AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Shastra : हे चार फोटो घरात नकोच, आयुष्यात येतील अडचणी, वास्तुशास्त्र काय सांगतं?

हिंदू धर्मामध्ये वास्तुशास्त्राला मानाचं स्थान आहे. जर तुमच्या घराची रचना ही वास्तुशास्त्राप्रमाणे नसेल, त्यामध्ये काही त्रुटी असतील तर तुम्हाला त्याचा फटका बसू शकतो, अशी मान्यता आहे. तसेच घरात काही विशिष्ट वस्तू देखील असू नये, असंही वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

Vastu Shastra : हे चार फोटो घरात नकोच, आयुष्यात येतील अडचणी, वास्तुशास्त्र काय सांगतं?
vastu shastra Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 07, 2026 | 7:03 PM
Share

हिंदू धर्मामध्ये वास्तुशास्त्राला महत्त्वाचं स्थान आहे. हिंदू धर्मशास्त्रानुसार जर तुमच्या घराची रचना ही वास्तुशास्त्राप्रमाणे नसेल तर तुमच्या घरात अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात. जसं की काहीही कारण नसताना अचानक वादविवाद होतात. कुटुंब प्रमुखाचं घरातील इतर सदस्यांसोबत पटत नाही. पती-पत्नीमध्ये सारखी भांडणं होतात. घर अशांत बनतं, दरम्यान याचा परिणामा हा तुमच्या घरातील लहान मुलांच्या मनावर देखील होतो, आणि कलांतराने अशी मुलं चिडखोर बनतात, हट्टी बनतात. एवढंच नाही तर तुम्हाला काही आर्थिक संकटांचा सामना देखील करावा लागू शकतो, त्यामुळे घराची रचना नेहमी वास्तुशास्त्रानुसार असावी, असं हिंदू धर्मशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. एवढंच नाही तर असे देखील काही फोटो आहेत, ते घरात लावणं हे वास्तुशास्त्रामध्ये अशुभ सांगण्यात आलं आहे, अशा फोटोंमुळे घरात कधीही शातंता राहत नाही, चला तर मग जाणून घेऊयात, वास्तुशास्त्रामध्ये नेमकं काय सांगण्यात आलं आहे.

युद्धाचे प्रसंग असलेले फोटो – वास्तुशास्त्रानुसार घराच्या कोणत्याच बाजूला युद्धाचे प्रसंग असलेला फोटो लावू नये. यामुळे घरातील शांतता भंग पावते आणि सारखे वादविवाद सुरू होतात. तुम्ही जर घरात असे फोटो लावले असतील तर ते आजच काढून टाका. या फोटोतून जी नकारात्मक ऊर्जा बाहेर येते तिचा परिणाम हा तुमच्यावर पडत असतो, त्यामुळे कधीही घरात युद्धाचे प्रसंग असलेले फोटो लावू नका, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

हिंस्त्र प्राण्यांचे फोटो – वास्तुशास्त्रानुसार घरात हिंस्त्र प्राण्यांचे फोटो देखील ठेवू नये, अशा प्रकारचे फोटो घरात ठेवणं वास्तुशास्त्रामध्ये अशुभ माण्यात आलं आहे. अशा प्रकारच्या फोटोंमुळे घरातील सकारात्मक ऊर्जा कमी होते, आणि नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो, त्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो, यामुळे तुमच्या आयुष्यात काही अडचणी देखील येऊ शकतात.

काटेरी वृक्षाचे फोटो – वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरात कधीही काटेरी वृक्ष असलेल्या झाडांचे फोटो लावू नये, जसं की निवडूंग त्याचप्रमाणे कॅकट्स अशा प्रकारचे फोटो तुम्ही तुमच्या घरात लावल्यास त्यामुळे घराला बरकत प्रात होत नाही, हातात पैसा टिकत नाही, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट
Aishwarya Jadhav Dancer | डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट...
दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
Dancer Radha Patil News | पुण्यात दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
Baramati | बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं स्वतंत्र पॅनल; सोमेश्वर कारखान्याची निवडणूक रंगणार
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात