AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईत मतांचा टक्का वाढला, मावळच्या जागेकडेही महाराष्ट्राचं लक्ष

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील 48 जागांसाठी मतदान पार पडलंय. चार टप्प्यांमध्ये हे मतदान झालं. चौथ्या टप्प्यातील मतदानानंतर आता निकालाची प्रतीक्षा आहे. काही ठिकाणी मतदान कमी झालंय, तर काही ठिकाणी मतदान कमी झालंय. त्यामुळे सर्वच उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. चौथ्या टप्प्यात मुंबईतील सहा जागांसाठी मतदानाचा टक्का वाढल्यामुळे विद्यमान खासदारांची धाकधूक वाढली आहे. तर मावळमध्ये राष्ट्रवादी […]

मुंबईत मतांचा टक्का वाढला, मावळच्या जागेकडेही महाराष्ट्राचं लक्ष
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 3:56 PM
Share

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील 48 जागांसाठी मतदान पार पडलंय. चार टप्प्यांमध्ये हे मतदान झालं. चौथ्या टप्प्यातील मतदानानंतर आता निकालाची प्रतीक्षा आहे. काही ठिकाणी मतदान कमी झालंय, तर काही ठिकाणी मतदान कमी झालंय. त्यामुळे सर्वच उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. चौथ्या टप्प्यात मुंबईतील सहा जागांसाठी मतदानाचा टक्का वाढल्यामुळे विद्यमान खासदारांची धाकधूक वाढली आहे. तर मावळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार उभे असल्याने पवार कुटुंबाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

चौथ्या टप्प्यातील मतदानाची आकडेवारी

चौथ्यात टप्प्यात 57 टक्के मतदान झालं आणि यासह महाराष्ट्रातील सर्व 48 जागांवरील रणसंग्राम थांबला.

उत्तर मुंबईत यंदा 59.32% तर 2014 मध्ये 51.67% मतदान झालं होतं.

वायव्य मुंबई 54.71% तर 2014 मध्ये 50.56% मतदानाची नोंद होती.

ईशान्य मुंबईत यावेळी 56.31% तर गेल्यावेळी 52.76% मतदान झालं होतं.

उत्तर मध्य मुंबई 52.84 % मतदान झालं, तर 2014 मध्ये 49.37% मतदान झालं होतं.

दक्षिण मध्य मुंबईत 55.35% मतदान झालं, तर 2014 मध्ये ही आकडेवारी 53.28% एवढी होती.

दक्षिण मुंबईत 52.15% मतदान झालं, तर 2014 मध्ये 52.19% मतदान झालं.

भिवंडीत 53.68% मतदान झालं, 2014 मध्ये 51.62% मतदानाची नोंद झाली होती.

कल्याणमध्ये  44.27% मतदान झालं, 2014 मध्ये ही आकडेवारी 43.06% होती.

ठाण्यात 49.95% मतदान झालं, गेल्या निवडणुकीत 51.84% मतदान झालं होतं.

नंदुरबारमध्ये 67.64 % मतदान झालं, 2014 मध्ये 66.63 % मतदान झालं होतं.

धुळ्यात 57.29% मतदान झालं, 2014 मध्ये 58.52% मतदान झालं होतं.

दिंडोरीत 64.24% मतदान झालं, तर 2014 मध्ये 63.53% मतदान झालं होतं.

नाशिकमध्ये  55.41% मतदानांची नोंद झाली, 2014 मध्ये 59.14% मतदान झालं होतं.

पालघरमध्ये  64.09% मतदान झालं, तर 2014 मध्ये ही आकडेवारी 63.49% होती.

मावळमध्ये 59.12% मतदान झालंय, गेल्या निवडणुकीत 60.16% मतदान झालं होतं.

शिरुरमध्ये 59.55% मतदान झालं, 2014 च्या निवडणुकीत 59.77% मतदान झालं होतं.

शिर्डीत 60.42% मतदान झालं, 2014 मध्ये 63.97% झालं होतं.

युतीसमोर चौथ्या टप्प्यातील जागा राखण्याचं आव्हान

2014 ची ताकद पाहता भाजपचे 8 आणि शिवसेनेचे 9 खासदार आहेत. युतीचाच दबदबा पाहता यंदा काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही आपली ताकद झोकून दिली होती. मुंबईचा विचार केला तर गेल्या वेळच्या तुलनेत मतदानाचा टक्का वाढलाय. तर उर्वरित जागांवरही चुरशीची लढाई आहे.

मतदान पार पडलंय. मात्र दिग्गजांबरोबच मावळमधून अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार, शिरुरमधून डॉ. अमोल कोल्हे, मुंबईतून अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्याकडे खास नजरा आहेत. अमोल कोल्हे आणि पार्थ पवार यांच्यासमोर शिवसेना उमेदवारांचं, तर उर्मिला मातोंडकरसमोर भाजपच्या गोपाळ शेट्टींचं आव्हान आहे.

VIDEO : 48 जागांचा लेखाजोखा

Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.