AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेना पवारांच्या पिंजऱ्यातलं मांजर, मनसेच्या ‘या’ नेत्याची टीका जिव्हारी लागणार?

अंबादास दानवेंना उत्तर देताना संदीप देशपांडे म्हणाले, ' हे सगळं आऊटडेटेड नेतृत्व आहे. संभाजीनगरमधले सगळे नेते असेच आहेत, दानवे असतील नाही तर खैरे असतील...

शिवसेना पवारांच्या पिंजऱ्यातलं मांजर, मनसेच्या 'या' नेत्याची टीका जिव्हारी लागणार?
Image Credit source: social media
| Updated on: Sep 21, 2022 | 10:34 AM
Share

शिवसेना म्हणजे शरद पवार (Sharad Pawar) यांच्या पिंजऱ्यातील मांजर आहे, अशी घणाघाती टीका मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी केली आहे. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे आज गटप्रमुखांचा मेळावा घेत आहेत. या पार्श्वभूमीवर संदीप देशपांडेंनी हे टीकास्त्र सोडलंय. कितीही मेळावे घेतले तरी तुमच्याकडे मुळात विचार आहे का ? असा सवाल देशपांडेंनी केलाय. औरंगाबादमधील शिवसेना नेत्यांवरही देशपांडेंनी जोरदार टीका केली आहे. तसंच जयंत पाटील यांनी शिवसेनेला राष्ट्रवादी संपवतेय, यावर बोलावं, असं थेट आव्हानही त्यांनी दिलंय. मनसे नेत्याची ही टीका शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिव्हारी लागण्याची शक्यता आहे.

काय म्हणाले संदीप देशपांडे?

शरद पवारांच्या प्राणी संग्रहालयातल्या पिंजऱ्यामधील मांजर अशी शिवसेनेची गत झाली आहे, असं वक्तव्य देशपांडे यांनी केलंय. काल शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी मनसेवर टीका केली. मनसे ही भाजपची दुसरी शाखा असल्याचं त्यांनी म्हटलं.

अंबादास दानवेंना उत्तर देताना संदीप देशपांडे म्हणाले, ‘ हे सगळं आऊटडेटेड नेतृत्व आहे. संभाजीनगरमधले सगळे नेते असेच आहेत, दानवे असतील नाही तर खैरे असतील…

आम्ही आमचा पक्ष वाढवतोय. पण राष्ट्रवादी शिवसेना पक्ष संपवतेय, त्याचं काय? जयंत पाटील यांनी आधी याचं उत्तर द्यावं, असं वक्तव्य संदीप देशपांडे यांनी केलंय.

उद्धव ठाकरेंच्या मेळाव्याकडे लक्ष

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आज प्रथमच प्रत्यक्ष गटप्रमुखांच्या मेळाव्याला संबोधित करत आहेत. गोरेगाव येथील नेस्को संकुलावर हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना या मेळाव्याच्या निमित्ताने रणशिंग फुंकणार असे संकेत आहेत.

विशेष म्हणजे या निमित्ताने उद्धव ठाकरेंचे दुसरे पुत्र तेजस ठाकरे हेदेखील राजकारणात एंट्री करणार असल्याची चर्चा आहे. मुंबईत उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरेंचे बॅनर्स ठिकठिकाणी झळकत आहेत.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.