AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाकरे सरकारच्या पूरस्थिती हाताळण्याचं मूल्यमापन आता करणार नाही, पण…; फडणवीसांनी दिला इशारा

मी आता ठाकरे सरकारच्या पूरस्थिती हाताळण्याचं मूल्यमापन करणार नाही. पण पूरग्रस्तांसाठी मदत जाहीर झाल्यानंतर नक्कीच बोलेन, अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला इशारा दिला आहे. (devendra fadnavis)

ठाकरे सरकारच्या पूरस्थिती हाताळण्याचं मूल्यमापन आता करणार नाही, पण...; फडणवीसांनी दिला इशारा
devendra fadnavis
| Edited By: | Updated on: Jul 30, 2021 | 5:03 PM
Share

कोल्हापूर: मी आता ठाकरे सरकारच्या पूरस्थिती हाताळण्याचं मूल्यमापन करणार नाही. पण पूरग्रस्तांसाठी मदत जाहीर झाल्यानंतर नक्कीच बोलेन, अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला इशारा दिला आहे. (i will talk,but after maharashtra government relief package announcement, says devendra fadnavis)

कोल्हापुरातील पूरस्थितीची पाहणी केल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी हा इशारा दिला. मी आता ठाकरे सरकारच्या पूरस्थिती हाताळण्याचं मूल्यमापन करणार नाही. ही ती वेळ नाही. आता पहिल्यांदा त्यांनी मदत घोषित केली पाहिजे. एकदा मदत घोषित केली तर मूल्यमापन नाही, पण ती मदत योग्य आहे की अयोग्य आहे या संदर्भातील भावना मी व्यक्त करेल, असं फडणवीस म्हणाले.

दर पाच वर्षांनी निकष बदल नाहीत

एनडीआरएफचे निकष बदलण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्रं लिहिल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होतं. त्यावरही फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मोदी सरकारनेच हे निकष बदलले आहे. हे निकष इतके वर्ष तसेच होते. 2015 साली निकष बदलले. नव्या निकषाने मदत सुरू केली. दर पाच वर्षांनी निकष बदलत नसतात. पण केंद्राने निकष बदलले तर चांगलं होईल. केंद्राकडे तशी मागणी करता येईल, असं सांगतानाच पण निकष तोकडे होते. ते बदलून दुपटीने मदत देण्याचे निकष मोदी सरकारनेच तयार केले हेही अधोरेखित केलं पाहिजे, असंही ते म्हणाले.

पॅकेज म्हणा काही म्हणा, मदत द्या

पॅकेज असो की घोषणा, सामान्य माणसाला पैसे मिळणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री त्याला काहीही म्हणू देत, पण त्यांना मदत जाहीर करा, असं फडणवीस म्हणाले. मी पॅकेज जाहीर करणारा मुख्यमंत्री नाही तर मी मदत करणारा मुख्यमंत्री आहे. मी ह्याच्या आधी देखील सांगितलं आहे की, मी सवंग लोकप्रियतेसाठी कोणतीही घोषणा करणार नाही. मपण सगळ्या पूरग्रस्तांना मदत नक्की करेन, असा पुनरुच्चार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोल्हापुरात बोलताना केला. त्यावर फडणवीसांनी टोला हा लगावला.

सरसकट भिंत बांधणं अयोग्य

सरसकट भिंत बांधणं किती योग्य आहे हे माहीत नाही. अर्थात शासनाने काही सांगितलं असेल. किंवा मुख्यमंत्र्यांनी काही अभ्यास केला असेल. पण पूर संरक्षक भिंत काही ठरावीक ठिकाणी बांधता येते. ती काही चीनच्या भिंती सारखी सरसकट बांधता येत नाही. त्यामुळे ती नेमकी कुठे बांधता येईल याचा विचार करावा लागेल. पूर संरक्षक भिंत बांधणं ही अनेक उपाययोजनांपैकी एक असू शकते. ती विविक्षित भागात होऊ शकते. ती सरसकट बांधता येत नाही. माझं जे छोटं ज्ञान आहे, त्यानुसार सरसकट भिंत बांधणं योग्य होणार नाही. त्यावर सरकार अभ्यास करेल, असं फडणवीस म्हणाले. (i will talk,but after maharashtra government relief package announcement, says devendra fadnavis)

संबंधित बातम्या:

पूर संरक्षक भिंत चीनच्या भिंतीसारखी सरसकट बांधता येणार नाही, फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना टोला

पूरग्रस्तांचं कर्ज माफ करा, नियमित कर्ज भरणाऱ्यांचे 50 हजार रुपये तातडीने द्या; देवेंद्र फडणवीस यांची मागणी

पाचच मिनिटं एकत्र भेटले; देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना काय सांगितलं?

(i will talk,but after maharashtra government relief package announcement, says devendra fadnavis)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.