AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता तर लोकांची खात्री पटली की, राष्ट्रवादीनेच शिवसेना संपवली!; दीपक केसरकरांचा पुन्हा हल्लाबोल

Deepak Kesarkar on Uddhav Thackeray : आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे विचार जिवंत ठेवले, राज्यात बदल घडला नसता तर सगळी शिवसेना संपली असती; दीपक केसरकरांचा पुन्हा उद्धव ठाकरेंवर निशाणा

आता तर लोकांची खात्री पटली की, राष्ट्रवादीनेच शिवसेना संपवली!; दीपक केसरकरांचा पुन्हा हल्लाबोल
| Edited By: आयेशा सय्यद | Updated on: May 01, 2023 | 11:22 AM
Share

कोल्हापूर : राष्ट्रवादी आणि शरद पवारांनी शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी याआधीही अनेकदा केला आहे. आज पुन्हा एकदा केसरकरांनी उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीवर टीकास्त्र डागलंय. “आता तर लोकांची खात्री पटली आहे की राष्ट्रवादी काँग्रेस यांनी शिवसेना संपवली”, असं केसरकर म्हणाले आहेत.

उद्धव ठाकरे यांची शिवसेना संपवण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यशस्वी झाला. पण आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे विचार जिवंत ठेवले आहेत. बाळासाहेबांच्या विचारांवरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चालत आहेत. जर राज्यात बदल घडला नसता तर सगळी शिवसेना संपली असती, असंही केसरकर म्हणालेत.

2024 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूक तोंडवर आहे. अशात जर पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेनेच्या युतीचं सरकार सत्तेत आलं तर मुख्यमंत्रिपद कुणाकडे असणार? एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार की मुख्यमंत्रिपदाचा चेहरा बदलला जाणार याची सध्या राजकीय वर्तुळाच चर्चा होतेय. त्यावरही दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

2024 ची निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढवली जाईल. जनतेच्या मनातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. त्यामुळे तेच मुख्यमंत्री राहतील अशी अपेक्षा आहे, असंही केसरकर म्हणालेत.

मुंबईतील बीकेसी मैदानात महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा होतेय. त्यावर दीपक केसकरांनी टीका केलीय. महाराष्ट्र दिनी नेहमी चांगले कार्यक्रम घ्यायचे असतात. आजच्या दिवशी तरी चांगलं आणि सकारात्मक बोललं जाईल अशी अपेक्षा आहे. पण काय होतं ते बघूयात, असं केसरकर म्हणाले आहेत.

महाराष्ट्राच्या हिताचं बोलले जाईल. महाराष्ट्राचा विकास थांबण्याबाबत वज्रमूठ असण्याऐवजी महाराष्ट्राच्या विकासाचं योगदान जनतेला देणं गरजेचं आहे. महाराष्ट्रातील दोन लाख तरुणांच्या नोकऱ्या काढून घेताना आपली राजकीय पोळी कशी भाजता येईल? हे कुणी पाहत असेल तर हे महाराष्ट्राला शोभणारे नाही, असंही केसरकर म्हणालेत.

उद्धव ठाकरे यांनी जरूर बारसूला जावं. कारण त्यांनीच बारसू या ठिकाणी हा प्रकल्प व्हावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं होतं. लोकांना संघर्ष करायला लावायचं, त्यांचं अहित करायचं हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला धरून नाही. जनतेनं समजून घेतलं पाहिजे की हा विरोध राजकीय आहे, असंही केसरकर म्हणालेत.

Follow Us
राष्ट्रवादीला मोठा धक्का! बडा नेता भाजपच्या वाटेवर....
मोठी बातमी! राष्ट्रवादीला मोठा धक्का! बडा नेता भाजपच्या वाटेवर; तेव्हा गेलो असतो तर..म्हणत व्यक्त केली खंत
ठाकरे की शिंदे? आज ठरणार ओमराजेंचा राजकीय मार्ग! काही तासांत....
ठाकरे की शिंदे? आज ठरणार ओमराजेंचा राजकीय मार्ग! काही तासांत मोठा निर्णय
अखेर मुंबईत पावसाची हजेरी! पहाटेपासून रिमझिम सरी, मुंबईकर सुखावले
Mumbai Rain Update | अखेर मुंबईत पावसाने लावली हजेरी! पहाटेपासून रिमझिम सरी, मुंबईकर सुखावले
6 खासदारांच्या बंडखोरीनंतर ठाकरेंचा मोठा निर्णय; आराखडा तयार आता फक्त.
Uddhav Thackeray | विश्वासू खासदारांच्या बंडखोरीनंतर ठाकरेंचा मोठा निर्णय; आराखडा तयार आता फक्त...
रेवती सुळेंच्या लग्नाला शरद पवार व्हीलचेअरवरून हजर, सुनेत्रा पवारांचीह
रेवती सुळेंच्या लग्नाला शरद पवार व्हीलचेअरवरून हजर, सुनेत्रा पवारांचीही उपस्थिती
कल्याणमध्ये जमीन घोटाळ्याने खळबळ; माजी नगरसेवकांसह 7 जणांवर गुन्हा
kalyan | कल्याणमध्ये जमीन घोटाळ्याने खळबळ; माजी नगरसेवकांसह 7 जणांवर गुन्हा
भर मंचावर झाला मोठा घोळ! कोल्हापूरच्या कार्यक्रमात शिंदेंचं नाव...
भर मंचावर झाला मोठा घोळ! कोल्हापूरच्या कार्यक्रमात शिंदेंचं नाव... मुख्यमंत्र्यांनी सूत्रसंचालकाला मध्येच अडवलं अन्...
6 बंडखोर खासदारांविरोधात ठाकरेंचा मास्टरप्लॅन! थेट मतदारसंघात उतरणार
Uddhav Thackeray | 6 बंडखोर खासदारांविरोधात उद्धव ठाकरेंचा मास्टरप्लॅन! थेट मतदारसंघात उतरणार
ओमराजे निर्णय घेण्याआधीच शिंदेंचे खासदार... शिंदेच्या कार्यकर्त्यांचा
ओमराजे निर्णय घेण्याआधीच शिंदेंचे खासदार... शिंदेच्या कार्यकर्त्यांचा घराबाहेर गराडा; पुण्यातील राजकीय हालचालींना वेग
परभणीच्या हनुमान मंदिरात मोठी दुर्घटना, बांधकाम सुरु असताना छत कोसळला
Parbhani| परभणीच्या हनुमान मंदिरात मोठी दुर्घटना, बांधकाम सुरु असताना छत कोसळला, अनेकजण जखमी