AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO | “राज्यपाल असं बेताल बोलतात, पक्षातील लोकं त्यांना काही बोलत नाहीत का?”, मनसे नेते वसंत मोरे यांचा सवाल

एवढ्या मोठ्या राज्यपाल पदावर असलेल्यांनी बोलताना तारतम्य बाळगणे गरजेचे आहे. या आधीही यांनी वारंवार भावना दुखविण्याचे काम केले आहे. यांच्या वरिष्ठांनी यांना आता दुसरीकडे पाठवायला हवे.

VIDEO | राज्यपाल असं बेताल बोलतात, पक्षातील लोकं त्यांना काही बोलत नाहीत का?, मनसे नेते वसंत मोरे यांचा सवाल
राज्यपालांचं वय झालं, त्यांना रिटायर करा, मनसे आक्रमक; भाजपची कोंडी? Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Nov 20, 2022 | 11:42 AM
Share

दिनेश दुखंडे, टीव्ही 9 मराठी प्रतिनिधी, पुणे: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्याने विरोधक अधिकच आक्रमक झाले आहे. राज्यपालांना तात्काळ पदावरून हटवण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. आता मनसेनेही या प्रकरणी आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यपालांचं वय झालं आहे. त्यांना तात्काळ रिटायर करा, अशी मागणी मनसेने केली आहे. विरोधकांबरोबर आता मनसेनेही राज्यपालांना हटवण्याची मागणी केल्याने भाजपची चांगलीच कोंडी झाली आहे.

मनसेचे नेते वसंत मोरे यांनी ही मागणी केली आहे. एवढ्या मोठ्या उच्च पदावर असणारी व्यक्ती बेताल वक्तव्य करते. जे आपले आदर्श आहेत त्यांच्यावर बोललं जात आहे. तरीही राज्यपालांवर कारवाई का होत नाही? यांना यांच्या पक्षातले वरिष्ठ का समजावून सांगत नाहीत?, असा सवाल वसंत मोरे यांनी केला आहे.

शिवाजी महाराज म्हणजे आमची अस्मिता आहेत आणि तुम्ही त्यांना एकेरी कसं बोलू शकता? मग आम्हाला देखील तुम्हाला एकेरी बोलता येतं. हे राज्यपाल नेहमी कळ लावायचं काम करतात म्हणून मी बोललो यांचं नाव बदलून कळीचा नारद ठेवा. हे कधी जातीवर बोलून भांडणे लावायचं काम करतात. तर कधी महापुरुषांवर अवमानकारक बोलतात. राज्यपालांचं वय झालं आहे त्यांना रिटायर करा, अशी मागणीही मोरे यांनी केली.

वसंत मोरे यांनी यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्द्यावरही भाष्य केलं. मला वाटतं की राष्ट्रपिता महात्मा गांधी, पंडित जवहरलाल नेहरू , सावरकर, बाबासाहेब पुरंदरे यांच्यासह ज्या व्यक्ती हयात नाहीत त्यावर का बोललं जातं? आपल्या हिंदू संस्कृतीत एकदा माणूस गेला की त्याच्याविषयी बोलत नाहीत. हे लोक बावळट आहेत. हे सगळे लोक बेताल व्यक्त का करत आहेत तेच कळत नाही, अशी टीका त्यांनी केली.

दरम्यान, मनसेचे माजी आमदार बाळा नांदगावकर यांनीही राज्यपालांवर टीका केली आहे. साठी बुद्धी नाठी ही म्हण अशा लोकांमुळेच पडली असेल. जिभेला जरी हाड नसेल तरी डोक्यात मेंदू असतो.

एवढ्या मोठ्या राज्यपाल पदावर असलेल्यांनी बोलताना तारतम्य बाळगणे गरजेचे आहे. या आधीही यांनी वारंवार भावना दुखविण्याचे काम केले आहे. यांच्या वरिष्ठांनी यांना आता दुसरीकडे पाठवायला हवे, अशी मागणी बाळा नांदगावकर यांनी केली.

चीन सीमावादाच्या मुद्द्यावर लोकसभेत गदारोळ
चीन सीमावादाच्या मुद्द्यावर लोकसभेत गदारोळ.
चीन समोर असताना 56 इंच छातीला काय झाले होते? राहुल गांधींचा प्रश्न
चीन समोर असताना 56 इंच छातीला काय झाले होते? राहुल गांधींचा प्रश्न.
पार्थ पवारांना मोठा दिलासा! मुंढवा जमीन प्रकरणात अपडेट समोर
पार्थ पवारांना मोठा दिलासा! मुंढवा जमीन प्रकरणात अपडेट समोर.
जळगावमध्ये शेतकरी आक्रमक; L 53 महामार्गावर 3 तासांपासून रास्ता रोको
जळगावमध्ये शेतकरी आक्रमक; L 53 महामार्गावर 3 तासांपासून रास्ता रोको.
शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांचा तो दावा खोडला; काय म्हणाले?
शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांचा तो दावा खोडला; काय म्हणाले?.
मुंबई पालिकेत भाजपला समर्थन देण्याचं वृत्त; ठाकरेंनी दिलं स्पष्टीकरण
मुंबई पालिकेत भाजपला समर्थन देण्याचं वृत्त; ठाकरेंनी दिलं स्पष्टीकरण.
राज ठाकरे यांच्या सोबतच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांचा नाराजीचा सूर!
राज ठाकरे यांच्या सोबतच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांचा नाराजीचा सूर!.
विदिप जाधव कुटुंबियांना सुनेत्रा पवार यांची सांत्वनपर भेट
विदिप जाधव कुटुंबियांना सुनेत्रा पवार यांची सांत्वनपर भेट.
मद्यधुंद चालकाने 14-15 जणांना उडवलं, प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
मद्यधुंद चालकाने 14-15 जणांना उडवलं, प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार.
जल जीवन मिशन महाराष्ट्राचा निधी थांबला? संजय राऊतांचा राज्यसभेत सवाल
जल जीवन मिशन महाराष्ट्राचा निधी थांबला? संजय राऊतांचा राज्यसभेत सवाल.