AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

औरंगाबाद जिल्हा बँक निवडणुकीत हरिभाऊ बागडेंचा पराभव!, ‘गड आला पण सिंह गेला’ – अब्दुल सत्तार

माजी विधानसभा अध्यक्ष आणि बँकेचे संचालक असलेले हरिभाऊ बागडे यांना पराभवाचा धक्का बदलाय. या निवडणुकीत अनेक अनपेक्षित निकाल पाहायला मिळत आहेत.

औरंगाबाद जिल्हा बँक निवडणुकीत हरिभाऊ बागडेंचा पराभव!, 'गड आला पण सिंह गेला' - अब्दुल सत्तार
औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत हरिभाऊ बागडे यांचा पराभव
| Updated on: Mar 22, 2021 | 4:10 PM
Share

औरंगाबाद : जिल्हा बँक निवडणुकीचा धक्कादायक निकाल समोर आला आहे. माजी विधानसभा अध्यक्ष आणि बँकेचे संचालक असलेले हरिभाऊ बागडे यांना पराभवाचा धक्का बदलाय. या निवडणुकीत अनेक अनपेक्षित निकाल पाहायला मिळत आहेत. जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील मोठं नाव असलेल्या बागडेंचा पराभव हा जिल्ह्याच्या राजकारणाचं बदललेलं वार असल्याचं बोललं जात आहे. (Haribhau Bagade lost, independent candidate Abhishek Jaiswal won)

जिल्हा बँक निवडणुकीत बागडे यांच्या पॅनलचा मात्र दणदणीत विजय झाला आहे. मात्र स्वत: बागडे यांना पराभवाचा सामना करावा लागलाय. अपक्ष उमेदवार अभिषेक जैस्वाल यांनी बागडे यांचा पराभव केलाय. बागडे यांना एकूण 123 मतं मिळाली, तर जैस्वाल यांना 147 मतं पडली. त्यामुळे जैस्वाल यांनी 24 मतांनी बागडे यांचा पराभव केला आहे. बिगर शेती संस्थेच्या विभागातून बागडे यांचा पराभव झाला आहे.

हरिभाऊ बागडे यांच्यासह अभिजित देशमुख यांनाही पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर अपक्ष उमेदवार अभिषेक जैस्वाल आणि जगन्नाथ काळे विजयी झाले आहेत. मतमोजणीदरम्यान बागडे हे मतमोजणी केंद्रावर आले होते. पण पराभवाची चाहूल लागताच ते माघारी परतले.

गड आला पण सिंह गेला – सत्तार

दरम्यान, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलच्या सर्वाधिक जागा निवडून आल्या आहेत. मात्र, बँकेचे जुने जाणते संचालक हरिभाऊ बागडे यांचा पराभव झाला आहे. बागडे यांच्या पराभवावर राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘गड आला पण सिंह गेला’ असं अब्दुल सत्तार यांनी म्हटलंय.

मतदान केंद्राबाहेर राज्यमंत्री अब्दुल सत्तारांचा पारा चढला!

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीसाठी 21 मार्च रोजी मतदान पार पडलं. त्यावेळी मतदान केंद्राबाहेर एक पोलीस कर्मचारी आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्यात शाब्दिक चकमक पाहायला मिळाली. पोलीस कर्मचाऱ्याने अब्दुल सत्तार यांना बाजूला थांबायला सांगितलं. त्यावरुन सत्तार यांनी मतदान केंद्राबाहेर चांगलाच गोंधळ घातल्याचं सांगितलं जात आहे. क्रांती चौकातील मतदान केंद्रावर तब्बल अर्धा तास हा गोंधळ सुरु होता. तर विरोधी पॅनलच्या लोकांकडून पैसे घेतल्याचा आरोप राज्यमंत्र्यांनी केला. त्यावर संतापलेल्या पोलिसांनी सत्तार यांना उत्तर दिलं. त्यानंतर बराच वेळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.

इतर बातम्या :

VIDEO | शिवसेना पदाधिकाऱ्याचा प्रेयसीच्या घरी गळफास, चंद्रकांत खैरेंची महिला पोलीस निरीक्षकाशी खडाजंगी

Aurangabad Lockdown : औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय, शहरातील हॉटेल्स बुधवारपासून बंद!

Haribhau Bagade lost, independent candidate Abhishek Jaiswal won

Follow Us
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया.
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान.
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका.
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका.
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता.
नाथषष्ठी सोहळा: पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या उत्सवाला सुरुवात
नाथषष्ठी सोहळा: पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या उत्सवाला सुरुवात.
बच्चू कडूंचा सरकारला दुपारी ४ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम; काय घडलं?
बच्चू कडूंचा सरकारला दुपारी ४ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम; काय घडलं?.
प्री-ओपनिंगमध्ये शेअर बाजारात मोठी घसरण!
प्री-ओपनिंगमध्ये शेअर बाजारात मोठी घसरण!.
भारत तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषक विजेता! पंतप्रधानांनी केलं अभिनंदन
भारत तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषक विजेता! पंतप्रधानांनी केलं अभिनंदन.