AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

kirit somaiya | ‘धारावीची लोकसंख्या 2.5 लाख, मग 4 लाख लोक अपात्र कसे काय?’ किरीट सोमय्यांचा सवाल

kirit somaiya | "रवींद्र वायकर प्रकरणात हिशोब द्यावा लागेल. महापालिकेने परवानगी दिली. इकबाल चहल यांनी परवानगी दिली त्याबाबत ed ने विचारले पाहिजे परवानगी कशी दिली? खेळाचे मैदान आहे कशी परवानगी दिली?"

kirit somaiya | 'धारावीची लोकसंख्या 2.5 लाख, मग 4 लाख लोक अपात्र कसे काय?' किरीट सोमय्यांचा सवाल
bjp kirit somaiya
| Updated on: Jan 18, 2024 | 12:55 PM
Share

मुंबई : “कोविड खिचडी घोटाळ्यात आदित्य ठाकरे यांचा फ्रंटमॅन सूरज चव्हाण यांना अटक झालीय. त्याचं मी स्वागत करतो” असं भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे. “132 कोटी रुपयाच्या खिचडी घोटाळ्यात उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या पार्टीच्या अनेक नेत्यांच्या बेनामी कंपन्यात पैसा गेला” अस किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे. “खिचडी घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांची कन्या विधिता राऊत, भाऊ संदीप राऊत आणि सुजित पाटकर यांच्या खात्यात लाखो करोडो रुपय गेले” असा आरोप सोमय्या यांनी केला.

“रवींद्र वायकर प्रकरणात हिशोब द्यावा लागेल. महापालिकेने परवानगी दिली. इकबाल चहल यांनी परवानगी दिली त्याबाबत ed ने विचारले पाहिजे परवानगी कशी दिली? खेळाचे मैदान आहे कशी परवानगी दिली?” असा सवाल किरीट सोमय्या यांनी केला. “संजय राऊत म्हणजे चोर कोतवालाला बोलत आहे. तुमच्याकडे जे पैसे आलेत त्याचा हिशोब द्या, पत्रावाला चाळ तुमच्या बायकोच्या खात्यात पैसे आले होते. त्याचा हिशोब द्या, जेलमध्ये जावे लागले. घोटाळा केला असेल तर तुम्ही तक्रार करा. तुम्ही पाप केले त्याचा हिशोब तर द्यावा लागेल” असं किरीट सोमय्या म्हणाले.

‘4 लाख लोकांचे पुनर्वसन हे अशक्य’

धारावी येथील अपात्र झोपडपट्टी धारकांचे पुनर्वसन मुलुंड (पूर्व) येथील जकात नाका व डम्पिंग ग्राउंड जवळच्या जमिनीवर करावे व त्यासाठी ही जमीन मुंबई महापालिकेने धारावी पुनर्विकास प्राधिकरणाला द्यावी असे 10 जानेवारी, 2024 रोजी महाराष्ट्र सरकारच्या गृहनिर्माण मंत्रालयाने एक पत्र मुंबई महापालिकेला दिले आहे. या पत्रासंबंधात भाजप नेते किरीट सोमैया यांनी राज्य सरकार व झोपडपट्टी धारावी पुनर्विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली, पत्र लिहिले व एका ठिकाणी अशा 4 लाख लोकांचे पुनर्वसन हे अशक्य आहे, असे आपले मत व्यक्त केले.

‘मग हा मुलुंड पूर्वच्या नागरिकांवर अन्याय’

“मुलुंड (पूर्व) येथील इन्फ्रास्ट्रक्चरवर आधीच ठाकरे सरकारने PAP प्रकल्पाद्वारा 50,000 लोकांचे पुनर्वसन करण्याचा घोटाळा केला आहे. त्यात अधिक 4 लाख किंवा हजारो लोकांचे मुलुंड (पूर्व) येथे पुनर्वसन करणे, हे मुलुंड पूर्वच्या नागरिकांवर अन्याय, अत्याचार होणार” असेही किरीट सोमैया यांनी म्हटले आहे. “धारावीची एकंदर लोकसंख्याच 2.5 लाखांपर्यंत आहे. त्यात 4 लाख अपात्र लोकं कसे काय?” असा प्रश्न ही किरीट सोमैया यांनी या अधिकाऱ्यांना विचारला.

Follow Us
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका.
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती.
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी.
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची...
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची....
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार.
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर.
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश.
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ....
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ.....
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक.
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली.