AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Milind Deora : राजकीय घडामोड ! काँग्रेसचे शिष्टमंडळ देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा

या शिष्टमंडळात झिशान सिद्धिकी, रवी राजा, आमीन पटेल आणि काँग्रेसचे इतर नेते यांचा सहभाग होता. या भेटीत मुंबई काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मुंबई महापालिकेची नवी वॉर्ड रचना रद्द करण्याची मागणी केल्याचे यावेळी मिलिंद देवरांनी मीडियाशी संवाद साधताना स्पष्ट केले.

Milind Deora : राजकीय घडामोड ! काँग्रेसचे शिष्टमंडळ देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा
काँग्रेसचे शिष्टमंडळ देवेंद्र फडणवीसांच्या भेटीलाImage Credit source: Google
| Updated on: Aug 02, 2022 | 3:07 PM
Share

मुंबई : राज्यात सध्या मोठी राजकीय उलथापालथ घडली असतानाच आज काँग्रेसच्या शिष्टमंडळा (Congress Delegation)ने भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांची भेट घेतली. मुंबई महापालिकेची निवडणूक (Mumbai Municipal Corporation Election) काही महिन्यांवरच येऊन ठेपली असतानाच ही भेट घेतली गेल्याने याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा यांनी शिष्टमंडळाचे नेतृत्व केले. या शिष्टमंडळात झिशान सिद्धिकी, रवी राजा, आमीन पटेल आणि काँग्रेसचे इतर नेते यांचा सहभाग होता. या भेटीत मुंबई काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मुंबई महापालिकेची नवी वॉर्ड रचना रद्द करण्याची मागणी केल्याचे यावेळी मिलिंद देवरांनी मीडियाशी संवाद साधताना स्पष्ट केले.

काय म्हणाले मिलिंद देवरा ?

सर्वांना माहित आहे, मुंबई महापालिका देशातील सर्वात प्रतिष्ठीत आणि सर्वात श्रीमंत महापालिका आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुका निःपक्षपणे पार पडल्या पाहिजेत. कुठल्याही एका पक्षासाठी वॉर्डमध्ये फेरफार करणे हे अनैतिक आणि घटनेच्या विरोधात आहे. म्हणून निःपक्ष निवडणुकांच्या हितासाठी आम्ही आज देवेंद्र फडणवीसजींना भेटलो. मुंबईच्या नवीन वॉर्डच्या सीमा रद्द कराव्यात, हीच आमची मागणी आहे. माझ्या नेतृत्वात काँग्रेसचे झिशान सिद्धिकी, रवी राजा, आमीन पटेल आणि काँग्रेसचे इतर शिष्टमंडळ देवेंद्र फडणवीस यांना भेटलो. देशातील प्रतिष्ठीत अशा मुंबई महापालिकेची निवडणूक फ्री अँड फेअर व्हायला पाहिजे. कुणाच्या पक्षाच्या आधारावर भेदभाव झाला नाही पाहिजे. नवीन वॉर्डची रचना रद्द केली पाहिजे. 227 वॉर्डवर निवडणूक झाली पाहिजे.

मुंबई काँग्रेस पक्ष रवी राजा, भाई जगताप कोर्टात गेले आहेत. कोर्टात आणि राजकीय पातळीवरही आम्ही न्यायासाठी लढणार आहोत. हा फक्त काँग्रेस पक्षाचा विषय नाही, सामान्य मुंबईकरांचा पण विषय आहे. मुंबईकरांचा अधिकार आहे की निवडणुका प्रामाणिकपणे झाल्या पाहिजेत. या वॉर्ड रचनेतून कुणाचा फायदा आहे हे सर्वांना माहित आहे, कुणी मॅनिप्युलेट केलं होतं. मला या गोष्टीचं राजकारण करायचं नाही. माझा एकच उद्देश आहे की, सामान्य मुंबईकरांना फ्री अँड फेअर निवडणूक व्हायला पाहिजे. (Mumbai Congress delegation met Deputy Chief Minister Devendra Fadnavis)

Follow Us
AQI 150 ते 190 दरम्यान, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईची मागणी!
AQI 150 ते 190 दरम्यान, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईची मागणी!.
राज्यसभेवर जाणाऱ्या पार्थ पवारांना सुप्रिया सुळे यांचा खास सल्ला
राज्यसभेवर जाणाऱ्या पार्थ पवारांना सुप्रिया सुळे यांचा खास सल्ला.
राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता; सुप्रिया सुळे यांचे वक्तव्य
राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता; सुप्रिया सुळे यांचे वक्तव्य.
उद्धव नाही, आदित्य नाही, ठाकरे गटाचे निर्णय फक्त राऊतच घेतात
उद्धव नाही, आदित्य नाही, ठाकरे गटाचे निर्णय फक्त राऊतच घेतात.
राष्ट्रवादी आमदारांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा
राष्ट्रवादी आमदारांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा.
अखेरच्या दिवशी महायुती व मविआकडून प्रमुख उमेदवारांचे अर्ज दाखल
अखेरच्या दिवशी महायुती व मविआकडून प्रमुख उमेदवारांचे अर्ज दाखल.
राज्यसभेसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस; शरद पवारांचा अर्ज दाखल
राज्यसभेसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस; शरद पवारांचा अर्ज दाखल.
अमेरिका–इराण संघर्षाचे पडसाद; जळगावच्या चटई उद्योगाला मोठा फटका
अमेरिका–इराण संघर्षाचे पडसाद; जळगावच्या चटई उद्योगाला मोठा फटका.
रोहित पवारांचा व्हीएसआर कंपनीवर कागदपत्र फेरफारीचा आरोप
रोहित पवारांचा व्हीएसआर कंपनीवर कागदपत्र फेरफारीचा आरोप.
जेएनपीएमध्ये केळी, कांदा, द्राक्षे, तांदळाचे हजारो कंटेनर अडकले
जेएनपीएमध्ये केळी, कांदा, द्राक्षे, तांदळाचे हजारो कंटेनर अडकले.