AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CWC Meeting | भाजपसोबत हातमिळवणीचे आरोप, राहुल गांधींवर भडकलेले कपिल सिब्बल पुन्हा शांत

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या बैठकीत पत्र लिहिणाऱ्या नेत्यांवर भाजपसोबत हातमिळवणीचे आरोप लावले.

CWC Meeting | भाजपसोबत हातमिळवणीचे आरोप, राहुल गांधींवर भडकलेले कपिल सिब्बल पुन्हा शांत
Nupur Chilkulwar
Nupur Chilkulwar | Updated on: Aug 24, 2020 | 2:25 PM
Share

नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाच्या पुनर्रचनेबाबत 23 नेत्यांनी लिहिलेल्या पत्रानंतर (Kapil Sibal Angry On Rahul Gandhi) आज पक्षाच्या कार्यकारीणीची बैठक पार पडली. काँग्रेसच्या कार्यकारीणीच्या बैठकीत चंगलंच घमासान झालं. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या बैठकीत पत्र लिहिणाऱ्या नेत्यांवर भाजपसोबत हातमिळवणीचे आरोप लावले. त्यावरुन काँग्रेसचे वरिष्ठ नेते कपिल सिब्बल आणि गुलाम नबी आझाद राहुल गांधीवर नाराज झाले. बैठकीदरम्यान ट्विट करत कपिल सिब्बल यांनी त्यांची नाराजी व्यक्त केली (Kapil Sibal Angry On Rahul Gandhi) होती. मात्र, त्यानंतर त्यांनी हे ट्विट मागे घेतलं.

“राहुल गांधी म्हणाले, ‘आम्ही भाजपसोबत हातमिळवणी केली’, मी राजस्थान उच्च न्यायालयात काँग्रेसचा योग्य पक्ष मांडला. मणिपूरमध्ये भाजपला खाली खेचलं, पक्षाला वाचवलं. गेल्या 30 वर्षात भाजपच्या बाजूने एकही असं वक्तव्य केलं नाही, ज्यामुळे भाजपला फायदा होईल. तरीही आम्ही भाजपसोबत हातमिळवणी केली, असं म्हटलं जात आहे”, असं ट्विट करत कपिल सिब्बल यांनी राहुल गांधींवरील नाराजी व्यक्त केली होती.

Kapil Sibal Angry On Rahul Gandhi

या ट्विटनंतर कपिल सिब्बल यांनी आणखी एक ट्विट केलं. राहुल गांधींनी स्वत: सांगितलं की त्यांनी अशा शब्दांचा वापर केला नाही. त्यामुळे मी माझं आधीचं ट्विट काढतो आहे.

त्याशिवाय, बैठकीला उपस्थित गुलाम नबी आझाद म्हणाले, “जर कुठल्याही प्रकारे माझा भाजपशी संबंध सिद्ध झाला, तर मी राजीनामा देऊन काँग्रेसच्या सर्व पदांचा त्याग करेन. पत्र लिहिण्याचं कारण काँग्रेसची कार्यकारिणी होती”.

कपिल सिब्बल आणि गुलाम नबी आझाद हे त्या 23 नेत्यांपैकी आहेत, ज्यांनी काँग्रेस पक्षाच्या पुनर्रचनेबाबत पत्र लिहिलं होतं. या पत्रात काँग्रेसच्या नेतृत्त्वाबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. सध्या पक्षाला अशा नेतृत्त्वाची गरज आहे जो पूर्णवेळ पक्षाला देऊ शकेल, अशी मागणी या पत्रात करण्यात आली होती.

काँग्रेस कार्यकारीणीच्या सोमवारी (24 ऑगस्ट) झालेल्या बैठकीत या पत्रावरुन घमासान पाहायला मिळालं. सोनिया गांधीनी देखील याच पत्राचा संदर्भ देत त्यांच्या राजीनाम्याचा प्रस्ताव दिला. तसेच, राहुल गांधींनी देखील या पत्रावरुन अनेक प्रश्न उपस्थित केले. “हे पत्र आताच का लिहिलं गेलं? जेव्हा आपण मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये लढत आहोत आणि सोनिया गांधींची प्रकृती ठीक नाही, अशा वेळीच हे पत्र का लिहिल्या गेलं”, असा सवाल राहुल गांधींनी या बैठकीत उपस्थित केला.

Kapil Sibal Angry On Rahul Gandhi

संबंधित बातम्या :

CWC Meeting : पक्षाच्या कार्यकारणीची आज बैठक, काँग्रेसची धुरा कोणाच्या हातात? काँग्रेस नेत्यांचं मत काय?

महाराष्ट्र काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर, गांधी घराण्याच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना सुनील केदारांकडून इशारा

…त्यानंतर राहुल गांधींनी अध्यक्षपद स्वीकारावं : बाळासाहेब थोरात

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक