AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईतील नुकसानग्रस्तांना मदत करण्यास विसरू नका, अन्यथा तीव्र आंदोलनाचा भाजपचा इशारा

मुंबईतील सर्वसामान्य माणसालाही ही मदत मिळाली पाहिजे. राज्यासाठी पॅकेज घोषित करत असताना मुंबईला त्यातून वगळू नका, नाहीतर भाजप तीव्र आंदोलन करेल, असा इशारा भातखळकर यांनी दिला आहे.

मुंबईतील नुकसानग्रस्तांना मदत करण्यास विसरू नका, अन्यथा तीव्र आंदोलनाचा भाजपचा इशारा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, भाजप आमदार अतुल भातखळकर
| Edited By: | Updated on: Jul 26, 2021 | 7:24 PM
Share

मुंबई : राज्यातील 7 जिल्ह्यात महापुराने थैमान घातलं आहे. तर रायगड, सातारा, रत्नागिरी जिल्ह्यात दरड कोसळल्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. तत्पूर्वी मुंबईतील काही भागातही भूस्खलन आणि महापुरामुळे मोठं नुकसान झालं आहे. अशावेळी महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीतील नुकसानग्रस्तांना मदत करताना मुंबईतील नुकसानग्रस्तांना मदत करण्यास विसरू नका. अन्यथा मुंबई भाजप तीव्र आंदोलन करेल असा इशारा आम्ही ठाकरे सरकारला देत आहोत, असं ट्वीट भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केलं आहे. (BJP’s demand for financial help To flood victims in Mumbai)

चिपळूण, सांगली, कोल्हापूर इथल्या पूरग्रस्तांना सगळे निकष बाजूला ठेवून मदत करणार, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं आहे. पण, हे करत असताना मुंबईला यात विसरु नका, वगळू नका, एवढीच भारतीय जनता पक्षाची मागणी आहे. कारण मुंबईमध्येही पाणी अफाट भरलं, 26 जुलैसारखं भरलं. चाळकरी, झोपडपट्टीधारक, त्या ठिकाणचे व्यापारी, मध्यमवर्गीय, यांचं लाखो नाही तर कोट्यवधी रुपयांचं नुकसान या पावसामुळे झालं आहे. त्यामुळे मुंबईतील सर्वसामान्य माणसालाही ही मदत मिळाली पाहिजे. राज्यासाठी पॅकेज घोषित करत असताना मुंबईला त्यातून वगळू नका, नाहीतर भाजप तीव्र आंदोलन करेल, असा इशारा भातखळकर यांनी दिला आहे.

घर-दुकानात पाणी शिरलेल्यांना 10 हजार, अन्नधान्यासाठी 5 हजार

चिपळूण, महाड आदी ठिकाणी अनेकांच्या घरात आणि दुकानात पाणी शिरलं होतं. सांगली आणि कोल्हापुरात अद्यापही घरांमध्ये, रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानांमध्ये पाणी शिरल्याचं पाहायला मिळत आहे. यामुळे अनेकाचं लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे. घरातील सर्व साहित्य, दुकानातील सामान पूर्णत: वाया गेलं आहे. अशावेळी राज्य सरकारकडून तातडीच्या मदतीची घोषणा करण्यात आली आहे. ज्या घरांमध्ये आणि दुकानात पाणी शिरलं त्यांना 10 हजार रुपयांची तातडीची मदत, तर अन्नधान्य खरेदीसाठी 5 हजार रुपयांच्या मदतीची घोषणा मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री विश्वजीत कदम यांची घोषणा

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून काल 6 जिल्ह्यांमध्ये पुराने बाधित झालेल्या कुटुंबांना 10 किलो तांदूळ, 10 किलो गहू, 5 किलो तूरडाळ, 5 लिटर केरोसीन मोफत देण्यात येणार आहे, अशी घोषणा यावेळी अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी केली आहे.

संबंधित बातम्या :

5 जिल्ह्यांच्या किनारपट्टी भागात भिंत उभारणार, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, मुख्यमंत्र्यांची आपत्कालीन बैठक

मुंबई उपनगरातील आपत्ती रोखण्यासाठीच्या उपायांचा आदित्य ठाकरेकडून आढावा, पर्याय सादर करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना

BJP’s demand for financial help To flood victims in Mumbai

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.