AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकनाथ शिंदेंच्या शिलेदाराने महायुतीतलं वादळ थोपवलं, रायगडमध्ये जुईली दळवी उमेदवारी अर्ज मागे घेणार?

महायुतीचा नियम पाळला पाहिजे अश्या सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पक्षातील नेत्यांना देण्यात आल्या आहेत त्यामुळे आमदार महेंद्र दळवी आपल्या मुलीचा या निवडणुकीतील अर्ज माघारी घेणार असे सांगितले जात आहे.

एकनाथ शिंदेंच्या शिलेदाराने महायुतीतलं वादळ थोपवलं, रायगडमध्ये जुईली दळवी उमेदवारी अर्ज मागे घेणार?
eknath shindeImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 02, 2026 | 7:28 PM
Share

Raigad Vidhan Parishad Election : राज्यात विधानपरिषद निवडणुकीमुळे राजकीय वातावरण भारलेले आहे. या निवडणुकीसाठी महायुतीमध्ये अनेक जागांवर बंडखोरी झालेली आहे. काही ठिकाणी तर काहीही झालं तरी आम्ही उमेदवारी अर्ज मागे घेणार नाही, असा पवित्रा काही बंडखोरांनी घेतला आहे. महायुतीत रायगडच्या जागेवरूनही धुसफूस पाहायला मिळली. या जागेवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे आमदार महेंद्र दळवी यांची मुलगी जुईली दळवी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. रायगडची जागा राष्ट्रवादीला सुटलेली असूनही तेथे शिवसेना आमदाराच्या मुलीने अर्ज भरल्याने मोठा पेच निर्माण झाला होता. दरम्यान, आता याच महायुतीतील पेचावर एकनाथ शिंदे यांचे विश्वासू मानले जाणारे मंत्री उदय सामंत यांच्या पुढाकाराने तोडगा निघाल्याचे म्हटले जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार जुईली दळवी या लवकरच आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शक्यता आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार कोकणातील विधानपरिषदेच्या निवडणुकीतील बंडखोरी शमली आहे. मंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वात एक्सप्रेस टॉवरमध्ये कोकणातील शिंदेंच्या शिवसेनेचे लोकप्रतिनिधी आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. आमदार महेंद्र दळवी यांच्या कन्या जुईली दळवी यांनी देखील बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला होता.कोकणात महायुती मधून अनिकेत तटकरे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यानंतर महायुतीचा नियम पाळला पाहिजे अश्या सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पक्षातील नेत्यांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळेच आमदार महेंद्र दळवी आपल्या मुलीचा या निवडणुकीतील अर्ज माघारी घेणार आहेत, असे सूत्रांकडून सांगितले जात आहे.

गोगावले यांना पालकमंत्रिपद मिळणार

दरम्यान, काहीही झालं तरी या जागेवर रायगडच्या जागेवर शिवसेनेचाच उमेदवार असावा, अशी मागणी मंत्री भरत गोगावले यांच्याकडून केली जात होती. या जागेवर ते त्यांच्या मुलासाठीदेखील प्रयत्न करत होते. जागा मिळत नसल्याचे समजताच त्यांनी तटकरे कुटुंबाला उमेदवारी मिळत असेल तर शिवसेनेला रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रिपद द्यावे, अशी मागणी गोगावले यांनी केली आहे. त्यामुळे आता भविष्यात नेमके काय होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Follow Us
डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट
Aishwarya Jadhav Dancer | डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट...
दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
Dancer Radha Patil News | पुण्यात दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
Baramati | बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं स्वतंत्र पॅनल; सोमेश्वर कारखान्याची निवडणूक रंगणार
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात