AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut : ‘हे बाळासाहेब ठाकरेंच्या स्वप्नातील सरकार’, संजय राऊतांचा मोठा दावा; शरद पवार काय म्हणाले?

'आता जे सरकार स्थापन झालं आहे ते एकेकाळी बाळासाहेबांचं स्वप्न होतं, बाळासाहेबांची भूमिका होती. आता जे कुणी गैरसमज निर्माण करत आहेत, त्यांना शिवसेनेचा विचार आणि बाळासाहेबांची भूमिका माहिती नाही'.

Sanjay Raut : 'हे बाळासाहेब ठाकरेंच्या स्वप्नातील सरकार', संजय राऊतांचा मोठा दावा; शरद पवार काय म्हणाले?
बाळासाहेब ठाकरे, संजय राऊत, शरद पवारImage Credit source: TV9
| Updated on: Jun 04, 2022 | 7:09 PM
Share

मुंबई : राज्यात महाविकास आघाडी सरकार आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजप नेत्यांमध्ये जोरदार टीका आणि आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळत आहेत. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) असते तर हे सरकार बनलं नसतं. बाळासाहेबांनी अशा खुर्चीला लाथ घातली असती, असा दावा भाजप नेत्यांकडून केला जातो. त्याबाबत आज पुण्यात शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना प्रश्न विचारला असता राऊतांनी मोठा दावा केलाय. हे सरकार बाळासाहेबांच्या स्वप्नातील सरकार आहे. ही बाळासाहेबांचीच भूमिका होती, असा प्रतिदावा संजय राऊत यांनी केलाय. पुण्यात आज शरद पवार (Sharad Pawar) आणि संजय राऊत यांची एकाच व्यासपीठावर मुलाखत पार पडली. त्यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

‘एकेकाळी बाळासाहेबांचं स्वप्न होतं, बाळासाहेबांची भूमिका होती’

संजय राऊत यांनी प्रश्न विचारण्यात आला की बाळासाहेब ठाकरे यांना हे सरकार मान्य नसतं असा दावा भाजपकडून केला जातो. त्यावर राऊथ म्हणाले की, ‘अजिबात नाही… अनेकदा पवारसाहेब आणि बाळासाहेबांनी व्यासपीठ शेअर केलं आहे. इतकंच नाही तर बाळासाहेबांनी जाहीरपणे सांगितलंय की ही ताकद आणि आपली ताकद एकत्र आली तर आपण दिल्लीला झुकवू. त्यामुळे आता जे सरकार स्थापन झालं आहे ते एकेकाळी बाळासाहेबांचं स्वप्न होतं, बाळासाहेबांची भूमिका होती. आता जे कुणी गैरसमज निर्माण करत आहेत, त्यांना शिवसेनेचा विचार आणि बाळासाहेबांची भूमिका माहिती नाही. त्यांनी अभ्यास केला पाहिजे, मी त्यांची शिकवणी घ्यायला तयार आहे. यापूर्वीही असे प्रयत्न झाले आहेत. भाजपचे आभार मानायला हवेत की महाराष्ट्राच्या मनातील सरकार आणायला त्यांनी आम्हाला उत्तेजन दिलं’, असा टोलाही त्यांनी लगावलाय.

…आणि राजकीय क्रायसिसवर उत्तर सापडतं – पवार

शरद पवार यांनाही आताचं महाविकास आघाडी सरकार आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेबाबत विचारलं असता, ‘जेव्हा क्रायसिस असतो आणि विशेषत: राजकीय क्रायसिस तयार होतो, त्यावेळेला बाळासाहेब असते तर त्यांनी काय केलं असतं, हा विचार डोक्यात येतो आणि जो क्रायसिस आहे त्याचं उत्तर सापडतं’, असं शरद पवार म्हणाले.

चंद्रपूरमध्ये भाजपची ठाकरेंच्या सेनेला ऑफर? महापौर कोणाचा; चर्चा सुरु
चंद्रपूरमध्ये भाजपची ठाकरेंच्या सेनेला ऑफर? महापौर कोणाचा; चर्चा सुरु.
बारामतीत होणारी पोटनिवडणूक एकतर्फी? संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?
बारामतीत होणारी पोटनिवडणूक एकतर्फी? संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?.
PF Withdrawal Update : खोटं बोलून PF काढताय? लगेच थांबा
PF Withdrawal Update : खोटं बोलून PF काढताय? लगेच थांबा.
नवी मुंबईत मद्यधुंद इनोवा चालकाची वाहनांना धडक | VIDEO
नवी मुंबईत मद्यधुंद इनोवा चालकाची वाहनांना धडक | VIDEO.
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील पनवेल टोल नाक्यावर गोंधळ
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील पनवेल टोल नाक्यावर गोंधळ.
रहेजाच्या ऑफिसची तोडफोड; वंचितचे कार्यकर्ते अटकेत
रहेजाच्या ऑफिसची तोडफोड; वंचितचे कार्यकर्ते अटकेत.
संघाच्या शाखेत राजकारण होत नाही! मोहन भागवतांनी स्पष्टच सांगित
संघाच्या शाखेत राजकारण होत नाही! मोहन भागवतांनी स्पष्टच सांगित.
फडणवीसांकडून मेक इन इंडिया व औद्योगिक विकासावर भर
फडणवीसांकडून मेक इन इंडिया व औद्योगिक विकासावर भर.
भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर जाणार! फडणवीसांनी व्यक्त केला
भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर जाणार! फडणवीसांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाला सलमान खान आला म्हणून काय बिघडलं? संजय शिरसाट यांचा प्रश्न
कार्यक्रमाला सलमान खान आला म्हणून काय बिघडलं? संजय शिरसाट यांचा प्रश्न.