AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नोटेवर बापूंच्या जागी इतर नेत्यांचे फोटो लावण्यावरून चढाओढ, मनसेची भूमिका काय?

नोटेवर बापू्च्या जागी इतर नेत्यांचे फोटो लावण्यावरून चढाओढ सुरु आहे. त्यावर आता मनसेची प्रतिक्रिया आली आहे...

नोटेवर बापूंच्या जागी इतर नेत्यांचे फोटो लावण्यावरून चढाओढ, मनसेची भूमिका काय?
| Edited By: | Updated on: Oct 27, 2022 | 5:01 PM
Share

मुंबई : भारतीय चलनातील नोटेवर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या फोटो ऐवजी इतर नेत्यांचे फोटो लावण्याची मागणी जोर धरत आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी चलनातील नोटेवर गणपती आणि लक्ष्मीचा फोटो लावण्याचं विधान केलं आणि त्यावर विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या. विविध राजकीय पक्ष आणि नेते विविध मागण्या करत आहेत. यावर मनसेची भूमिका काय आहे याबाबत प्रश्न विचारले जात होते. त्यावर मनसेचे आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी मनसेची भूमिका मांडली आहे.

आमदार राजू पाटील यांनी ट्विट करत मनसेची भूमिका स्पष्ट केली आहे. पायाभूत सुविधांवर भर देण्याची विनंती राजू पाटील यांनी केली आहे.

राजू पाटील यांचं ट्विट

सध्याचं राजकारण पाहून जनता NOTA वापरायच्या मुडमध्ये आहे.त्यामुळे महागाई कमी करा. शेतकरी बांधवांना दिलासा द्या. रस्ते चांगले करा. चांगली शिक्षण व आरोग्य व्यवस्था उभी करा. रूपया मजबूत करा. उगीचच कशाला त्या नोटा आणि फोटोंच्या मागे लागलाय? सामान्यांना याचा काय फायदा? फालतू राजकारण’ असं राजू पाटील यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.

ठाकरेगटाची भूमिका काय?

सगळेच नेते आपआपल्या पक्षाच्या नेत्यांच्या फोटोची मागणी करायला लागले तर बाळासाहेब ठाकरे ही आमची अस्मिता आहे. त्यामुळे भारतीय चलनातील नोटेवर बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्यात यावा, असं ठाकरेगटाचे नेते अनिल परब यांनी उपरोधाने म्हटलं आहे.

रिपाइं खरात गटाचे नेते सचिन खरात यांनी गौतम बुद्ध यांचा फोटो नोटेवर लावण्याची मागणी केली आहे. बुद्ध ही भारताची ओळख आहे. त्यामुळे भारतीय चलनावर बुद्धांचा फोटो असावा अशी मागणी सचिन खरात यांनी केली आहे.

भाजप नेते नितेश राणे यांनी चलनातील नोटेवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो असावा, अशी मागणी केली आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.