AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मराठवाड्यात कोण जिंकणार? भाजप-राष्ट्रवादीच्या उमेदवाराला बंडखोरांकडूनच आव्हान…

भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही उमेदवारांना पक्षातूनच बंडखोरीला सामोरं जावं लागणार आहे.

मराठवाड्यात कोण जिंकणार? भाजप-राष्ट्रवादीच्या उमेदवाराला बंडखोरांकडूनच आव्हान...
Image Credit source: social media
मंजिरी धर्माधिकारी
मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Jan 21, 2023 | 11:15 AM
Share

औरंगाबादः राज्यातील विधान परिषद निवडणुकीत (MLC Election) मतदानाची तारीख जसजशी जवळ येतेय, तशा राजकीय (Politics) हालचालींना वेग येतोय. यासोबत प्रमुख उमेदवारांसमोरी आव्हानंही अधिक स्पष्ट होत आहेत. मराठवाडा (Marathwada) शिक्षक मतदार संघ निवडणुकीतही मुख्य उमेदवारांसमोर पक्षातल्याच बंडखोरांचं आव्हान असल्याचं दिसून येतंय.

मराठवाडा शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत एकूण १५ उमेदवारांनी अर्ज भरला होता. एकाने माघार घेतल्यानंतर १४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विक्रम काळे आणि भाजपचे उमेदवार किरण पाटील यांच्यात खरी लढत होणार आहे.

राष्ट्रवादीतली बंडखोरी…

भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही उमेदवारांना पक्षातूनच बंडखोरीला सामोरं जावं लागणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून विक्रम काळे यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या वक्ता सेलचे अध्यक्ष प्रदीप सोळुंके यांनीही आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलेला नाही.

माझ्यासारख्या अनेक कर्याकर्त्यांनी आजपर्यंत विक्रम काळे यांच्यासाठी काम केले. पण आमदार आमच्याकडे ढुंमकूनही पाहत नाहीत, त्यामुळे पक्षाने त्यांना उमेदवारी दिलीच कशी, असा सवाल त्यांनी विचारला आहे. त्यामुळे विक्रम काळे यांची मतं प्रदीप सोळुंके यांच्यामुळे फुटणार असल्याची दाट शक्यता आहे.

भाजपचीही शिष्टाई अपयशी?

तर भाजपचे उमेदवार किरण पाटील यांच्यासमोरही बंडखोरीचं मोठं आव्हान आहे. दोनच महिन्यांपूर्वी पक्षात आलेले किरण पाटील यांना शिक्षक मतदार नोंदणीसाठी फार वेळ मिळालेला नाही. ३० जानेवारी रोजी मतदान आहे. भाजप असंख्य मतदारांपर्यंत पोहोचू शकेल की नाही, याची शंका आहे.

काही दिवसांपूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मराठवाड्यात आले होते. मात्र भाजपमधील नाराजांची समजूत काढण्यात ते अपयशी ठरल्याचं समोर आलंय. त्यामुळेच नितीन कुलकर्णी यांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवलाय. आता किरण पाटील यांच्यासमोर नितीन कुलकर्णी यांचंही आव्हान आहे.

भाजपात सतत अन्याय होत असल्याने मी निवडणुकीत उडी घेतली आहे. माझी लढाई राष्ट्रवादी काँग्रसचे उमेदवार आमदार विक्रम काळे यांच्याविरुद्ध आहे. तर राष्ट्रवादीचे बंडखोर प्रदीप सोळुंके आणि मी दोघेही समदुःखी असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Follow Us
पावसाळी अधिवेशनाची तारीख जाहीर; कर्जमाफीच्या मुद्द्यावर सरकारला....
Maharashtra Monsoon Session | पावसाळी अधिवेशनाची तारीख जाहीर; कर्जमाफीच्या मुद्द्यावर सरकारला विरोधक घेरणार!
अखेर तेच घडलं! ...म्हणून नेते बैठकीला गैरहजर; ठाकरेंचा पक्षात पुन्हा
अखेर तेच घडलं! ...म्हणून नेते बैठकीला गैरहजर; ठाकरेंचा पक्षात पुन्हा फूट पडणार? काही खासदार थेट...
मनोज जरांगेंचा नवा अल्टिमेटम, 1.40 लाख नोंदी सापडल्या तरी...सरकारवर
Manoj Jarange | मनोज जरांगेंचा नवा अल्टिमेटम, 1.40 लाख नोंदी सापडल्या तरी...सरकारवर आता पुन्हा दबाव!
महावितरण अधिकाऱ्यांवर बांगड्या फेकत शिवसेनेचा संताप
Kalyan | महावितरण अधिकाऱ्यांवर बांगड्या फेकत शिवसेनेचा संताप; स्मार्ट मीटरवरून कल्याणमध्ये हल्लाबोल!
शिंदेंचं नाव का वगळं? जाब विचारण्यसाठी शिवसैनीक थेट पालिकेत दाखल
शिंदेंचं नाव का वगळं? जाब विचारण्यसाठी शिवसैनीक थेट पालिकेत दाखल, काय मिळालं उत्तर?
वयाच्या 30 व्या वर्षी अभिनेत्री संचिता उगालेने संपवलं जीवन
मोठी बातमी! मनोरंजन विश्व हादरलं; वयाच्या 30 व्या वर्षी अभिनेत्री संचिता उगालेने संपवलं जीवन, नेमकं काय घडलं?
महायुतीत मोठी खळबळ! आम्हाला वेगळंच... इकडे निमंत्रण पत्रिकेवरून बिनसल
महायुतीत मोठी खळबळ! आम्हाला वेगळंच... इकडे निमंत्रण पत्रिकेवरून बिनसलं तिकडे स्वबळाची भाषा; राजकारणात मोठं वादळ?
संघ, विश्व हिंदू परिषदेतील कार्यकर्त्यांना घडवा; ठाकरेंचा भाजपला सल्ला
Sharmila Thackeray | आमची पोरं कशाला चोरता, संघ, विश्व हिंदू परिषदेतील कार्यकर्त्यांना घडवा; शर्मिला ठाकरेंचा भाजपला सल्ला
शाळेच्या पहिल्या दिवशी चिमुकल्यांच्या स्वागतासाठी CM फडणवीस उपस्थित
शाळेच्या पहिल्या दिवशी चिमुकल्यांच्या स्वागतासाठी CM फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे, सुनेत्रा पवार शाळांमध्ये उपस्थित
सरकारवर विश्वास वाढला, पण...; मनोज जरांगेंचं मोठं विधान चर्चेत
Manoj Jaranage | सरकारवर विश्वास वाढला, पण...; मनोज जरांगेंचं मोठं विधान चर्चेत