AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विविध राज्यांच्या विधानसभा निवडणुका जवळ, संसदेतल्या गोंधळाद्वारे विरोधकांचा प्रचार; नवनीत राणांचा हल्लाबोल

येणाऱ्या काही दिवसांत विविध राज्यांच्या विधानसभा निवडणुका आहेत, त्यामुळे संसदेत विरोधकांचा गोंधळ सुरु आहे. याचद्वारे ते त्यांच्या पक्षाचा प्रचार करतायत, असा हल्लाबोल अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी केला.

विविध राज्यांच्या विधानसभा निवडणुका जवळ, संसदेतल्या गोंधळाद्वारे विरोधकांचा प्रचार; नवनीत राणांचा हल्लाबोल
नवनीत राणा, खासदार
| Edited By: | Updated on: Aug 06, 2021 | 12:23 PM
Share

नवी दिल्ली : येणाऱ्या काही दिवसांत विविध राज्यांच्या विधानसभा निवडणुका आहेत, त्यामुळे संसदेत विरोधकांचा गोंधळ सुरु आहे. याचद्वारे ते त्यांच्या पक्षाचा प्रचार करतायत, असा हल्लाबोल अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी केला. विरोधकांच्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर नवनीत राणा यांनी संसद परिसरात संसदेचं कामकाम चालू द्या, अशा आशयाचे फलक हातात घेऊन लक्षवेधी आंदोलन केलं.

संसदेत जनतेच्या प्रश्नांवर चर्चा होणं अपेक्षित, पण विरोधकांचा गोंधळच जास्त

“मला वाटतं की येणाऱ्या काही दिवसांत विविध राज्यांच्या विधानसभा निवडणुका आहेत. त्यामुळे विरोधी पक्ष संसदेत गोंधळ घालून आपापल्या पक्षाचा प्रचार करतायत. या संसदेत जनतेच्या प्रश्नांवर लोकशाही पद्धतीने चर्चा होणं अपेक्षित असतं. मात्र तसं होताना दिसत नाहीय”, अशी टीका नवनीत राणा यांनी केली.

विरोधकांनो संसदेचं कामकाज चालू द्या

“संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या संसदेत जनतेच्या प्रश्नांवर लोकशाही पद्धतीने चर्चा होणं अपेक्षित असतं. मात्र अधिवेशन सुरु झाल्यासून विरोधकांनी अधिवेशनाचं कामकाज चालू दिलेलं नाहीत. विरोधक सतत गोंधळ घालतायत. मी विरोध पक्षांना विनंती करतीय, की चर्चेत सहभागी व्हा, आपले मुद्दे संसेदत मांडा, तुमच्या प्रश्नांची उत्तरे सरकारकडून घ्या… मात्र संसदेच्या सभागृहात सारखाच गोंधळ होतोय.”

जनतेच्या प्रश्नांवर चर्चा करावी, ही अपेक्षा

“महाराष्ट्रात एवढा मोठा महापूर आलाय… कित्येकांचे जीव गेलेत… कित्येक जणांचं नुकसान झालंय… पण याचं कुणालाही काही पडलेलं नाहीय. यावर कुणी चर्चा करत नाही… कुणी चर्चेला तयार होत नाही… कोव्हिडचा प्रसार होतोय. तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका आहे, यावरही कुणी चर्चा करत नाही. प्रश्नोत्तरे होत नाहीत… विरोधकांना फक्त राजकारण करायचंय… आपापले पक्ष, निवडणुका, हे त्यांना महत्त्वाचं वाटतंय… जनतेच्या प्रश्नांचं त्यांना काहीही पडलेलं नाहीय.”

नवनीत राणांचं लक्षवेधी आंदोलन

“संसदेचं कामकाज चालू द्या… शेतकरी, कामगार, बेरोजगार, कोरोना महामारीने पिडीत नागरिक, महापूरग्रस्त नागरिकांना न्याय देण्यासाठी आणि त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी संसद चालणं गरजेचं आहे. मी याच आशयाचे फलक घेऊन विरोधकांना आवाहन करतीय…”

(MP Navneet Rana Attacked Opposition party Over monsoon parliament session)

हे ही वाचा :

बस, विमानातून प्रवासाला परवानगी, मग सर्वसामांन्यानी काय घोडं मारलं; भाजपचा ‘रेलभरो’, दरेकरांना 260 रुपयांचा दंड

कलम 370 हटवण्याच्या निर्णयाला 2 वर्ष पूर्ण, काश्मीरमध्ये भाजपचा जल्लोष, BJP कार्यालयामध्ये फडकवला तिरंगा

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.