AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देवेंद्र फडणवीस शिवसैनिक असतील, तर त्यांनी शिवसेनेत प्रवेश करावा : बच्चू कडू

जर देवेंद्र फडणवीस शिवसैनिक असतील तर त्यांनी शिवसेनेत प्रवेश करावा आणि यावर तोडगा काढावा, असा टोलाही बच्चू कडू यांनी (Bacchu kadu on Cm devendra fadnavis) लगावला.

देवेंद्र फडणवीस शिवसैनिक असतील, तर त्यांनी शिवसेनेत प्रवेश करावा : बच्चू कडू
| Updated on: Nov 07, 2019 | 5:09 PM
Share

मुंबई : “शिवसेनेत सर्व वाघाचे बछडे आहे. त्यामुळे शिवसेना का घाबरेल” अशी प्रतिक्रिया शिवसेनेला पाठिंबा दिलेल्या प्रहार जनशक्तीचे आमदार बच्चू कडू यांनी (Bacchu kadu on Cm devendra fadnavis) दिली. उद्या काही जण शरद पवारही शिवसैनिक आहेत असं म्हणतील. जर देवेंद्र फडणवीस शिवसैनिक असतील तर त्यांनी शिवसेनेत प्रवेश करावा आणि यावर तोडगा काढावा, असा टोलाही बच्चू कडू यांनी लगावला.” शिवसेनेने मातोश्रीवर आयोजित केलेल्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीदरम्यान माध्यमांशी बोलतानाही ही प्रतिक्रिया (Bacchu kadu on Cm devendra fadnavis) दिली.

“शिवसेना बकरी होऊन नाही तर वाघाचे बछडे होऊन समोर जात आहे. वाघाला फोडण्याची ताकद सध्या तरी कोणाकडे नाही. असेही बच्चू कडू म्हणाले. शिवसेना भाजपमध्ये 50-50 हा कळीचा मु्दा बळला आहे. याचे पुरावे शिवसेनेकडे आहेत. त्यांनी जर हे वचन दिले असेल, तर मग त्यात मुख्यमंत्रीपदही येते. त्यामुळे भाजप जर बोलल्याप्रमाणे करत नसेल, तर ती फसवतं आहे, अशी टीकाही बच्चू कडू यांनी केली.”

“जर भाजपकडून नरेंद्र मोदी हे पंतप्रधान आहेत. तर मग मुख्यमंत्री शिवसेनेचा असायला काहीच हरकत नाही. भाजपला एवढं ताणून ठेवण्याची गरज नव्हती. जे काही 50-50 चं ठरलं आहे, ते त्यांनी द्यावे असेही बच्चू कडू (Bacchu kadu on Cm devendra fadnavis) म्हणाले.”

“मी शेतकऱ्यांसाठी मातोश्रीवर आलो आहे. युतीचा पेच सोडवण्याइतका आमचा आकडा मोठा नाही. राजकारणात फोडाफोडी होत असते, त्यामुळे शिवसेनेला घाबरायची गरज नसल्याचेही ते म्हणाले.”

“कोण मुख्यमंत्री होणार कोण मंत्री होणार याविषयी सध्या महत्त्वाचा नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत जाहीर होणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे भाजपने मोठा भाऊ समजून शिवसेनेला पुढाकार समजून मुख्यमंत्री पद द्यावे, असेही ते म्हणाले.”

“तुम्हाला जी काही तोडफोड करायची असेल ती नंतर करा. पण पहिला शेतकरी वाचणं महत्त्वाचे आहे. सद्यस्थितीत सरकारची स्थापना होणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही, तर राज्यपालांकडे मोर्चा काढू अशा इशारा देखील बच्चू कडू यांनी यावेळी दिला. माझ्याासाठी शेतकरी महत्त्वाचा आहेत. त्यानंतर पक्षाचे पाहू असेही बच्चू कडू यांनी ठणकावून सांगितले.”

ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.