AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO | “राज्यपाल असं बेताल बोलतात, पक्षातील लोकं त्यांना काही बोलत नाहीत का?”, मनसे नेते वसंत मोरे यांचा सवाल

एवढ्या मोठ्या राज्यपाल पदावर असलेल्यांनी बोलताना तारतम्य बाळगणे गरजेचे आहे. या आधीही यांनी वारंवार भावना दुखविण्याचे काम केले आहे. यांच्या वरिष्ठांनी यांना आता दुसरीकडे पाठवायला हवे.

VIDEO | राज्यपाल असं बेताल बोलतात, पक्षातील लोकं त्यांना काही बोलत नाहीत का?, मनसे नेते वसंत मोरे यांचा सवाल
राज्यपालांचं वय झालं, त्यांना रिटायर करा, मनसे आक्रमक; भाजपची कोंडी? Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Nov 20, 2022 | 11:42 AM
Share

दिनेश दुखंडे, टीव्ही 9 मराठी प्रतिनिधी, पुणे: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्याने विरोधक अधिकच आक्रमक झाले आहे. राज्यपालांना तात्काळ पदावरून हटवण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. आता मनसेनेही या प्रकरणी आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यपालांचं वय झालं आहे. त्यांना तात्काळ रिटायर करा, अशी मागणी मनसेने केली आहे. विरोधकांबरोबर आता मनसेनेही राज्यपालांना हटवण्याची मागणी केल्याने भाजपची चांगलीच कोंडी झाली आहे.

मनसेचे नेते वसंत मोरे यांनी ही मागणी केली आहे. एवढ्या मोठ्या उच्च पदावर असणारी व्यक्ती बेताल वक्तव्य करते. जे आपले आदर्श आहेत त्यांच्यावर बोललं जात आहे. तरीही राज्यपालांवर कारवाई का होत नाही? यांना यांच्या पक्षातले वरिष्ठ का समजावून सांगत नाहीत?, असा सवाल वसंत मोरे यांनी केला आहे.

शिवाजी महाराज म्हणजे आमची अस्मिता आहेत आणि तुम्ही त्यांना एकेरी कसं बोलू शकता? मग आम्हाला देखील तुम्हाला एकेरी बोलता येतं. हे राज्यपाल नेहमी कळ लावायचं काम करतात म्हणून मी बोललो यांचं नाव बदलून कळीचा नारद ठेवा. हे कधी जातीवर बोलून भांडणे लावायचं काम करतात. तर कधी महापुरुषांवर अवमानकारक बोलतात. राज्यपालांचं वय झालं आहे त्यांना रिटायर करा, अशी मागणीही मोरे यांनी केली.

वसंत मोरे यांनी यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्द्यावरही भाष्य केलं. मला वाटतं की राष्ट्रपिता महात्मा गांधी, पंडित जवहरलाल नेहरू , सावरकर, बाबासाहेब पुरंदरे यांच्यासह ज्या व्यक्ती हयात नाहीत त्यावर का बोललं जातं? आपल्या हिंदू संस्कृतीत एकदा माणूस गेला की त्याच्याविषयी बोलत नाहीत. हे लोक बावळट आहेत. हे सगळे लोक बेताल व्यक्त का करत आहेत तेच कळत नाही, अशी टीका त्यांनी केली.

दरम्यान, मनसेचे माजी आमदार बाळा नांदगावकर यांनीही राज्यपालांवर टीका केली आहे. साठी बुद्धी नाठी ही म्हण अशा लोकांमुळेच पडली असेल. जिभेला जरी हाड नसेल तरी डोक्यात मेंदू असतो.

एवढ्या मोठ्या राज्यपाल पदावर असलेल्यांनी बोलताना तारतम्य बाळगणे गरजेचे आहे. या आधीही यांनी वारंवार भावना दुखविण्याचे काम केले आहे. यांच्या वरिष्ठांनी यांना आता दुसरीकडे पाठवायला हवे, अशी मागणी बाळा नांदगावकर यांनी केली.

Follow Us
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.