AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raju Patil : ‘सेवा करायची की मेवा खायचा हे आमच्यासारख्या…’, मनसेचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल

एकनाथ शिंदे यांच्यानंतर उदय सामंत शिवसेनेचे प्रमुख होतील अशी राजकारणात चर्चा रंगली आहे, त्यावर राजू पाटील यांनी आपलं मत मांडलं. "उदय सामंत हे इमानदारीत काम करणारे व्यक्ती ते असं करणार नाही हा सर्व राजकारणाचा भाग आहे. मला नाही वाटत उदय सामंतजी या प्रकारे कुठलं राजकारण करतील"

Raju Patil : 'सेवा करायची की मेवा खायचा हे आमच्यासारख्या...', मनसेचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल
Eknath Shinde
| Updated on: Jan 21, 2025 | 12:36 PM
Share

“गणेश नाईक यांना पालकमंत्री पद मिळावे ही अपेक्षा होती. मात्र आगरी समाजाला ठेंगा दाखवत पालकमंत्री पद गेले. मुख्यमंत्री असताना आमच्या भागात काही झालं नाही. आता पालकमंत्री झाले तर काय होणार?. आमच्या अपेक्षा होत्या, मात्र फक्त घोषणा झाल्या. यांना गडचिरोली, रायगड, पालघर या ठिकाणी पालकमंत्री पदाची गरज सेवा करण्यासाठी की मेवा खाण्यासाठी?. हे आमच्यासारख्या राजकारणी लोकांना माहित आहे” अशा शब्दात कल्याण ग्रामीणचे माजी मनसे आमदार राजू पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला. “पेरलेलं कधी कधी उगवतं. मात्र उदय सामंत हे इमानदारीत काम करणारे व्यक्ती. ते असं करणार नाही हा सर्व राजकारणाचा भाग” असं राजू पाटील म्हणाले.

ठाण्याच पालकमंत्री पद एकनाथ शिंदे यांना मिळाल्यानंतर आता मनसे आक्रमक झाली असून मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. हे पद सेवेसाठी नाहीतर मेवा खाण्यासाठी असल्याचा आरोप केला आहे. “आमची सर्वांची अपेक्षा होती की गणेश नाईक यांना पालकमंत्री पद मिळावे, आणि ते असते तर आगरी समाजाला ही न्याय मिळाला असता ही अपेक्षा इथल्या लोकांची होती. त्या अनुषंगाने मी बोललो की पालकमंत्री पद आगरी लोकांना ठेंगा दाखवून गेले आणि शेवटी मुख्यमंत्री असताना आमच्या भागात काय झाले नाही तर पालकमंत्री असताना काय होणारे?” अशी टीका एकनाथ शिंदे यांच्यावर केली.

त्या रागापोटी हे ट्विट

“थोड्या आमच्या अपेक्षा होत्या. परंतु त्या पूर्ण झाल्या नाहीत. जसं धरण फक्त घोषणा झाली. मुख्यमंत्री असताना लँड एक्वेजीशन पॉलिसी जाहीर व्हायला पाहिजे होती ती झाली नाही त्या रागापोटी हे ट्विट केले आहे” असं राजू पाटील म्हणाले.

लोकांना ते माहित नाही

आमदार राजू पाटील म्हणाले की, “पालकमंत्री पद कुठलं पाहिजे, गडचिरोली, पालघर, रायगड. कारण रायगडला पोर्ट आहे, वाढवण बंदर येतय पालघरला. गडचिरोलीला खदानी आहेत, हे कशासाठी पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून काय सेवा करायची की का मेवा खायचा हे आमच्यासारख्या राजकारणाला माहित आहे. लोकांना ते माहित नाही” अशा शब्दात राजू पाटील यांनी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा समाचार घेतला.

Follow Us
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...