AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘त्या’ प्रकरणात जितेंद्र आव्हाड यांनी प्रदेशाध्यक्षांकडे राजीनामा का दिला होता?; आव्हाड यांच्याच जुन्या सहकाऱ्याचा सवाल

छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून लाथ मारुन हाकलावे अशी मागणी शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केली होती. त्यानंतर भुजबळ यांनी नगर येथील ओबीसींच्या एल्गार मेळाव्यात आपण 16 नोव्हेबरलाच मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला होता असा गौप्यस्फोट भुजबळ यांनी केला. ओबीसींच्या अंबड येथील पहिल्या मेळाव्याच्या आदल्या दिवशीच आपण राजीनामा दिल्याचे त्यांनी सांगितले. यावरुन आता आव्हाड यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

'त्या' प्रकरणात जितेंद्र आव्हाड यांनी प्रदेशाध्यक्षांकडे राजीनामा का दिला होता?; आव्हाड यांच्याच जुन्या सहकाऱ्याचा सवाल
JITENDRA AWHADImage Credit source: TV9MARATHI
| Updated on: Feb 05, 2024 | 2:52 PM
Share

मुंबई | 5 फेब्रुवारी 2024 : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी बारामतीत कोणताही उमेदवार दिला तरी तो अजित पवार समजून मतदान करा, ते भावनिक आवाहन करतायत ही शेवटची निवडणूक आहे. परंतू त्यांची शेवटची निवडणूक कधी येतच नाही अशा शब्दात आपले काका शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. यावर शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी बापाच्या मरणाची वाट पाहणारी अवलाद कधी बघितली नाही अशी टीका अजितदादांवर केली आहे. यावर आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आनंद परांजपे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली आहे. जितेंद्र आव्हाड यांना ‘ध’ चा ‘मा’ करणे उत्तम जमतं. शरद पवार हे दीर्घायुषी होवोत आणि त्यांना उत्तम आरोग्य लाभावे हीच आमची इच्छा असल्याचे आनंद परांजपे यांनी म्हटले आहे.

अजित पवार यांनी बारामती निवडणूकीत कुणाच्या भावनिक आव्हानांना बळी पडू नका. ते म्हणतील शेवटची निवडणूक आहे ते त्यास भुलू नका अशा शब्दात आपलेच काका शरद पवार यांच्या अप्रत्यक्ष टीका केली होती. त्यावरुन राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्या प्रचंड टीका केली आहे. बापाच्या मरणाची वाट पाहणारी अवलाद कधी पाहीली नाही असे आव्हाड यांनी अजितदादांवर टीका करताना म्हटले आहे. यावर आता अजित पवार गटाचे नेते आनंद परांजपे यांनी आव्हाड यांच्यावर पलटवार केला आहे. आव्हाड नेहमीच अजितदादांवर अक्राळ-विक्राळ बोलतात, अजितदादा यांच्या नेतृत्वात अनेक आमदार आणि खासदार निवडून येत असतात हे नाकारणार का असाही सवाल परांजपे यांनी केला आहे.

छगन भुजबळ यांना खरेच राजीनामा द्यायचा होता तर योग्य व्यक्तीकडे द्यायला हवा होता अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली होती. यावर आनंद परांजपे यांनी जितेंद्र आव्हाड यांनाच आरसा दाखवला आहे. ज्यावेळी रिधा रशीद या महिलेने त्यांच्यावर विनयभंगाचा आरोप केला होता. तेव्हा आव्हाड यांनी उद्विग्न होऊवन आपल्या आमदारकीचा राजीनामा हा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना का पाटवून दिला ? त्यांनी तो राजीनामा उपसभापती नरहरी झिरवल यांना का पाठवला नाही? त्यामुळे जितेंद्र आव्हाड हे नुसते स्टंट करतात हे अनेकदा स्पष्ट झाले असल्याचे आनंद परांजपे यांनी म्हटले आहे.

गोळीबाराची घटना अत्यंत चुकीची

कल्याण-उल्हासनगरातील गोळीबारीची घटना अत्यंत चुकीची आहे. त्याचं समर्थन कोणी करू शकत नाही. पण ठाण्यात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन एक बैठक घ्यावी आणि हे वातावरण शांत कराव लागणार आहे. हा संघर्ष थांबवायचा असेल तर मुख्यमंत्र्यांनाच यात पुढाकार घ्यावा लागेल, त्यामुळे हा तणाव लवकर निवळेल अशी आशा असल्याचे आनंद परांजपे यांनी म्हटले आहे.

Follow Us
कुंभार समाजाला सरकारची मोठी भेट! बावनकुळेंची थेट महत्त्वाची घोषणा
Chandrashekhar Bawankule | कुंभार समाजाला सरकारची मोठी भेट! बावनकुळेंची थेट महत्त्वाची घोषणा; नेमका काय फायदा होणार?
मोठी बातमी! लोकसभेची सदस्यसंख्या 824 पर्यंत वाढवणार? सल्लागारांच्या
मोठी बातमी! लोकसभेची सदस्यसंख्या 824 पर्यंत वाढवणार? सल्लागारांच्या शिफारस पत्रात नेमकं काय?
अखेरचा पत्ता उघडणार! गोकुळ गितेसोबत उदय सामंत अन् गिरिश महाजनांच्या
अखेरचा पत्ता उघडणार! गोकुळ गितेसोबत उदय सामंत अन् गिरिश महाजनांच्या अंतिम चर्चेत नेमकं काय घडलं?
एकच खळबळ! मशिदीच्या भिंतीआड भयंकर कांड; 7 वर्षाच्या.... नेमकं काय घडलं
एकच खळबळ! मशिदीच्या भिंतीआड भयंकर कांड; 7 वर्षाच्या.... नेमकं काय घडलं?
तृणमूल काँग्रेसला धक्क्यावर धक्का; CIDची धाड, TMC खासदाराचा राजीनामा
तृणमूल काँग्रेसला धक्क्यावर धक्का; CIDची धाड, TMC खासदाराचा राजीनामा तर, आणखी नेते सोडणार पक्ष?
जळगावात महायुती विरुद्ध महायुती? रेश्मा काळेंचा बंडखोर पवित्रा कायम
Jalgaon | जळगावात महायुती विरुद्ध महायुती? रेश्मा काळेंचा बंडखोर पवित्रा कायम
मुंबई ते दिल्ली प्रवासाआधीच विमानात बिघाड होताच... प्रवासाबाबत सुनेत्र
मुंबई ते दिल्ली प्रवासाआधीच विमानात बिघाड होताच... प्रवासाबाबत सुनेत्रा पवार काय म्हणाल्या?
राज्य थरथरलं! अनेक वर्ष चालला काळा कारभार, अल्पवयीन मुलीवर दोघं...भाजप
राज्य थरथरलं! अनेक वर्ष चालला काळा कारभार, अल्पवयीन मुलीवर दोघं... भाजप नगरसेविकेच्या भावाचं हादरवणारं कांड
गोकुळ गीते यांचं बंड आता थंड होण्याची दाट शक्यता?
Gokul Gite Nashik | नाशिकच्या राजकारणात गेमचेंजर घडामोड; गोकुळ गीते यांचं बंड आता थंड होण्याची दाट शक्यता
पाणी सोडलं नाही म्हणून थेट वस्तीवर हल्ला! बुलढाण्यात तुफान राडा
Buldhana News | पाणी सोडलं नाही म्हणून थेट वस्तीवर हल्ला! बुलढाण्यात तुफान राडा, 15 जण जखमी