“जैसी करनी वैसी भरनी!, दुसऱ्यांची घरं तोडणाऱ्यांच्याच घरात आज फूट”, बिहारमधील राजकीय घडामोडींवर चिराग पासवान यांची प्रतिक्रिया

| Updated on: Aug 08, 2022 | 11:40 AM

बिहारमध्ये सत्तांतराची चिन्हे!

जैसी करनी वैसी भरनी!, दुसऱ्यांची घरं तोडणाऱ्यांच्याच घरात आज फूट, बिहारमधील राजकीय घडामोडींवर चिराग पासवान यांची प्रतिक्रिया
Follow us on

मुंबई : महाराष्ट्रात सत्तांतर झालं. अशीच शक्यता सध्या बिहारच्या राजकारणात (Bihar Politics) निर्माण झाली आहे. तिथेही सत्तांतराची चिन्हे आहेत. मुख्यमंत्री नितीश कुमार भाजपची साथ सोडणाण्याची शक्यता आहे. या सगळ्या घडामोडींवर लोकजनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार चिराग पासवान (Chirag Paswan) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आपण जसं इतरांशी वागतो तेच आपल्यासोबत घडतं, असं त्यांनी म्हटलंय. बिहारच्या राजकारणात वारंवार बदल होत असतात. सत्तेत आलेलं सरकार स्थिर होईपर्यंत सरकोर कोसळतं! हा इतिहास आहे. याचीच पुनरावृत्ती होताना दिसतेय. बिहारमध्ये पुन्हा एकदा भाजप आणि जेडीयूची युती तुटण्याची शक्यता आहे. नितीश कुमार लवकरच आरजेडी, आणि काँग्रेसलासोबत जात आघाडी करण्याची शक्यता आहे. मागची काही वर्षे ज्यांच्या विरोधात लढले त्यांच्याच सोबत आता आघाडीची शक्यता आहे.

चिराग काय म्हणाले?

एलजेपीचे नेते चिराग पासवान यांनी राज्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य केलंय. ज्यांनी दुसऱ्यांचं घर फोडलं त्यांच्याच घरात आता फूट पडलीय, असं चिराग म्हणाले आहेत. बिहारच्या राजकारणात वारंवार बदल होत असतात. सत्तेत आलेलं सरकार स्थिर होईपर्यंत सरकोर कोसळतं! हा इतिहास आहे. याचीच पुनरावृत्ती होताना दिसतेय. बिहारमध्ये पुन्हा एकदा भाजप आणि जेडीयूची युती तुटण्याची शक्यता आहे. नितीश कुमार लवकरच आरजेडी, आणि काँग्रेसलासोबत जात आघाडी करण्याची शक्यता आहे. मागची काही वर्षे ज्यांच्या विरोधात लढले त्यांच्याच सोबत आता आघाडीची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा

एलजेपी , जेडीयू आणि भाजप संबंध

रामविलास पासवान आजारी असताना आणि त्यांच्या जाण्यानंतर पक्षाची धुरा चिराग यांच्या खांद्यावर आली. भाजपसोबत युतीत असणाऱ्या एलजेपीला डावललं गेल्याचा आरोप चिराग यांनी लावला. त्यांच्या या अश्या वागण्याला बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि जेडीयूचा हात असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. आम्हाला निवडणुकीत कमी जागा मिळाल्या, असंही ते म्हणाले होते. भाजपने मागच्या विधानसभा निवडणुकीत जेडीयूसोबत जात सरकार स्थापन केलं. अन् आता त्यांची ही यूती तुटण्याच्या मार्गावर आहे.