AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेनेच्या पहिल्या मुख्यमंत्र्यांच्या ‘मनातील मुख्यमंत्री’ कोण?

महासेनाआघाडी सरकारने बाळासाहेबांची प्रतिमा समोर ठेवून कामकाज करावं, त्यामुळे ते चुकू शकणार नाहीत, अशा भावना मनोहर जोशींनी व्यक्त केल्या

शिवसेनेच्या पहिल्या मुख्यमंत्र्यांच्या 'मनातील मुख्यमंत्री' कोण?
| Updated on: Nov 17, 2019 | 10:58 AM
Share

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सातव्या स्मृतिदिनी आदरांजली वाहण्यासाठी आलेले शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांना बाळासाहेबांच्या आठवणींनी गहिवरुन आलं. शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री राहिलेल्या मनोहर जोशींच्या मनातही पुढील मुख्यमंत्रिपदासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचंच नाव आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपद स्वीकारावे, ही सूचना अत्यंत योग्य असल्याचं जोशी (Manohar Joshi on Maharashtra CM) म्हणाले.

बाळासाहेब ठाकरे यांचं व्यक्तिमत्व अद्वितीय होतं. 45 वर्ष मी त्यांच्या सहवासात राहिलो, मात्र एकही दिवस कंटाळवाणा नव्हता. ते आदर्श आहेत, दैवत आहेत. ते महाराष्ट्राचा मोठा आधार होते, असं मनोहर जोशी ‘टीव्ही9 मराठी’शी बोलताना म्हणाले.

महासेनाआघाडी सरकारने बाळासाहेबांची प्रतिमा समोर ठेवून कामकाज करावं, त्यामुळे ते चुकू शकणार नाहीत, अशा भावना व्यक्त करतानाच, अर्थात हे उद्धव ठाकरेंना सांगायची गरज नसल्याचं जोशी म्हणाले.

महासेनाआघाडीत काही वैचारिक मतभेद होतील, मात्र त्यांनी ठरवलं तर वैचारिक मतभेद बाजूला ठेवता येतील. तीन पक्ष एकत्र आल्याने मी आश्चर्यचकित झालो होतो. मात्र राजकीय पक्षाने काही मुद्द्यांवर तरी एकत्र आलं पाहिजे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपद स्वीकारावे, ही सूचना अत्यंत योग्य असल्याचं मनोहर जोशी यांनी म्हटलं.

बाळासाहेबांकडून स्वाभिमान जपण्याचा मूलमंत्र, फडणवीसांचा शिवसेनेला खोचक टोला

आघाडीत सामील होत असताना विचार हळूहळू बदलत आहेत. एकच भूमिका पकडून ठेऊ नये, चांगले स्वीकारत जावं, असा सल्ला मनोहर जोशी यांनी दिला. सेनेचं सरकार असावं, ही इच्छा आहे, मात्र सरकार महासेनाआघाडीचंच होईल, असा विश्वास जोशींनी बोलून दाखवला.

शिवसेनेचा भविष्यकाळ चांगला आहे. त्याची ही सुरुवात आहे. उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ठरवलं तर ते केव्हाही एकत्र येऊ शकतात, याबद्दल आश्चर्य वाटणार नाही, असंही मनोहर जोशी (Manohar Joshi on Maharashtra CM) म्हणाले.

Follow Us
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.