AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Lockdown : फडणवीस म्हणाले, लॉकडाऊनमुळे उद्रेक होईल, पंकजा मुंडे म्हणतात, पर्याय काय?

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मात्र सरकारच्या भूमिकेशी सहमती दर्शवणारं आणि स्वपक्षीय नेत्यांच्या भूमिकेशी परस्पर विरोधी मत मांडलं आहे.

Maharashtra Lockdown : फडणवीस म्हणाले, लॉकडाऊनमुळे उद्रेक होईल, पंकजा मुंडे म्हणतात, पर्याय काय?
लॉकडाऊनबाबत देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांची परस्पर विरोधी भूमिका
sagar joshi
sagar joshi | Updated on: Apr 10, 2021 | 8:19 PM
Share

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात कडक लॉकडाऊन निश्चित असल्याचं आता मानलं जात आहे. कारण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत: त्याबाबत संकेत दिले आहेत. राज्यात लॉकडाऊन लावण्याबाबत दोन दिवसांत निर्णय होणार आहे. मात्र, लॉकडाऊन लावताना आधी लोकांचा विचार करा, हातावर पोट असणाऱ्यांसाठी एखादं पॅकेज जाहीर करा, अशी भूमिका भाजप नेत्यांनी मांडली आहे. मात्र, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मात्र सरकारच्या भूमिकेशी सहमती दर्शवणारं आणि स्वपक्षीय नेत्यांच्या भूमिकेशी परस्पर विरोधी मत मांडलं आहे. (Pankaja Munde’s pro-government and anti-party stance on lockdown)

“Lockdown मुळे जरी गरिबांची, व्यापाराची, economy ची परिस्थिती कठीण होईल तरी पर्याय काय आहे?? Coronaची साखळी कशी तोडणार??मजुर आणि उद्योजकांना नोकरदारांना विश्वास देणे आवश्यक आहे.आरोग्य यंत्रणा वरील भार हा गांभीर्याने घेण्याची गरज आहे”, असं ट्वीट पंकजा मुंडे यांनी केलंय. एकीकडे भाजपने लॉकडाऊन करायचा असेल तर आधी गरीब जनता, व्यापारी, छोटे व्यवसायिक, हातावर पोट असणाऱ्यांसाठी काही ठोस भूमिका घ्या, पॅकेज जाहीर करा अशी मागणी केली आहे. तरच भाजप लॉकडाऊनबाबत सकारात्मक विचार करेल असं देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर आणि चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय. तर दुसरीकडे मात्र पंकजा मुंडे यांनी Lockdown मुळे जरी गरिबांची, व्यापाराची, economy ची परिस्थिती कठीण होईल तरी पर्याय काय आहे? असा प्रश्न विचारला आहे.

देवेंद्र फडणवीसांचं मत काय?

कोरोनाचा प्रादुर्भाव किती दिवस असेल हे सांगता येत नाही. त्यामुळे व्यवस्था तत्काळ उभ्या कराव्या लागतील. जनतेची, व्यापाऱ्यांची भावना लक्षात घ्यायला हवी. त्यांचं मागील वर्ष वाया गेले. कर, वीज बिल, कर्जाचे हप्ते भरावे लागले. त्यामुळे जीवन जगायचं कसं असा प्रश्न जनतेसमोर आहे, असं मत देवेंद्र फडणवीस यांनी सर्वपक्षीय बैठक मांडलं आहे. त्याचबरोबर कोरोना रिपोर्ट्स तात्काळ कसे मिळतील हे पाहावं लागेल. रेमडेसिव्हीर कसं उपलब्ध होतील हे पाहिलं पाहिजे, असंही फडणवीस म्हणाले.

‘आमदारांचा निधी कमी करा, कामगारांना मदत द्या’

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांशी बोलताना महत्वाचं मत मांडलं आहे. राज्यातील आमदारांचा विकासनिधी 2 कोटी रुपयांनी कमी करा आणि कामगारांना 5 हजार रुपये द्या, अशी भूमिका चंद्रकांत पाटील यांनी मांडली आहे. तत्पूर्वी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनीही लॉकडाऊनचा विचार करायचा असेल तर आधी लोकांचा विचार करा, असं मत मांडलं आहे.

संबंधित बातम्या :

Maharashtra Lockdown : राज्यात लॉकडाऊन निश्चित! 2 दिवसांत निर्णय होणार, निर्बंध 8 की 14 दिवस?

Maharashtra Lockdown : मुख्यमंत्री लॉकडाऊनसाठी आग्रही, काँग्रेसची भूमिका काय?

Pankaja Munde’s pro-government and anti-party stance on lockdown

Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.