AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘त्या’ प्रकरणात जितेंद्र आव्हाड यांनी प्रदेशाध्यक्षांकडे राजीनामा का दिला होता?; आव्हाड यांच्याच जुन्या सहकाऱ्याचा सवाल

छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून लाथ मारुन हाकलावे अशी मागणी शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केली होती. त्यानंतर भुजबळ यांनी नगर येथील ओबीसींच्या एल्गार मेळाव्यात आपण 16 नोव्हेबरलाच मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला होता असा गौप्यस्फोट भुजबळ यांनी केला. ओबीसींच्या अंबड येथील पहिल्या मेळाव्याच्या आदल्या दिवशीच आपण राजीनामा दिल्याचे त्यांनी सांगितले. यावरुन आता आव्हाड यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

'त्या' प्रकरणात जितेंद्र आव्हाड यांनी प्रदेशाध्यक्षांकडे राजीनामा का दिला होता?; आव्हाड यांच्याच जुन्या सहकाऱ्याचा सवाल
JITENDRA AWHADImage Credit source: TV9MARATHI
| Updated on: Feb 05, 2024 | 2:52 PM
Share

मुंबई | 5 फेब्रुवारी 2024 : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी बारामतीत कोणताही उमेदवार दिला तरी तो अजित पवार समजून मतदान करा, ते भावनिक आवाहन करतायत ही शेवटची निवडणूक आहे. परंतू त्यांची शेवटची निवडणूक कधी येतच नाही अशा शब्दात आपले काका शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. यावर शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी बापाच्या मरणाची वाट पाहणारी अवलाद कधी बघितली नाही अशी टीका अजितदादांवर केली आहे. यावर आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आनंद परांजपे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली आहे. जितेंद्र आव्हाड यांना ‘ध’ चा ‘मा’ करणे उत्तम जमतं. शरद पवार हे दीर्घायुषी होवोत आणि त्यांना उत्तम आरोग्य लाभावे हीच आमची इच्छा असल्याचे आनंद परांजपे यांनी म्हटले आहे.

अजित पवार यांनी बारामती निवडणूकीत कुणाच्या भावनिक आव्हानांना बळी पडू नका. ते म्हणतील शेवटची निवडणूक आहे ते त्यास भुलू नका अशा शब्दात आपलेच काका शरद पवार यांच्या अप्रत्यक्ष टीका केली होती. त्यावरुन राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्या प्रचंड टीका केली आहे. बापाच्या मरणाची वाट पाहणारी अवलाद कधी पाहीली नाही असे आव्हाड यांनी अजितदादांवर टीका करताना म्हटले आहे. यावर आता अजित पवार गटाचे नेते आनंद परांजपे यांनी आव्हाड यांच्यावर पलटवार केला आहे. आव्हाड नेहमीच अजितदादांवर अक्राळ-विक्राळ बोलतात, अजितदादा यांच्या नेतृत्वात अनेक आमदार आणि खासदार निवडून येत असतात हे नाकारणार का असाही सवाल परांजपे यांनी केला आहे.

छगन भुजबळ यांना खरेच राजीनामा द्यायचा होता तर योग्य व्यक्तीकडे द्यायला हवा होता अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली होती. यावर आनंद परांजपे यांनी जितेंद्र आव्हाड यांनाच आरसा दाखवला आहे. ज्यावेळी रिधा रशीद या महिलेने त्यांच्यावर विनयभंगाचा आरोप केला होता. तेव्हा आव्हाड यांनी उद्विग्न होऊवन आपल्या आमदारकीचा राजीनामा हा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना का पाटवून दिला ? त्यांनी तो राजीनामा उपसभापती नरहरी झिरवल यांना का पाठवला नाही? त्यामुळे जितेंद्र आव्हाड हे नुसते स्टंट करतात हे अनेकदा स्पष्ट झाले असल्याचे आनंद परांजपे यांनी म्हटले आहे.

गोळीबाराची घटना अत्यंत चुकीची

कल्याण-उल्हासनगरातील गोळीबारीची घटना अत्यंत चुकीची आहे. त्याचं समर्थन कोणी करू शकत नाही. पण ठाण्यात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन एक बैठक घ्यावी आणि हे वातावरण शांत कराव लागणार आहे. हा संघर्ष थांबवायचा असेल तर मुख्यमंत्र्यांनाच यात पुढाकार घ्यावा लागेल, त्यामुळे हा तणाव लवकर निवळेल अशी आशा असल्याचे आनंद परांजपे यांनी म्हटले आहे.

Follow Us
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश.
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ....
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ.....
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक.
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली.
रिलायन्स इंडस्ट्रीची अमेरिकेत गुंतवणूक, संजय राऊत यांचा हल्लाबोल
रिलायन्स इंडस्ट्रीची अमेरिकेत गुंतवणूक, संजय राऊत यांचा हल्लाबोल.
व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा; हॉटेल व्यवसाय आणि उद्योग अडचणीत
व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा; हॉटेल व्यवसाय आणि उद्योग अडचणीत.
मिठी नदीच्या नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प उभारा, उद्घाटनाला...
मिठी नदीच्या नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प उभारा, उद्घाटनाला....
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू.
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.