एकही खासदार नसताना मंत्रिपदं कसं? आठवलेंनी गुपित फोडलं!

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांनी काल (30 मे) पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यानंतर त्यांच्या 57 सहकारी मंत्र्यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील सात जणांचा समावेश झाला. यात नितीन गडकरी, पियुष गोयल, प्रकाश जावडेकर, अरविंद सावंत, संजय धोत्रे, रावसाहेब दानवे आणि रामदास आठवले यांचा समावेश आहे. रामदास आठवले यांनी लोकसभेची एकही जागा लढवली नव्हती, तरीही […]

एकही खासदार नसताना मंत्रिपदं कसं? आठवलेंनी गुपित फोडलं!
Follow us
| Updated on: May 31, 2019 | 8:28 AM

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांनी काल (30 मे) पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यानंतर त्यांच्या 57 सहकारी मंत्र्यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील सात जणांचा समावेश झाला. यात नितीन गडकरी, पियुष गोयल, प्रकाश जावडेकर, अरविंद सावंत, संजय धोत्रे, रावसाहेब दानवे आणि रामदास आठवले यांचा समावेश आहे. रामदास आठवले यांनी लोकसभेची एकही जागा लढवली नव्हती, तरीही त्यांना केंद्रात मंत्रिपद मिळालं. त्यामुळे अनेकांनी आश्चर्यही व्यक्त केलं. मात्र, एकही खासदार नसताना केंद्रात मंत्रिपद कसं मिळालं, याचं गुपित स्वत: रामदास आठवले यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना फोडलं आहे.

“मंत्रिपद दुसऱ्यांना मिळण्याचे गुपित म्हणजे मी नरेंद्र मोदींच्या प्रत्येक सभेला उपस्थित होतो. मोदी म्हणायचे की, फडणवीस तुमच्यावर खुश आहेत आणि फडणवीस म्हणायचे की, मोदी तुमच्यावर खुश आहेत. मी म्हणायचो तुम्ही दोघे खुश तर मीही खुश.” असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना सांगितले. तसेच, मी मंत्रिपद मिळावे म्हणून यंदा कुणाला भेटलो नाही, सहज मिळाले, असेही सांगायला आठवले विसरले नाहीत.

“रिपब्लिकन पक्षाला दुसऱ्यांदा संधी मिळाली. मी आनंदी आहेच. त्याचप्रमाणे माझे कार्यकर्तेही आनंदी आहेत. आता आनंद साजरा करुन चालणार नाही. जे खाते मिळेल त्याचे सोने करणार आहे. सामजिक ऐक्य निर्माण करण्याची जबाबदारी माझ्यावर.”, असे यावेळी रामदास आठवेल म्हणाले. मात्र, “कोणतं खात द्यायचं, तो अधिकार पंतप्रधानांचा आहे. मला जी जबाबदरी सोपवतील ती पार पाडेन. माझा मंत्रिपदाचा अनुभव त्यामुळे दुसऱ्यांदा संधी मिळाली.” असेही आठवले म्हणाले.

वाचा : महाराष्ट्रातील ‘या’ 7 नेत्यांना मोदी सरकारमध्ये मंत्रिपदं

माझ्या मंत्रिपदाचा उपयोग पक्षाचे संघटन बांधण्यासाठी करणार आहे, असे म्हणत रामदास आठवले पुढे म्हणाले, “वंचित आघाडीला मते चांगली मिळाली. पण निवडून येण्यासाठी डबल मते लागतात. वंचितने वंचितचे काम करावे, मी माझा पक्ष बांधण्याचे काम करणार आहे. सामाजिक चळवळ म्हणून पक्ष चालवत असल्याने माझे नुकसान होत आहे. मला स्वतःच्या बळावर पक्ष उभा करावा लागेल. सगळ्या जातीची मते मिळवणारे उमेदवार शोधावे लागतील. सर्व निवडणुकांमध्ये उमेदवार जिंकून आणावे लागतील.”

VIDEO : मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर रामदास आठवलेंची पहिली एक्स्क्लुझिव्ह मुलाखत :

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.