AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Politics : महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागणार? हो, पूर्ण शक्यताय! पण आधी या 2 अटी समजून घ्याव्या लागतील

Maharashtra Politics : राजकीय गुंतागुतीला सोप्या शब्दात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत

Maharashtra Politics : महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागणार? हो, पूर्ण शक्यताय! पण आधी या 2 अटी समजून घ्याव्या लागतील
महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळImage Credit source: TV9 Marathi
Reporter Ashwini Satav Doke
Reporter Ashwini Satav Doke | Edited By: सिद्धेश सावंत | Updated on: Jun 22, 2022 | 1:03 PM
Share

पुणे : महाराष्ट्रातील राजकीय (Maharashtra Politics) पेच वाढतच चालला आहे. या राजकीय गुंतागुतीला सोप्या शब्दात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट (President Rule in Maharashtra) लागणार का? असा प्रश्न उपस्थि होऊ लागलाय. एकनाथ शिंदे यांनी केलेलं बंड, त्यानंतर त्यांना गटनेतेपदावरुन हटवण्यात आल्याचा निर्णय, तब्बल 46 आमदारांची एकनाथ शिंदेना असलेल्या पाठिंब्याची माहिती, या सगळ्यावरुन आता मुलभूत प्रश्न उपस्थित होतो. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागणार? महाविकास आघाडी सरकार पडणार? उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार? नव्या मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस येणार? याची चर्चा सुरु झाली आहे. या राजकीय पेचावर ज्येष्ठ कायदेतज्त्र उल्हास बापट (Ulhas Bapat) यांनी सोप्या शब्दांत गैरसमज दूर केले आहेत.

प्रश्न : महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागणार? उत्तर : होय. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू शकते. पण त्याआधी दोन महत्त्वाच्या गोष्टींवर अवलंबून राहावं लागणाह आहे. यातील दोन गोष्टा कोणत्या आहेत, ते समजून घेणं गरजेचं आहे.

राष्ट्रपती राजवट लागण्यासाठीच्या दोन अटी

  1. उद्धव ठाकरेंची राजीनामा दिल्यास
  2. देवेंद्र फडणवीस यांनी सरकार स्थापनेस नकार दिल्यास

आता या दोन्ही अटींवर ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. त्यांनी म्हटलंय, की राज्यसभा आणि विधान परिषदेच प्रचंड क्रॉस वोटिंग झालं. त्यातून राजकीय भूकंपाची लक्षणं दिसून येत होती. यामुळे पक्षांतरबंदी कायदा मोलाची भूमिका बजावतो. सत्तेच्या लालसेपोटी पक्षांतर करणाऱ्या आमदारांना वचक बसावा म्हणून हा कायदा अस्तित्त्वात आणला गेला होता. आताच्या परिस्थितीमध्ये हा कायदा कशी निर्णायक भूमिका बजावते, तेही उल्हास बापट यांनी उलगडून सांगितलं आहे.

सोप्या शब्दांत गणित समजून घ्या

एखाद्या सदस्यानं त्याचा पक्ष सोडला, किंवा पक्षाच्या विरोधात मतदान केलं, तर त्याची आमदारकीला धोका निर्माण होतो. त्याला स्पीट असं म्हणतात. मराठी यालात वेगळं होणं अशा अर्थाने घेतलं जातं.

दरम्यान, काही आमदारांनी एकत्र येत स्वतःचा गट तयार केला, हा गट मूळ पक्षाच्या दोन तृतीयांश असेल आणि ते इतर पक्षात गेले किंवा त्यांनी वेगळा पक्ष स्थापन केला, आणि सरकार स्थापन केलं तर त्याला मर्जर असं म्हणातात.

दरम्यान, आताचा प्रश्न हा मर्जरचा विषय आहे. शिवसेन आमदार बाहेर गेलेत. पण त्यांनी राजीनामा दिलेला नाही.

55 पैकी 37 आमदार बाहेर गेले तर ते वाचतील. नाहीतर त्यांची आमदारकी रद्द होऊ शकते, असं उल्हास बापट यांनी म्हटलंय. त्यामुळे आता जर 37 किंवा त्यापेक्षा जास्त आमदार बाहेर गेले, तर ती खरी शिवसेना मानली जाईल. आणि उर्वरीत गट मानला जाईल, असंही त्यांनी अधोरेखित केलं.

आता हे बाहेर पडून जर भाजपसोबत गेले, तर नैतिकतेला धरुन उद्धव ठाकरेंना राजीनामा देणं आवश्यक आहे. आता त्यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्यपालांकडे पुन्हा मोठी भूमिका येते. उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यानंतर महाराष्ट्रात लगेचच राष्ट्रपती राजवट लागू होणार का?, तर तसंही नाही.

उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला तर कुणाला मुख्यमंत्री म्हणून बोलवायचं, हे ठरवण्याचा अधिकार राज्यपालांना राज्यघटनेनं दिलेला आहे. यानंतर इतर मंत्री मुख्मयंत्र्यांच्या सल्ल्यानं नियुक्त केले जाऊ शकतात. दरम्यान आता जे दिसतंय, त्यावर असे संकेत मिळत आहेत की देवेद्र फडणवीस यांना राज्यपाल बोलावू शकतात.

कोरोनाचं काय?

एकीकडे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे हा विषय ताटकळत राहिल का? या शंकेचही निरशन उल्हास बापट यांनी केलं आहे. उल्हास बापट यांच्या मते राज्यपाल हॉस्पिटलमधूनही काम करु शकतात. मेडिकल प्रीकॉशन्स घेत राज्यपाल कारभार करु शकतात. तसंच व्हिडीओ कॉन्फरन्सिंग किंवा अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करत काम केलं जाऊ शकतं, असं देखील त्यांनी म्हटलंय.

वाचा एकनाथ शिंदेच्या बंडाचे LIVE अपडेट्स, इथे क्लिक करा : Eknath Shinde News, Maharashtra Government LIVE : महाविकास आघाडी विधानसभा बरखास्तीची शिफारस करणार

Follow Us
खरातवरील महाराष्ट्र एपस्टीन फाईल्समध्ये अनेक नेत्यांची व्यक्तिरेखा,
खरातवरील महाराष्ट्र एपस्टीन फाईल्समध्ये अनेक नेत्यांची व्यक्तिरेखा, शिंदे, चाकणकर अन्..
उद्धव ठाकरे, फडणवीस एकाच विमानाने रवाना, नेमकं काय घडलं? थेट व्हिडीओ आ
उद्धव ठाकरे, फडणवीस एकाच विमानाने रवाना, नेमकं काय घडलं? थेट व्हिडीओ आला समोर
विलास घुले प्रकरणात हे काय घडलं? 'पुरावे मिटवण्यासाठी 10 व्या आरोपीला
विलास घुले प्रकरणात हे काय घडलं? 'पुरावे मिटवण्यासाठी 10 व्या आरोपीला... बड्या नेत्याच्या दाव्याने राजकारणात खळबळ
प्रवाशांचा श्वास घुसमटला; तब्बल 20 मिनिटे... कोकण स्पेशल मांडवी एक्सप्
मोठी बातमी! प्रवाशांचा श्वास गुदमरला; तब्बल 20 मिनिटे... कोकण स्पेशल मांडवी एक्सप्रेस
ओमराजेंच्या निकवर्तीय नेत्याचं धाराशिवमध्ये ठाकरेंच्या सभेआधीच मोठं
Omraje Nimbaklar | ओमराजेंच्या निकवर्तीय नेत्याने धाराशिवमध्ये ठाकरेंच्या सभेआधीच केलं मोठं विधान, पुन्हा...
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना पितृशोक, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री
CM Devendra Fadnavis | केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना पितृशोक, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री कुटुंबीयांच्या भेटीला
लवकरच ठाकरे गटात मोठी चलबिचल दिसेल, त्यांचे आमदार शिंदेंकडे कैफियत...
लवकरच ठाकरे गटात मोठी चलबिचल दिसेल, त्यांचे आमदार शिंदेंकडे कैफियत... बड्या नेत्याने एक एक करत सगळंच सांगितलं
एकच खळबळ! सियानं लग्नासाठी नकार दिला होता? प्रकरणात आणखी एकाची एन्ट्री
खळबळ! सियानं लग्नासाठी नकार दिला होता? प्रकरणात आणखी एकाची एन्ट्री; त्याला सगळंच... डोकं चक्रावणारा खुलासा
भाजपमध्ये हे काय घडतंय? मुख्यमंत्री उपस्थित असलेल्या कार्यक्रमातच दोन
भाजपमध्ये हे काय घडतंय? मुख्यमंत्री उपस्थित असलेल्या कार्यक्रमातच दोन नेत्यांमध्ये रुसवारुसवी... कारण अत्यंत चकित करणार
शिवसेना मोठ्या तयारीत? उदय सामंतांकडून वडेट्टीवारांना पक्षप्रवेशाची
शिवसेना मोठ्या तयारीत? उदय सामंतांकडून वडेट्टीवारांना पक्षप्रवेशाची ऑफर?