AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai International Airport : छत्रपतींचे नाव बदलून अदानींचं नाव देणं ही सर्वात मोठी चूक, राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

जीव्हीके एअरपोर्टकडून अदानीने सर्व मालकी आणि शेअर्स खरेदी केल्यानंतर विमानतळाची मालकी अदानींकडे गेली. परंतु याचा अर्थ हा नाही की छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्ट हे नाव बदलून अदानी एअरपोर्ट करावं.

Mumbai International Airport : छत्रपतींचे नाव बदलून अदानींचं नाव देणं ही सर्वात मोठी चूक, राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक
नवाब मलिक, राष्ट्रीय प्रवक्ते, राष्ट्रवादी काँग्रेस
| Edited By: | Updated on: Aug 02, 2021 | 7:58 PM
Share

मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात अदानी एअरपोर्ट असा बोर्ड लावण्यात आला होता. पश्चिम द्रुतगती महामार्गावर उभारण्यात आलेला हा बोर्ड शिवसैनिकांनी आज फोडला आहे. त्यावरुन आता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नाव बदलून अदानी विमानतळ करणं योग्य नाही, ही अदानींची सर्वात मोठी चूक असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी म्हटलंय. (Shivsena Party Workers smashed board of Adani Company, Nawab Malik criticizes Adani group )

जीव्हीके एअरपोर्टकडून अदानीने सर्व मालकी आणि शेअर्स खरेदी केल्यानंतर विमानतळाची मालकी अदानींकडे गेली. परंतु याचा अर्थ हा नाही की छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्ट हे नाव बदलून अदानी एअरपोर्ट करावं. त्यांच्याकडे मॅनेजमेंटचा अधिकार आहे. मात्र, नाव बदलण्याचा किंवा नाव ठेवण्याचा अधिकार नाही, असंही नवाब मलिक म्हणाले. अदानी एअरपोर्ट लिहिणे हे योग्य नाही. यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे तशी घटना त्याठिकाणी घडली आहे. अदानीने लोकांची भावना दुखावणार नाही याची दक्षता घ्यावी असा सल्लाही नवाब मलिक यांनी दिला आहे.

MPSCचा विषय राज्यपालांकडे – नवाब मलिक

एमपीएससीच्या तीन सदस्यांच्या नियुक्तीचा विषय राज्यसरकारने अंतिम निर्णयासाठी राज्यपालांकडे पाठवला आहे. राज्यपाल त्यावर लवकरात लवकर हस्ताक्षर करतील अशी अपेक्षाही नवाब मलिक यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान MPSCच्या तीन सदस्यांच्या नियुक्तीचा विषय राज्यपालांकडे प्रलंबित आहे, असंही नवाब मलिक यांनी स्पष्ट केलंय.

31 जुलैच्या तीन दिवस अगोदर राज्यसरकारने तीन नावे निश्चित करून अंतिम निर्णयासाठी प्रस्ताव राज्यपालांकडे पाठवला होता. अपेक्षा आहे लवकरात लवकर त्यावर राज्यपाल हस्ताक्षर करतील आणि प्रस्ताव परत शासनाकडे पाठवला जाईल. तसंच त्या नियुक्त्या होऊन एमपीएससीचे कामकाज सुरू होईल. मात्र, निर्णय लवकर होणं अपेक्षित आहे, असा टोलाही नवाब मलिक यांनी लगावला आहे.

रिक्त पदे भरण्यासाठी ‘वाझे ‘ हवेत का?, भाजपचा सवाल

राज्य लोकसेवा आयोगाच्या 4 रिक्त जागा 31 जुलैपूर्वी भरण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधीमंडळ अधिवेशनात केली होती. आता त्यांनी ही पदे भरण्यासाठी अजित पवार यांनी 30 सप्टेंबरची मुदत दिली आहे. ही चालढकल पाहता सदस्यांची रिक्त पदे भरण्यासाठी आघाडी सरकारला एखाद्या ‘वाझे’ ची प्रतीक्षा आहे का, असा खोचक सवाल भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी केलाय.

संबंधित बातम्या :

Video : शिवसैनिकांनी ‘अदानी एअरपोर्ट’चा बोर्ड फोडला, आता अदानी कंपनीकडून स्पष्टीकरण!

Video: मुंबईत शिवसैनिकांचा तुफान राडा, ‘अदानी एअरपोर्ट’वर संतप्त, जोरदार तोडफोड

Shivsena Party Workers smashed board of Adani Company, Nawab Malik criticizes Adani group

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.