AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या तारखेपर्यंत पावसाची पहावी लागणार वाट, त्यानंतर मध्य भारतात पावसाच्या सरी बरसणार

राज्यात आता अनेक ठिकाणी अवर्षणाची स्थिती आहे. पावसाने ओढ दिल्याने बळीराजा चिंतेत सापडला आहे. असे असताना आता हवामान खात्याने एक गुड न्यूज दिली आहे.

या तारखेपर्यंत पावसाची पहावी लागणार वाट, त्यानंतर मध्य भारतात पावसाच्या सरी बरसणार
monsoon
| Updated on: Sep 08, 2026 | 3:33 PM
Share

राज्यात पावसाने अनेक जिल्ह्यात दडी मारली आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. पिके पाण्याअभावी पिवळी पडत असल्या पाऊस केव्हा परतणार याची शेतकरी वाट पाहात असताना आता नागपूर सह संपूर्ण विदर्भात येत्या ११ तारखेपर्यंत पावसाची प्रतिक्षा करावी लागणार आहे. आता ११ तारखेनंतर बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवण्यात आली आहे.

नागपूर सह संपूर्ण विदर्भात पावसाने ओढ दिल्याने बळीराजा चिंतेत आहे. बळीराजाची पिके पाण्याअभावी वाळली जात आहे. सोयाबिन आणि इतर पिकांवर मोठा परिणाम झाला आहे. त्यात आता हवामान खात्याने वर्तवलेल्या भविष्यानुसार आता येत्या 11 तारखेपर्यंत पावसाची वाट पाहावी लागणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. 11 तारखे नंतर बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन विदर्भात सर्वत्र ढगाळ वातावरण होईल असे हवामान खात्याने म्हटले आहे. यात आता दिलासादायक बाब म्हणजे 12 ते 14 सप्टेंबरला विदर्भातील काही जिल्ह्यात मुसळधार तर काही जिल्ह्यात साधारण पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

तापमानात होणार वाढ

सध्या 11 तारखे पर्यंत पावसाचा अंदाज असला तरी तापमानात मात्र वाढ होण्याची शक्यता आहे. विदर्भात तापमानात साधारणतः 3 ते 4 अंश सेल्सियस पर्यंत वाढ होऊन तापमान 32 अंश पर्यंत पोहचण्याचा अंदाज आहे. विदर्भात साधारणतः 30 टक्के पर्यंत पावसाची तूट निर्माण झाली असून कमी पावसामुळे ही तूट सध्या तरी भरून निघण्याचा शक्यता दिसत नाही असे नागपूर हवामान विभागाचे संशोधक डॉ.प्रवीण कुमार यांनी म्हटले आहे.

येथे पोस्ट वाचा –

सप्टेंबर अखेर पाऊस परतणार

भारतीय हवामान खात्याच्या मॉडेलनुसार, महाराष्ट्राच्या काही भागांसह मध्य भारतातील काही क्षेत्रांमध्ये पावसाचा पुढील चांगला टप्पा (good spell) १३ ते १५ सप्टेंबरच्या सुमारास येण्याची शक्यता आहे वर्तवण्यात आली आहे. यात राज्याच्या अंतर्गत भागांना लाभ होण्याची शक्यता आहे. सप्टेंबरच्या उत्तरार्धातही पावसाची चांगली सक्रियता दिसून येऊ शकते असे हवामान खात्याने म्हटले आहे.

Follow Us
शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! कांद्याला मिळतोय विक्रमी भाव; पिंपळगावात...
Onion Price Hike | शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! कांद्याला मिळतोय विक्रमी भाव; पिंपळगावात 6600, तर लासलगावात दर किती?
दहीहंडीत महिलांना नाचवणारे देशद्रोही! संभाजी भिडेंचा संताप
Sambhaji Bhide | दहीहंडीत महिलांना नाचवणारे देशद्रोही! संभाजी भिडेंचा संताप; हिंदू सणांमधून डॉल्बी-डीजे हद्दपार करण्याची केली मागणी
आता शिष्टमंडळ पुन्हा चर्चेला जाणार नाही! विखे-पाटलांचा जरांगेंना संदेश
Radhakrishna Vikhepatil | आता शिष्टमंडळ पुन्हा चर्चेला जाणार नाही! राधाकृष्ण विखे-पाटलांचा जरांगेंना स्पष्ट संदेश
पाऊस गायब अन् धरणं कोरडी पडू लागली! मराठवाड्यात दुष्काळाचं सावट
Water Shortage | पाऊस गायब अन् धरणं कोरडी पडू लागली! मराठवाड्यात दुष्काळाचं सावट; शेतकऱ्यांसमोर मोठं संकट
संतोष पंडित प्रकरणात नवा ट्विस्ट! महिलेच्या समर्थनार्थ नागरिक एकवटले
Pune Protest | संतोष पंडित प्रकरणात नवा ट्विस्ट! तक्रारदार महिलेच्या समर्थनार्थ नागरिक एकवटले; ट्रोलर्सविरोधात कठोर कारवाईची मागणी
लाडक्या बहिणींना ओवाळणी मिळाली अन्... वाघ यांचा पटोलेंवर घणाघात
Chitra Wagh | लाडक्या बहिणींना ओवाळणी मिळाली अन् सावत्र भावाच्या... चित्रा वाघ यांचा नाना पटोलेंवर घणाघात
मराठा आरक्षणावर मुनगंटीवारांचा मोठा दावा; खासदारांना काय केलं आवाहन?
Sudhir Mungantiwar | मराठा आरक्षणावर सुधीर मुनगंटीवारांचा मोठा दावा; खासदारांना काय केलं आवाहन?
बिनबुडाचं गाडगं... बिना पेंदे का लोटा! सदावर्तेंनी जरांगेंना डिवचलं
बिनबुडाचं गाडगं... बिना पेंदे का लोटा! गुणरत्न सदावर्तेंनी जरांगेंना डिवचलं
नरेंद्र मोदी हे गुजरातचे पंतप्रधान आहेत का? संजय राऊतांचा थेट सवाल
Sanjay Raut | नरेंद्र मोदी हे गुजरातचे पंतप्रधान आहेत का? संजय राऊतांचा थेट सवाल; पुढे म्हणाले, देशाचे कॅबिनेट...
श्वेता महालेंना प्रत्युत्तर देताना संजय गायकवाडांची जीभ घसरली! म्हणाले
Sanjay Gaikwad | श्वेता महालेंना प्रत्युत्तर देताना संजय गायकवाडांची जीभ घसरली! म्हणाले...