र पाठवलं, असं वक्तव्य खासदार राहुल गांधी यांनी केलंच नाही”, असा खुलासा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी ट्विटरवर केला आहे (Ghulam Nabi AZad on Rahul Gandhi statement).

“काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत झालेल्या चर्चेबाबत काही माध्यमांनी चुकीची माहिती दिली आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपला हाताशी धरुन काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिलं, असं काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणालेच नाहीत. बैठकीत किंवा बैठकीबाहेर कुठेही त्यांनी अशाप्रकारचं वक्तव्य केलेलं नाही”, असं गुलाम नबी आझाद म्हणाले (Ghulam Nabi AZad on Rahul Gandhi statement).

“काँग्रेसमधील आमच्याच काही सहकाऱ्यांनी आमच्यावर काल गंभीर आरोप केले होते. भाजपला हाताशी धरुन आम्ही सोनिया गांधी यांना पत्र पाठवले, असा आरोप काही सहकाऱ्यांनी केला होता. त्यांनी हे आरोप सिद्ध केले तर मी काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा देईन, असं मी बैठकीत म्हणालो”, असं स्पष्टीकरण गुलाम नबी आझाद यांनी दिलं.

काँग्रेस पक्षाच्या पुनर्रचनेबाबत 23 नेत्यांनी सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रानंतर आज (24 ऑगस्ट) पक्षाच्या कार्यकारीणीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत प्रचंड घमासान झाल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी बैठकीदरम्यान थेट ट्विट करत ‘राहुल गांधी यांनी आमच्यावर भाजपशी हातमिळवणी केला, असा आरोप केल्याचं म्हटलं. मात्र, थोड्यावेळाने त्यांनी ते ट्विट मागे घेतलं.

संबंधित बातमी : CWC Meeting | भाजपसोबत हातमिळवणीचे आरोप, राहुल गांधींवर भडकलेले कपिल सिब्बल पुन्हा शांत

Follow Us
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.
शिंदेंच्या काळात नगरविकास खात्यात मोठा भ्रष्टाचार, राऊतांचे थेट आरोप
शिंदेंच्या काळात नगरविकास खात्यात मोठा भ्रष्टाचार, राऊतांचे थेट आरोप.
मुंबई, पुण्यावरही 'अवकाळी'ची अवकृपा, पुढील 24 तास धोक्याची...
मुंबई, पुण्यावरही 'अवकाळी'ची अवकृपा, पुढील 24 तास धोक्याची....
राऊतांचा मोठा दावा शिंदे-अजित पवार गटातील 25-30 आमदार भाजपच्या वाटेवर?
राऊतांचा मोठा दावा शिंदे-अजित पवार गटातील 25-30 आमदार भाजपच्या वाटेवर?.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि प्रफुल पटेल यांची दिल्लीत तासभर चर्चा
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि प्रफुल पटेल यांची दिल्लीत तासभर चर्चा.
NCP मध्ये पत्राचं वादळ, सुनेत्रा पवारांची पटेल-तटकरेंवर नाराजी
NCP मध्ये पत्राचं वादळ, सुनेत्रा पवारांची पटेल-तटकरेंवर नाराजी.