AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MVA : एकनाथ शिंदेंचे आरोप बिनबुडाचे, कोणत्याही आमदाराची सुरक्षा काढलेली नाही, गृहमंत्री वळसे पाटलांचं स्पष्टीकरण

एकनाथ शिंदे यांनी आज आपली आणि आपल्या कुटुंबियांची सुरक्षा काढून घेण्यात आल्याचा आरोप ट्विटच्या माध्यमातून केला आहे.

MVA : एकनाथ शिंदेंचे आरोप बिनबुडाचे, कोणत्याही आमदाराची सुरक्षा काढलेली नाही, गृहमंत्री वळसे पाटलांचं स्पष्टीकरण
| Edited By: | Updated on: Jun 25, 2022 | 12:37 PM
Share

मुंबईः शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या आमदारांचं संरक्षण महाविकास आघाडी सरकारने काढल्याचा आरोप बिनबुडाचा आहे. या आमदारांची कोणत्याही प्रकारची सुरक्षा काढलेली नाही, असं स्पष्टीकरण गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी दिलं आहे. आज सकाळीच बंडखोर आमदार एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी 37 आमदारांच्या स्वाक्षऱ्या असलेलं एक पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना सादर केलं. यात महाविकास आघाडी सरकारने आमची आणि आमच्या कुटुंबियांची सुरक्षा काढून घेतली आहे. केवळ राजकीय आकसापोटी असं राजकारण केलं जात असल्याचा आरोप एकनाथ शिंदे यांनी केलाय. ट्विटरच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारवर आरोप केला. मात्र एकनाथ शिंदेंचे आरोप खोटे असल्याचा दावा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केलाय.

एकनाथ शिंदेंचा आरोप काय?

राजकीय आकसापोटी आमदारांचे संरक्षण मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या आदेशाने काढून घेण्यात आले आहे. त्यांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारची आहे, असा आरोप एकनाथ शिंदे यांनी ट्विटरच्या माध्यमातून केलाय. तर मागील अडीच वर्षांपासून महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडून आमचं याच पद्धतीनं खच्चीकरण सुरु असल्याचंही शिंदे यांनी म्हटलं.

गृहमंत्र्यांनी आरोप फेटाळले

एकनाथ शिंदे यांनी केलेले आरोप खोटे आहेत. शिवसेनेतून बाहेर पडलेल्या आमदारांचं संरक्षण सरकारतर्फे काढून घेण्यात आलेलं नाही, असं स्पष्टीकरण महाराष्ट्राचे गृहमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलंय.

संजय राऊत म्हणतात… कुटुंबाला सुरक्षा नसतेच!

दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनीदेखील एकनाथ शिंदेंच्या आरोपावर प्रतिक्रिया दिली. महाराष्ट्राच्या आमदारांना सुरक्षा असते, मात्र ती फक्त राज्यात असते. ते इतर राज्यात गेल्यावर संरक्षण देण्याची जबाबदारी महाराष्ट्र सरकारची नाही. तसंच आमदारांच्या कुटुंबियांनाही संरक्षण नसतं, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची आज महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत बंडखोर आमदारांवर पुढे काय कारवाई होणार, यावर निर्णय घेतला जाईल.

Follow Us
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.