AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut : काँग्रेस इंडिया आघाडी देशात 300 प्लस मजल मारेल, संजय राऊत यांचा मोठा दावा

Sanjay Raut : "देवेंद्र फडणवीस त्यांच्यासाठी 45 प्लसचा आकडा सांगतात. त्यांचा आकडा काहीही असेल, निवडणुकीनंतर भाजपाला आकडे लावायचच काम करावं लागणार आहे" अशी टीका संजय राऊत यांनी केली.

Sanjay Raut : काँग्रेस इंडिया आघाडी देशात 300 प्लस मजल मारेल, संजय राऊत यांचा मोठा दावा
संजय राऊत
| Updated on: Apr 17, 2024 | 12:02 PM
Share

“परिवर्तनाची सुरुवात विदर्भातून होते. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, आम्ही त्याकडे महाविकास आघाडी म्हणून पाहतो. रामटेकला आमचा उमेदवार नाही, पण आमचे लोक कामाला लागलेत. हळूहळू रंग चढत जाईल” असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. सी व्होटर सर्वेने महाराष्ट्रात महाविकास आघाडीला काही जागा दाखवल्या आहेत, त्यावर राऊत म्हणाले की, “जे काही त्यांनी दाखवलय, त्याच्याशी सहमत नाही. महाराष्ट्रात आम्ही 100 टक्के यश मिळवण्याच्या मार्गावर आहोत”

“देवेंद्र फडणवीस त्यांच्यासाठी 45 प्लसचा आकडा सांगतात. त्यांचा आकडा काहीही असेल, निवडणुकीनंतर भाजपाला आकडे लावायचच काम करावं लागणार आहे” अशी टीका संजय राऊत यांनी केली. “महाराष्ट्रात महाविकास आघाडी 35 जागा जिंकेल, देशात इंडिया आघाडीला 305 जागा मिळतील” असा दावा संजय राऊत यांनी केला.

‘राम त्यांच्याचमागे उभा राहतो’

‘मोदींसारखा आम्ही 405 चा दावा करणार नाही’ असं ते म्हणाले. “विरोधकांच रामावरच प्रेम नकली, राजकीय ढोंग आहे. कोणताही संघर्ष, लढ्यात ते नव्हते. राम पळपुट्यांच्या मागे उभा राहत नाही. जे मैदानावर उभे राहून आत्मविश्वासाने लढतात, राम त्यांच्यामागे उभा राहतो” असं संजय राऊत म्हणाले.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.