AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO | “राज्यपाल असं बेताल बोलतात, पक्षातील लोकं त्यांना काही बोलत नाहीत का?”, मनसे नेते वसंत मोरे यांचा सवाल

एवढ्या मोठ्या राज्यपाल पदावर असलेल्यांनी बोलताना तारतम्य बाळगणे गरजेचे आहे. या आधीही यांनी वारंवार भावना दुखविण्याचे काम केले आहे. यांच्या वरिष्ठांनी यांना आता दुसरीकडे पाठवायला हवे.

VIDEO | राज्यपाल असं बेताल बोलतात, पक्षातील लोकं त्यांना काही बोलत नाहीत का?, मनसे नेते वसंत मोरे यांचा सवाल
राज्यपालांचं वय झालं, त्यांना रिटायर करा, मनसे आक्रमक; भाजपची कोंडी? Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Nov 20, 2022 | 11:42 AM
Share

दिनेश दुखंडे, टीव्ही 9 मराठी प्रतिनिधी, पुणे: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्याने विरोधक अधिकच आक्रमक झाले आहे. राज्यपालांना तात्काळ पदावरून हटवण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. आता मनसेनेही या प्रकरणी आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यपालांचं वय झालं आहे. त्यांना तात्काळ रिटायर करा, अशी मागणी मनसेने केली आहे. विरोधकांबरोबर आता मनसेनेही राज्यपालांना हटवण्याची मागणी केल्याने भाजपची चांगलीच कोंडी झाली आहे.

मनसेचे नेते वसंत मोरे यांनी ही मागणी केली आहे. एवढ्या मोठ्या उच्च पदावर असणारी व्यक्ती बेताल वक्तव्य करते. जे आपले आदर्श आहेत त्यांच्यावर बोललं जात आहे. तरीही राज्यपालांवर कारवाई का होत नाही? यांना यांच्या पक्षातले वरिष्ठ का समजावून सांगत नाहीत?, असा सवाल वसंत मोरे यांनी केला आहे.

शिवाजी महाराज म्हणजे आमची अस्मिता आहेत आणि तुम्ही त्यांना एकेरी कसं बोलू शकता? मग आम्हाला देखील तुम्हाला एकेरी बोलता येतं. हे राज्यपाल नेहमी कळ लावायचं काम करतात म्हणून मी बोललो यांचं नाव बदलून कळीचा नारद ठेवा. हे कधी जातीवर बोलून भांडणे लावायचं काम करतात. तर कधी महापुरुषांवर अवमानकारक बोलतात. राज्यपालांचं वय झालं आहे त्यांना रिटायर करा, अशी मागणीही मोरे यांनी केली.

वसंत मोरे यांनी यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्द्यावरही भाष्य केलं. मला वाटतं की राष्ट्रपिता महात्मा गांधी, पंडित जवहरलाल नेहरू , सावरकर, बाबासाहेब पुरंदरे यांच्यासह ज्या व्यक्ती हयात नाहीत त्यावर का बोललं जातं? आपल्या हिंदू संस्कृतीत एकदा माणूस गेला की त्याच्याविषयी बोलत नाहीत. हे लोक बावळट आहेत. हे सगळे लोक बेताल व्यक्त का करत आहेत तेच कळत नाही, अशी टीका त्यांनी केली.

दरम्यान, मनसेचे माजी आमदार बाळा नांदगावकर यांनीही राज्यपालांवर टीका केली आहे. साठी बुद्धी नाठी ही म्हण अशा लोकांमुळेच पडली असेल. जिभेला जरी हाड नसेल तरी डोक्यात मेंदू असतो.

एवढ्या मोठ्या राज्यपाल पदावर असलेल्यांनी बोलताना तारतम्य बाळगणे गरजेचे आहे. या आधीही यांनी वारंवार भावना दुखविण्याचे काम केले आहे. यांच्या वरिष्ठांनी यांना आता दुसरीकडे पाठवायला हवे, अशी मागणी बाळा नांदगावकर यांनी केली.

Follow Us
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत.
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!.
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार......
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.