AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘जनतेला मदत करण्यापेक्षा राज्यानं केंद्राकडे बोट करण्याचा एक कलमी कार्यक्रम राबवला’, डॉ. भारती पवारांचा हल्ला

कोरोना काळात केंद्र सरकारने राज्यांना मदतीचा हात दिला, लसीचे उत्पादन करून मोफत डोस दिले. महाराष्ट्राला सर्वाधिक मदत या काळात झाली. परंतु महाविकास आघाडी सरकारने या काळात जनतेला मदत देण्यासाठी भरीव आर्थिक तरतूद न करता केंद्र सरकारवर जबाबदारी ढकलण्याचा एक कलमी कार्यक्रम चालवला, अशा शब्दात केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी महाविकास आघाडी सरकारवर शरसंधान साधलं.

'जनतेला मदत करण्यापेक्षा राज्यानं केंद्राकडे बोट करण्याचा एक कलमी कार्यक्रम राबवला', डॉ. भारती पवारांचा हल्ला
डॉ. भारती पवार यांची जन-आशीर्वाद यात्रा धुले जिल्ह्यात
| Edited By: sagar joshi | Updated on: Aug 22, 2021 | 12:36 AM
Share

धुळे : कोरोना काळात केंद्र सरकारने राज्यांना मदतीचा हात दिला, लसीचे उत्पादन करून मोफत डोस दिले. महाराष्ट्राला सर्वाधिक मदत या काळात झाली. परंतु महाविकास आघाडी सरकारने या काळात जनतेला मदत देण्यासाठी भरीव आर्थिक तरतूद न करता केंद्र सरकारवर जबाबदारी ढकलण्याचा एक कलमी कार्यक्रम चालवला, अशा शब्दात केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी महाविकास आघाडी सरकारवर शरसंधान साधलं. धुळे येथे जन आशीर्वाद यात्रेच्या समारोप प्रसंगी त्या बोलत होत्या. (Dr. Bharti Pawar criticizes Mahavikas Aghadi government over Lack of health facilities)

केंद्रीय मंत्रीपदाचा वापर करून उत्तर महाराष्ट्रात आरोग्य सुविधांचा विकास करण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केले. या वेळी व्यासपीठावर माजी जलसंपदा मंत्री आमदार गिरीश महाजन, माजी पर्यटन मंत्री व प्रदेश उपाध्यक्ष जयकुमार रावल, यात्रा संयोजक आ.डॉ अशोक उईके, यात्रा सहसंयोजक किशोर काळकर,आ. राजेश पाडवी, धुळे शहर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, काळकर, आ. अमरीश पटेल, आ. काशीनाथ पावरा आदी उपस्थित होते. धुळे शहरात जन आशीर्वाद यात्रेचे ढोल ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत जंगी स्वागत करण्यात आले.

राज्याच्या आरोग्य विभागाच्या योजना फक्त कागदोपत्रीच

दरम्यान, डॉ. भारती पवार यांची जनआशीर्वाद यात्रा काल नंदूरबार जिल्ह्यात होती. नंदूरबार जिल्ह्यातील आरोग्य विषयक सुविधांच्या विकासासाठी मी वचनबद्ध आहे. केंद्रीय मंत्रीपदाच्या माध्यमातून जिल्ह्यातील पायाभूत सुविधांच्या विकासावर अधिक भर देणार, असं आश्वासन केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिले आहे. तसंच नंदूरबार जिल्ह्यातील आदिवासी विभागात राज्याच्या आरोग्य विभागाच्या योजना फक्त कागदोपत्रीच दिसून येतात, अशी टीकाही भारती पवार यांनी केलीय.

निधीची कमतरता भासू देणार नाही

तळोदा येथील आदिवासी विकास भवन येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी खासदार डॉ. हीना गावित, आमदार राजेश पाडवी, आदिवासी मोर्चा प्रदेशाध्यक्ष आमदार डॉ.अशोक उईके, जनजातीय राज्यक्षेत्र संपर्कप्रमुख किशोर काळकर, भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी आदी उपस्थित होते. यावेळी पवार म्हणाल्या की, नंदूरबार जिल्ह्यातील आदिवासी विभागात राज्याच्या आरोग्य विभागाच्या योजना फक्त कागदोपत्रीच दिसून येतात. राज्य सरकारने याकडे त्वरीत लक्ष देण्याची आवश्यकता आहे. नवीन जबाबदारीच्या माध्यमातून केंद्र शासनाकडून राबविल्या जाणाऱ्या आदिवासी कल्याणकारी योजनांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही. संपूर्ण समाजाचा सर्वांगीण विकास करण्यावर अधिक भर देईन.

इतर बातम्या :

पोलीस आणि संरक्षण क्षेत्राच्या नोकरीतील दिव्यांगांचे आरक्षण रद्द; केंद्रानं फेरविचार करावा, सुप्रिया सुळे यांची मागणी

संजय राठोड यांना शरीरसुख आरोप प्रकरणात क्लीनचीट, पण मधल्या दिवसांत बऱ्याच गोष्टी घडल्या ? चित्रा वाघ म्हणतात…

Dr. Bharti Pawar criticizes Mahavikas Aghadi government over Lack of health facilities

Follow Us
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदें
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदेंनी सगळं सांगितलं!
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने एकच खळबळ
चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीच
Eknath Shinde | चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीचा आदेश!
राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा
Raj Thackeray | राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा; मोदींच्या मौनावर गंभीर सवाल
आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न... रोहित पवारांच्या विधान
Rohit Pawar | 'आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न... रोहित पवारांच्या विधानाने खळबळ
महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात
मोठी बातमी! महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात; विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा
शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी
मुंबईत भीषण दुर्घटना! शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू
अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; सचिन अहिरांच्या प्रवेशानंतर शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही?
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ