AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांची थलपती विजय यांनी घेतली भेट, केल्या या दोन मोठ्या मागण्या…

तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय थलपती यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटून एखाद्या कसलेल्या राजकारण्याप्रमाणे आपल्या राज्याची बाजू मांडत राज्याच्या भल्यासाठी अनेक बाबींवर चर्चा केली आहे.

केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांची थलपती विजय यांनी घेतली भेट, केल्या या दोन मोठ्या मागण्या...
CM Thalapathy Vijay to Amit Shah
| Updated on: Aug 20, 2026 | 11:06 PM
Share

CM Thalapathy Vijay: तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनी केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. त्यांनी या बैठकीत अनेक मुद्यांवर चर्चा केली आहे. बातमीनुसार दक्षिण झोनल काऊन्सिलमध्ये पहिल्यांदा भाग घेत असलेल्या थलपती विजय यांनी केंद्रिय गृहमंत्र्यासमोर neet परीक्षेत तामिळनाडूला सुट देण्याची मागणी केली आहे. तसेच मतदार संघ पुनर्रचना आणि दक्षिण भारतातील राज्याचे प्रतिनिधीत्वाला सुरक्षित ठेवण्याची मागणी केली आहे. त्याशिवाय त्यांनी आंतर राज्यीय ड्रग्स समस्या, ब्ल्यु इकॉनॉमी आणि किनारपट्टी सुरक्षा प्रकरणात सहकार्य करण्याची मागणी देखील केंद्राकडे केली आहे.

इंडिया टुडेच्या बातमीनुसार नीट पेपरच्या मुद्यावर विजय यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यासोबत तामिळनाडूच्या आधीच्या सरकारच्या पावलांलवर चालत नीट प्रकरणात राज्याला सुट देण्यात यावी. त्यांनी केंद्रिय स्तरावर नीट परीक्षा घेतल्याने ग्रामीण भागातील आणि आर्थिक दृष्ट्या कमजोर विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. राज्यातील मेडिकल कॉलेजात १२ वीच्या परीक्षा गुणावरच मेडिकलच्या सीटचे वाटप केले जावे असे म्हटले आहे.

तामिळनाडूच्या गेल्या सरकारमध्ये स्टॅलिन यांच्या सरकारने देखील हाच नीटचा मुद्दा लावून धरला होता. अलिकडे झालेल्या नीट घोटाळ्यानंतर तर ही मागणी अधिकच केली जात होती.

मतदार संघ पुनर्रचना विधेयकाची चिंता…

केंद्र सरकारद्वारे आणलेल्या मतदार संघ पुनर्रचना बिला संदर्भात देखली थलपती विजय यांनी केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांच्यासमोर आपली चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की दक्षिण राज्यात ही वास्तविक आणि सामायिक चिंता आहे. लोकसंख्या आधारे हे विधेयक त्यांचा राजकीय आवाज कमजोर करु शकते. दक्षिणेकडील राज्ये सतत लोकसंख्या नियंत्रण, मानव विकास, आर्थिक विकासात सर्वात पुढे आहेत. त्यांचे हे काम राष्ट्रीय प्राथमिकतेच्या यशाला प्रदर्शित करते. अशात जर लोकसंख्येच्या आधारे मतदार संघ पुनर्रचना करुन त्यांचे प्रतिनिधीत्व कमी करायला नको.

Follow Us
1 सप्टेंबरला OBC आंदोलनाचा एल्गार; हजारो वाहनांच्या रॅलीचा दावा
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर लक्ष्मण हाके यांचा नेत्यांवर सवाल
अमोल बालवडकरांविरोधात भाजपची सुनेत्रा पवारांकडे तक्रार
पुण्यात राष्ट्रवादीचे नगरसेवक अमोल बालवडकर यांच्याविरोधात भाजपकडून सुनेत्रा पवारांकडे तक्रार
खाद्यतेल भेसळीविरोधात कठोर पाऊले. मुंढेंनी जाहीर केली नवीन नियमावली
राज्यात सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर बंदी; भेसळयुक्त तेल विकल्यास 10 लाखांचा दंड
अमित ठाकरेंच्या दौऱ्याच्या बॅनरवरून फोटोवॉर;जिल्हाध्यक्षांचा फोटो गायब
अमित ठाकरेंच्या दौऱ्यात मनसेत फोटो वॉर; जिल्हाध्यक्षांच्या फोटोवरून चर्चा
सर्वोच्च न्यायालयात उबाठाच्या युक्तिवादावर राजू वाघमारे यांची टीका
शिवसेना वाद: सर्वोच्च न्यायालयात उबाठाच्या युक्तिवादावर राजू वाघमारे यांची टीका
पुण्यातील डेअरी प्रकरणी मुंबई हायकोर्टाने FDA ला 5 लाखांचा दंड ठोठावला
पुण्यातील डेअरी प्रकरणी मुंबई हायकोर्टाने FDA ला 5 लाखांचा दंड ठोठावला
मोदींच्या पंतप्रधानपदावर राऊतांचे भाकीत; बन यांच्याकडून प्रत्युत्तर
संजय राऊतांचा दावा: पंतप्रधान मोदींचा १७ सप्टेंबरला शेवटचा वाढदिवस असेल
राहुल गांधींनी झारखंडचाही दौरा करावा: चित्रा वाघ यांचे आवाहन
राहुल गांधींनी झारखंडचाही दौरा करावा: चित्रा वाघ यांचे आवाहन
लातूर शाळेतील शासकीय अनास्था आणि गैरव्यवस्थापन: तातडीने कारवाईची मागणी
लातूर शाळेतील शासकीय अनास्था आणि गैरव्यवस्थापन: तातडीने कारवाईची मागणी
पालकमंत्री गोगावलेंना तटकरेंच्या शुभेच्छा अजून नाहीत
पालकमंत्रीपदाच्या शुभेच्छा: भरत गोगावलेंना अजूनही सुनील तटकरेंच्या शुभेच्छांची प्रतीक्षा