AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता तर लोकांची खात्री पटली की, राष्ट्रवादीनेच शिवसेना संपवली!; दीपक केसरकरांचा पुन्हा हल्लाबोल

Deepak Kesarkar on Uddhav Thackeray : आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे विचार जिवंत ठेवले, राज्यात बदल घडला नसता तर सगळी शिवसेना संपली असती; दीपक केसरकरांचा पुन्हा उद्धव ठाकरेंवर निशाणा

आता तर लोकांची खात्री पटली की, राष्ट्रवादीनेच शिवसेना संपवली!; दीपक केसरकरांचा पुन्हा हल्लाबोल
| Edited By: | Updated on: May 01, 2023 | 11:22 AM
Share

कोल्हापूर : राष्ट्रवादी आणि शरद पवारांनी शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी याआधीही अनेकदा केला आहे. आज पुन्हा एकदा केसरकरांनी उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीवर टीकास्त्र डागलंय. “आता तर लोकांची खात्री पटली आहे की राष्ट्रवादी काँग्रेस यांनी शिवसेना संपवली”, असं केसरकर म्हणाले आहेत.

उद्धव ठाकरे यांची शिवसेना संपवण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यशस्वी झाला. पण आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे विचार जिवंत ठेवले आहेत. बाळासाहेबांच्या विचारांवरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चालत आहेत. जर राज्यात बदल घडला नसता तर सगळी शिवसेना संपली असती, असंही केसरकर म्हणालेत.

2024 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूक तोंडवर आहे. अशात जर पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेनेच्या युतीचं सरकार सत्तेत आलं तर मुख्यमंत्रिपद कुणाकडे असणार? एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार की मुख्यमंत्रिपदाचा चेहरा बदलला जाणार याची सध्या राजकीय वर्तुळाच चर्चा होतेय. त्यावरही दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

2024 ची निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढवली जाईल. जनतेच्या मनातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. त्यामुळे तेच मुख्यमंत्री राहतील अशी अपेक्षा आहे, असंही केसरकर म्हणालेत.

मुंबईतील बीकेसी मैदानात महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा होतेय. त्यावर दीपक केसकरांनी टीका केलीय. महाराष्ट्र दिनी नेहमी चांगले कार्यक्रम घ्यायचे असतात. आजच्या दिवशी तरी चांगलं आणि सकारात्मक बोललं जाईल अशी अपेक्षा आहे. पण काय होतं ते बघूयात, असं केसरकर म्हणाले आहेत.

महाराष्ट्राच्या हिताचं बोलले जाईल. महाराष्ट्राचा विकास थांबण्याबाबत वज्रमूठ असण्याऐवजी महाराष्ट्राच्या विकासाचं योगदान जनतेला देणं गरजेचं आहे. महाराष्ट्रातील दोन लाख तरुणांच्या नोकऱ्या काढून घेताना आपली राजकीय पोळी कशी भाजता येईल? हे कुणी पाहत असेल तर हे महाराष्ट्राला शोभणारे नाही, असंही केसरकर म्हणालेत.

उद्धव ठाकरे यांनी जरूर बारसूला जावं. कारण त्यांनीच बारसू या ठिकाणी हा प्रकल्प व्हावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं होतं. लोकांना संघर्ष करायला लावायचं, त्यांचं अहित करायचं हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला धरून नाही. जनतेनं समजून घेतलं पाहिजे की हा विरोध राजकीय आहे, असंही केसरकर म्हणालेत.

Follow Us
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला.
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?.
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?.
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप.
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?.
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले.
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा.
भोंदूबाबाकडे गेलेल्या मंत्र्यांना सहआरोपी करा, संजय राऊत यांची मागणी
भोंदूबाबाकडे गेलेल्या मंत्र्यांना सहआरोपी करा, संजय राऊत यांची मागणी.
रुपाली चाकणकर यांनी एक वर्षांपूर्वी खरातला वाचवले- रुपाली ठोंबरे पाटील
रुपाली चाकणकर यांनी एक वर्षांपूर्वी खरातला वाचवले- रुपाली ठोंबरे पाटील.
'चंद्रकांत पाटील यांचे खरात सोबत,'...काय म्हणाले रवींद्र धंगेकर ?
'चंद्रकांत पाटील यांचे खरात सोबत,'...काय म्हणाले रवींद्र धंगेकर ?.