AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

INS Vikrant Case : ‘किरीट सोमय्या पळपुटं नेतृत्व नाही, ते चौकशीला सामोरं जातील’, प्रवीण दरेकरांचं वक्तव्य, सरकारवर निशाणा

सोमय्या यांच्यावरील आरोपांबाबत आता भाजप नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिलीय. किरीट सोमय्या हे पळपुटं नेतृत्व नाही, ते चौकशीला सामोरं जातील, असं दरेकर म्हणाले.

INS Vikrant Case : 'किरीट सोमय्या पळपुटं नेतृत्व नाही, ते चौकशीला सामोरं जातील', प्रवीण दरेकरांचं वक्तव्य, सरकारवर निशाणा
प्रवीण दरेकर, किरीट सोमय्याImage Credit source: TV9
| Updated on: Apr 12, 2022 | 3:54 PM
Share

मुंबई : आयएनएस विक्रांत (INS Vikrant) घोटाळा प्रकरणात भाजप नेते आणि खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) गायब आहेत. मात्र, आज जामीन अर्ज फेटाळण्यात आल्यानंतर ते पहिल्यांदाच सोशल मीडियावर समोर आले. या घोटाळा प्रकरणात आपण उच्च न्यायालयात जाणार असून तिथे आपली बाजू मांडणार असल्याचं सोमय्या यांनी सांगितलं. इतकंच नाबी तर नुसते हवेतील आरोप करण्यात आले आहेत. या संपूर्ण गोष्टी कोर्टासमोर मांडणार असल्याचं सांगतानाच ठाकरे सरकारमधील घोटाळेबाजांना धडा शिकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा सोमय्या यांनी दिला आहे. सोमय्या यांच्यावरील आरोपांबाबत आता भाजप नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी प्रतिक्रिया दिलीय. किरीट सोमय्या हे पळपुटं नेतृत्व नाही, ते चौकशीला सामोरं जातील, असं दरेकर म्हणाले.

प्रवीण दरेकर यांना मुंबई बँक बोगस मजूर प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा देत अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केलाय. त्यानंतर दरेकर माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांना किरीट सोमय्या यांच्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी दरेकर म्हणाले की, ‘किरीट सोमय्या हा एक धाडसी नेता आहे. आपण बघाल तर तो कशाचीही पर्वा न करता, राज्यात जे जे घोटाळे झाले ते महाराष्ट्रासमोर आणले आहेत. इतकंच नाही तर भ्रष्टाचाऱ्यांना शिक्षा होण्यापर्यंत त्यांनी पुरावेसुद्धा दिलेले आहेत. ज्यावेळेला आपण इतरांवर आरोप करतो तेव्हा आपल्याला पळायचं काही कारण नाही. किरीट सोमय्या कुठेही पळून जाणार नाहीत. किरीट सोमय्या पोलीस चौकशीला निश्चितपणे सामोरे जातील. हा मला पूर्ण विश्वास आहे. ते काही पळपुटं नेतृत्व नाही’.

किरीट सोमय्या यांची भूमिका काय?

सोमवारी कोर्टाने किरीट सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. त्यानंतर सोमय्या नॉट रिचेबल झाले होते. त्यांच्या पत्नीच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यालाही ते उपस्थित राहिले नव्हते. त्यांचा फोनही लागत नव्हता. त्यातच या प्रकरणावर एकाही भाजप नेत्याने प्रतिक्रिया न दिल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात होतं. त्यानंतर आज सोमय्या यांनी एका व्हिडीओद्वारे आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सरकारने विक्रांत 60 कोटीला भंगारवाल्यांना विकण्याचा निर्णय घेतला होता. भाजपने त्याचा निषेध नोंदवला होता. 10 डिसेंबर 2013 रोजी आम्ही फक्त एक प्रतिकात्मक निधी जमवण्याचा कार्यक्रम घेतला. केवळ 11 हजार रुपये जमवले होते. आज दहा वर्षानंतर राऊत म्हणतात, सोमय्यांनी 58 कोटी रुपये जमा केले. चार बिल्डरशी मनी लॉन्ड्रिंग करून आपल्या मुलाच्या कंपनीत वळवले. या पूर्वी राऊतांनी दोन महिन्यात सात आरोप केले. एकाचाही पुरावा दिला नाही. पोलिसांकडे एकही कागद नाही. केवळ राऊतांच्या स्टेटमेंटवरून तक्रार केल्याचं तक्रारदार म्हणतोय, असं सोमय्या म्हणाले.

नील सोमय्या यांचा जामीन अर्ज फेटाळला

किरीट सोमय्या यांना कोर्टाने आज दुसरा झटका दिला आहे. काल किरीट सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. त्यानंतर आज किरीट सोमय्या यांचा मुलगा नील सोमय्या यांचाही अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. आयएनएस विक्रांत केस प्रकरणात सोमय्या पिता पुत्राच्या अडचणी वाढताना दिसत आहेत.

इतर बातम्या : 

Raj Thackeray : राज ठाकरेंच्या सभेपूर्वी संदीप देशपांडेंचं सूचक ट्विट, ‘लाव रे तो व्हिडीओ’ची पुन्हा चर्चा

Sujat Ambedkar: ‘सुशिक्षित’ असून चालत नाही ‘सुजाण’ सुद्धा असावं लागतं, मनसे, हिंदू महासंघाचा सुजात आंबेडकरांवर निशाणा

प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा
प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा.
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.