AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुख्यमंत्रीसाहेब, वांद्र्याच्या अंगणातील घुसखोर हाकला, ‘मातोश्री’समोर मनसेचं पोस्टर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वांद्र्यातील मातोश्री घराबाहेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पोस्टरबाजी केली (MNS poster outside Matoshree) आहे.

मुख्यमंत्रीसाहेब, वांद्र्याच्या अंगणातील घुसखोर हाकला, 'मातोश्री'समोर मनसेचं पोस्टर
| Edited By: | Updated on: Feb 07, 2020 | 4:11 PM
Share

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वांद्र्यातील मातोश्री घराबाहेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पोस्टरबाजी केली (MNS poster outside Matoshree) आहे. विशेष म्हणजे या पोस्टरमधून थेट मुख्यमंत्र्यांना आवाहन करण्यात आलं आहे. वांद्र्यात जे काही बांगलादेशी आणि पाकिस्तानी मोहल्ले, अड्डे आहेत ते साफ करा, असं आवाहन या पोस्टरमध्ये केलं आहे. मनसेचे पदाधीकारी अखिल चित्रे यांनी हे होर्डिंग लावले (MNS poster outside Matoshree) आहे.

मातोश्री बाहेर लावलेल्या पोस्टरमध्येही मनसेने हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. “माननीय मुख्यमंत्रीसाहेब पाकिस्तान आणि बांगलादेशी घुसखोरांना हिंदूस्थानातून हाकलंलच पाहिजे, हीच आपली भूमीका असेल तर प्रथम वांद्र्यातील अंगणात घुसखोरांनी भरलेले मोहल्ले साफ करा”, असं मनसेच्या पोस्टरमध्ये म्हटलं आहे.

येत्या 9 फेब्रुवारी रोजी मनसेचा बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरीविरोधात मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चासाठी मनसेकडून जोरदार तयारी सुरु आहे. संपूर्ण मुंबईसह महाराष्ट्रात मनसेकडून पोस्टरबाजी केली जात आहे. सध्या ही पोस्टरबाजी सर्वत्र चर्चेचा विषय बनली आहे.

“वांद्र्यात जे बॅनर लागले आहे त्यामध्ये आम्ही कोणतेही आवाहन केले नसून विनंती केली आहे. बांगलादेशींचा मुद्दा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा होता. पण आज तो मुद्दा राज ठाकरे रेटून पुढे नेत आहेत. आपण गेले दहा वर्ष मनसेचा ट्रॅक पाहिला तर दिसेल, जेव्हा कधीही अशाप्रकारच्या गोष्टी निदर्शनास आल्या तेव्हा मनसे त्याविरोधात प्रखरपणे उभी राहिली”, असं मनसे पदाधिकारी अखिल चित्रे म्हणाला.

“रझा अकादमीचा मोर्चा झाला त्याविरोधात मनसे हा एकमेव पक्ष होता ज्याने मोर्चा काढला. तेव्हा स्वत: हिंदुत्व म्हणून बोलणारे शेपूट घालून कुठे गेले होते माहित नाही”, अशी टीकाही अखिल चित्रेंनी केली.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.