उस्मानाबाद : शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची मदत मिळत नसल्याने ‘देता की जाता’ अशी आक्रमक भूमिका भाजपचे तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी घेतलीय. त्याचबरोबर मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांच्या मदतीची घोषणा झाली नाही तर आंदोलनाचा इशाराही पाटील यांनी दिलाय. पाटील यांनी आज उस्मानाबादेत पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडी सरकारला हा इशारा दिला आहे. (MLA Ranajagjitsingh Patil warns Mahavikas Aghadi government to help farmers)