महाराष्ट्र लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर, मुंबई लोकलच्या फेऱ्याही कमी करणार, मंत्री विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य

| Updated on: Feb 26, 2021 | 10:33 AM

महाराष्ट्रातली कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता राज्य पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहे. तसंच मुंबई लोकलच्या फेऱ्याही कमी करण्याबाबत विचार सुरु असल्याचं वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केलं.

महाराष्ट्र लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर, मुंबई लोकलच्या फेऱ्याही कमी करणार, मंत्री विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य
vijay wadettiwar
Follow us on

नागपूर :  महाराष्ट्रातली कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता राज्य पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहे. तसंच मुंबई लोकलच्या फेऱ्याही कमी करण्याबाबत विचार सुरु असल्याचं मोठं आणि महत्त्वाचं वक्तव्य राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.(Maharashtra Minister Vijay Wadettiwar On Corona Updates And Maharashtra Lokcdown)

विजय वडेट्टीवर नेमकं काय म्हणाले…?

महाराष्ट्रातली एकूण वाढती रुग्णसंख्या ही चिंतेची बाब आहे. शासन पातळीवर उपाययोजना सुरु आहेत. उपाययोजना जरी सुरु असल्या तरी त्याचा रिझल्ट काय होईल, हे आज सांगता येत नसलं तरी महाराष्ट्र लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहे, असं आपल्याला म्हणता येईल, असं वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केलं.

आताच्या स्थितीत लॉकडाऊन परवडणारं नाही, अनेकांच्या पोटापाण्याचा प्रश्न आहे पण रुग्ण वाढ होतीय, हे गंभीर आहे. राज्यातील काही शहरात कडक निर्बंध घ्यावे लागतील, असं सांगत लॉकडाऊनचा सूचक इशारा मंत्री वडेट्टीवार यांनी दिला आहे.

मुंबईच्या लोकल फेऱ्या कमी होणार? महाराष्ट्रात लॉकडाऊन?

विदर्भातील चार राज्यात कोरोनाची परिस्थिती गंभीर आहे. महाराष्ट्रही कोरोनाच्या उंबरठ्यावर आहे. त्यामुळे सरकार गंभीर असल्यानेच अधिवेशनचा कामकाजाचा कालावधी आठ दिवसांचा ठेवण्यात आला आहे, असं सांगतानाच मुंबईतही कोरोनाची परिस्थिती गंभीर असल्याने मुंबईतील लोकल फेऱ्या कमी करण्याचा विचार सुरू आहे, असंही ते म्हणाले. मुंबईत लोकलमध्ये प्रचंड गर्दी होत आहे. ही गर्दी टाळण्यासाठी कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

मुंबई लोकलच्या फेऱ्या कमी करण्याबाबत विचार

मुंबईत सर्वसामान्यांना लोक सेवा प्रवास सुरु केल्यानंतर कोरोनाचे आकडे वाढायला सुरुवात झाल्याचं समोर आलं आहे. यावर बोलताना वडेट्टीवार म्हणाले, “मुंबई लोकलमध्ये गर्दी कशी कमी होईल याचा विचार सुरु आहे. तसंच मुंबई लोकलच्या फेऱ्या कमी करण्याबाबत विचार” असल्याची महत्त्वाची माहिती त्यांनी दिली.

पोहरादेवीच्या गर्दीला जबाबदार असेल त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल

मंत्री संजय राठोड यांच्यावर प्रश्न विचारला असता वडेट्टीवार यांनी थेट प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय, या प्रकरणात कुणालाही पाठीशी घालणार नाही.
पोहरादेवीच्या गर्दीला जबाबदार असेल त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असं वडेट्टीवार म्हणाले.

विदर्भात परिस्थिती गंभीर

विदर्भातील चार जिल्ह्यातील परिस्थिती गंभीर झाली आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. मंगलकार्यालयांवर वॉच ठेवण्यात येत आहे. तसेच सिनेमागृहे बंद करण्याचा विचार सुरू आहे. विदर्भात एक बैठक घेऊन कोरोना परिस्थितीच्या अनुषंगाने काही कठोर निर्णय घेण्यात येणार असल्याचं

(Maharashtra Minister Vijay Wadettiwar On Corona Updates And Maharashtra Lokcdown)

हे ही वाचा :

महाराष्ट्राबाहेर जाताय? जरा जपून! या ‘अकरा’ राज्यात नो एन्ट्री; कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट दाखवणं बंधनकारक

डियर नीता भाभी और मुकेश भय्या, यह तो सिर्फ ट्रेलर है

पुणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांना जीवे मारण्याची धमकी