AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रिल बनवायला गेला, असा कुदला आणि दोन्ही पाय तोडून बसला…मुर्खपणा चांगलाच भोवला!

आजकाल प्रत्येकजण सोशल मीडिया वापरतो. काही लोक मनोरंजन म्हणून सोशल मीडियावर असतात. तर काही लोक कन्टेंट क्रिएटर म्हणून सोशल मीडियावर काम करतात. वेगवेगळ्या प्रकारचं कन्टेंट तयार करून आजकाल काही लोक महिन्याला लाखो रुपये कमवत आहेत. परंतु कन्टेंट क्रिएशनचे हेच वेड कधीकधी जीवघेणे ठरू शकते. नेटकऱ्यांना आकर्षित करण्यासाठी तसेच आपले फॉलोअर्स वाढवण्यासाठी काही लोक काहीतरी विचित्र […]

रिल बनवायला गेला, असा कुदला आणि दोन्ही पाय तोडून बसला...मुर्खपणा चांगलाच भोवला!
up jhansi viral videoImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 07, 2026 | 7:19 PM
Share

आजकाल प्रत्येकजण सोशल मीडिया वापरतो. काही लोक मनोरंजन म्हणून सोशल मीडियावर असतात. तर काही लोक कन्टेंट क्रिएटर म्हणून सोशल मीडियावर काम करतात. वेगवेगळ्या प्रकारचं कन्टेंट तयार करून आजकाल काही लोक महिन्याला लाखो रुपये कमवत आहेत. परंतु कन्टेंट क्रिएशनचे हेच वेड कधीकधी जीवघेणे ठरू शकते. नेटकऱ्यांना आकर्षित करण्यासाठी तसेच आपले फॉलोअर्स वाढवण्यासाठी काही लोक काहीतरी विचित्र गोष्टी करतात. याचे परिणामही त्यांना भोगावे लागतात. सध्या अशाच एक कन्टेंट क्रिएटर चांगलाच गोत्यात आला आहे. रिल बवण्याच्या नादात त्याने पाण्यात उडी मारली. परंतु उडी घेतल्यानंतर आता तो दोन्ही पाय मोडून बसला आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार समोर आलेली ही घटना उत्तर प्रदेशातील झांसी येथील आहे. येथे एका तरुणाने रिल करण्याच्या नादात नको ते केलं. त्यामुळे त्याचे दोन्ही पाय मोडले आहेत. त्याने एका पुलावर उभे राहात खाली नदीच्या पाण्यात उडी घेतली. पण नदीमध्ये पाणी कमी असल्याने त्याचे पाय थेट खाली तळाला लागले. यातच त्याचे दोन्ही पाय मोडले.

उडी घेताच तो थेट नदीच्या तळाशी गेला

ही घटना घडली तेव्हा त्याचे मित्र मोबाईल हातात घेऊन व्हिडीओ रेकॉर्ड करत होते. पाय मोडलेला तरूण अगोदर पुलावर उभा राहिलेला दिसत आहे. त्याने कॅमेऱ्याकडे हात करून थेट 30 फुटावरून पाण्यात उडी घेतली. उडी घेताच तो थेट नदीच्या तळाशी गेला. यातच त्याचे दोन्ही पाय मोडले. ही घटना घडल्यानंतर त्याला तत्काळ एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या एका पायात दोन रॉड टाकण्यात आले आहेत. तर दुसऱ्या पायावर ऑपरेशन केले जाणार आहे.

दरम्यान, या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. रिल तयार करण्याच्या नादात, प्रसिद्धीच्या हव्यासापोटी नको त्या गोष्टी करू नये, स्वत:ला धोक्यात टाकू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

Follow Us
डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट
Aishwarya Jadhav Dancer | डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट...
दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
Dancer Radha Patil News | पुण्यात दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
Baramati | बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं स्वतंत्र पॅनल; सोमेश्वर कारखान्याची निवडणूक रंगणार
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात