भारताचा एक निर्णय पाकिस्तान आणि चीनची उडाली झोप, मोठा दणका, पाकला पाडले तोंडावर..
भारताने नुकताच मोठा धक्का पाकिस्तान आणि चीनला दिला. पाकिस्तानला ज्याची भीती होती, तेच भारताने केले. भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सध्या जपान दाैऱ्यावर आहेत. या दाैऱ्यात भारताने जपानसोबत मोठे करार संरक्षणासंदर्भात केली आहेत.

भारताने घेतलेल्या निर्णयाने पाकिस्तान आणि चीनची झोप उडाली. भारताचे संरक्षण मंत्री जपान दाैऱ्यावर आहेत. त्यांनी जपानचे संरक्षण मंत्री शिंजिरो कोइजुमी यांच्यासोबत व्दिपक्षीय बैठक घेतली. यादरम्यान संरक्षणासंदर्भातील महत्वाचे निर्णय घेण्यात आले. समुद्री सुरक्षेबद्दल करार भारत आणि जपानमध्ये झाले. संरक्षण उपकरणे, एआय रचना, अनुसंसधान, संयुक्त युद्धाभ्यास यांचा समावेश आहे. समुद्रात भारत आणि जपान एकत्र येत शक्तीप्रदर्शन करणार आहेत. जपान आणि भारत यांच्यात एक मोठी भागीदारी आहे. हिंद प्रशांतमध्ये स्थिरता, शांती महत्वाची आहे. नाैसेनांच्या जहाजांचे दाैरे, संयुक्त युद्धाभ्यास देखील होणार आहे. समुद्रात टाकलेली बारूदी सुरंगे, जहाज निर्मिती यावरही दोन्ही देश एकत्र येत काम करणार आहेत.
भारताने जपानला पाकिस्तानपासून सुरक्षित राहण्याचा सल्ला दिला. पाकिस्तानला अत्याधुनिक संरक्षण प्रणालीपासून दूर ठेवावे. कारण त्यांची परमाणू शक्ती कोरियापर्यंत पोहोचते. राजनाथ सिंह यांनी हा मुद्दा बैठकीत उचलला. अमेरिकेच्या गुप्त रिपोर्टनुसार, पाकिस्तानकडून उत्तर कोरियावला परमाणू संवर्धन प्रणाली सांगितली जातंय. पाकिस्तानचे वैज्ञानिक कादिर खान यासंदर्भातच तिथे काही वेळा गेले.
भारताने जपानला हे समजवण्याचा प्रयत्न केला की, पाकिस्तानवर विश्वास ठेवणे धोकादायक आहे. या मुद्द्यानंतर जपानने म्हटले आहे की, जपान भारताने मांडलेल्या मुद्द्यावर नक्कीच चर्चा करेल. फक्त पाकिस्तानच नाही तर चीनलाही मोठा धक्का बसला आहे. आता समुद्रात भारत आणि चीनची ताकद वाढणार आहे. दोन्ही देश एकत्र येणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तान जपानच्या अधिक जवळ जाण्याचा प्रयत्न करत आहे.
भारताने त्याच पार्श्वभूमीवर जपानला सर्तक राहण्याचा सल्ला दिला. प्रशांत महासागरात भारताची ताकद आता वाढणार आहे. जहाज निर्मिती, समुद्रातील ताकद यावर जपान आणि भारत एकत्र येत काम करणार आहेत. जपान आणि भारत चांगले मित्र देश आहेत. मात्र, मागील काही दिवसांपासून पाकिस्तान जपानसोबत मैत्री वाढवत आहे. अमेरिकेच्या गुप्तचर विभागाच्या रिपोर्टमध्ये धक्कादायक माहिती पुढे आलीये. राजनाथ सिंह यांच्या या दाैऱ्याकडे पाकिस्तान आणि चीनच्या विशेष नजरा आहेत.
