AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाशिक दुर्घटनेची जबाबदारी भाजपनं घ्यावी, महापौर आणि भाजपचे 3 आमदार फरार झाले काय? काँग्रेसचा सवाल

नाशिक महापालिकेत भाजपची सत्ता आहे. भाजपने या दुर्घटनेची जबाबदारी स्वीकारायला हवी, अशी मागणी सचिन सावंत यांनी केलीय.

नाशिक दुर्घटनेची जबाबदारी भाजपनं घ्यावी, महापौर आणि भाजपचे 3 आमदार फरार झाले काय? काँग्रेसचा सवाल
नाशिक दुर्घटनेनंतर सचिन सावंत यांची भाजप नेत्यांवर टीका
| Updated on: Apr 21, 2021 | 5:25 PM
Share

नाशिक : नाशिकमधील झाकिर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन टाकीत मोठी गळती झाली आणि ऑक्सिजन पुरवठ्या अभावी रुग्णालयातील 22 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यात मोठी खळबळ उडालीय. अशावेळी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवलाय. नाशिक महापालिकेत भाजपची सत्ता आहे. भाजपने या दुर्घटनेची जबाबदारी स्वीकारायला हवी, अशी मागणी सचिन सावंत यांनी केलीय. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी घटनेच्या सखोल चौकशीची मागणी केलीय. (BJP should accept responsibility for Nashik oxygen leak tragedy-Sachin Sawant)

‘भाजपचे महापौर, 3 आमदार फरार झाले काय?’

‘झाकिर हुसेन रुग्णालयात झालेल्या दुर्घटनेची चौकशी करण्याची मागणी आम्ही करतो. या घटनेला जबाबदार असलेल्यांना अटक करायला हवं. हे रुग्णालय नाशिक महापालिकेचं आहे आणि महापालिका भाजपच्या ताब्यात आहे. त्यामुळे भाजपने या दुर्घटनेची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. महापौर आणि भाजपचे 3 आमदार कुठे आहेत? ते फरार झाले काय?’ असा सवाल सचिन सावंत यांनी विचारलाय.

‘भाजप नेत्यांचं मानसिक संतुलन बिघडलंय का?’

या दुर्घटनेची चौकशी राज्य सरकारने करावी अशी आमची मागणी आहे. दरम्यान, भाजप नेते मात्र राज्य सरकारला जबाबदार धरत आहेत. पण नाशिक महापालिकेत भाजपची सत्ता आहे. त्या ऑक्सिजन टाकीचं काम नुकतंच करण्यात आलं होतं. ते कामाचं टेंडर महापालिकेनंच काढलं. तसंच ऑक्सिजन पुरवठा करण्याचं टेंडर महापालिकेनंच दिलं. अशावेळी सरकार कसं जबाबदार असेल? मग आरोप करणाऱ्या भाजप नेत्यांचं मानसिक संतुलन बिघडलंय का? अशी शंका मनात येत असल्याची टीकाही सावंत यांनी केलीय.

आयुक्तांवर कारवाईची दरेकरांची मागणी

प्रविण दरेकर म्हणाले, “नाशिकमध्ये घडलेली घटना ह्रद्य हेलावणारी आणि व्यथित करणारी आहे. या घटनेत स्वाभाविकपणे हलगर्जीपणा सरकारचाच आहे. महापालिका असो की जिल्हा ते सरकारच्या नियंत्रणात काम करत असते. या साथीरोगात महापालिका क्षेत्रात आयुक्तांना अधिकार आहेत. त्यामुळे ही जबाबदारी आयुक्तांची आहे. कारण अशाकाळात महापालिकांना किंवा जिल्हा परिषदांना अधिकार नसतात. आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार असतात. या खात्याचं नियंत्रण करणारी लोकं आणि सरकार यांची ही जबाबदारी आहे. मुख्यमंत्र्यांचं आणि सरकारचं नियोजनच राज्याच्या आरोग्य व्यवस्थेवर असतं. म्हणूनच याला सरकार जबाबदार आहे आणि आयुक्त दोषी आहेत.”

संबंधित बातम्या :

Nashik Oxygen Leak Video: अर्धा तास पहिले ऑक्सिजन संपला, फडफड करुन मम्मी मेली, नाशिकच्या ‘त्या’ मुलीचा आक्रोश

Nashik Oxygen Leak : नाशिकच्या दुर्घटनेने संपूर्ण महाराष्ट्र शोकमग्न!,मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपये मदत : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

BJP should accept responsibility for Nashik oxygen leak tragedy-Sachin Sawant

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.