मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीपूर्वी युती करताना सत्तेतला वाटा समान असेल, असा शब्द शिवसेनेला देऊन देखील सध्या भाजप ज्याप्रकारे आपला शब्द फिरवत आहे (Rohit Pawar Facebook Post), हे बघता प्रश्न पडतो की, जर आज स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) हयात असते तर भाजपचं एवढं धाडस झालं असतं का?, असा सवाल करणारी फेसबुक पोस्ट राष्ट्रवादीचे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी लिहिली आहे.