AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BMC Election 2022: Ganesh Nagar Ward 20 – गणेशनगर वार्डात भाजपचं जिंकणार की यावेळी निवडणुकीची गणित बदलणार

मात्र 2022 मध्ये होऊ घातलेल्या निवडणुकीत त्यांना आपल्या अस्तित्व टिकवून ठेवता येणार का? याकडे लक्ष लागले आहे. या मतदारसंघात एमआयएम, समाजवादी पार्टी, काँग्रेस, मनसे, अपक्ष, बहुजन विकास आघाडी, यासारखे अनेक पक्षांनी निवडणूक लढवली होती. त्याचप्रमाणे यावेळी नेमकी कोण मैदानात उतरणार ?कुणाची युती होणार आणि कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे

BMC Election 2022: Ganesh Nagar Ward 20 - गणेशनगर वार्डात भाजपचं जिंकणार  की यावेळी  निवडणुकीची गणित बदलणार
Ganesh Nagar Ward 20Image Credit source: Tv9
| Updated on: Jul 18, 2022 | 11:31 PM
Share

मुंबई- राज्यात महानगरपालिकांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. आरक्षणाच्या सोडतीनंतर राजकीय पक्षांनी आपल्या मोर्चे बांधणी सुरुवात केलेली आहे. येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राज्यातील सत्तांतराचा परिणाम मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळणार आहे. या निवडणुकांमध्ये कोण बाजी मारणार ? कोण आपले वर्चस्व सिद्ध करणार ? याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे. मुंबई महानगरपालिकेतील(BMC Election) वार्ड क्रमांक 20 हा गणेश नगर वॉर्ड म्हणून ओळखला जातो. या वार्डामध्ये 2017 च्या निवडणुकीत, भारतीय जनता पार्टीचे (BJP)दीपक तावडे यांनी 6856 मते मिळवत निवडणूक जिंकली होती. मात्र 2022 मध्ये होऊ घातलेल्या निवडणुकीत त्यांना आपल्या अस्तित्व टिकवून ठेवता येणार का? याकडे लक्ष लागले आहे. या मतदारसंघात एमआयएम, समाजवादी पार्टी, काँग्रेस, मनसे, अपक्ष, बहुजन विकास आघाडी, यासारखे अनेक पक्षांनी निवडणूक लढवली होती. त्याचप्रमाणे यावेळी नेमकी कोण मैदानात उतरणार ?कुणाची युती होणार आणि कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.  राज्यातील बदललेले राजकिय वातावरण , शिवसेनेत पडलेली फूट या सगळ्यचा फायदा नेमका कुणाला होणार ? शिवसेनेतून बाजूला निघालेला एकनाथ शिंदे गट महानगरपालिकेच्या निवडणुकीत आपली ताकद दाखवणार असल्याचे सद्यस्थितीला दिसत असले तरी मतदार कुणाच्या बाजूने उभे राहणार हे महत्वाचे आहे.

पक्ष उमेदवार विजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
काँग्रेस,
राष्ट्रवादी ,
मनसे
अपक्ष / इतर

2017 चा निकाल काय सांगतो

आजमा शमीम – एमआयएम- 414 चौधरी मोहम्मद – समाजवादी पार्टी – 1627 दुबे लालजी गजानन- भारतीय राष्ट्रीय काँग्रेस – 934 कोकणे अनिल हरिश्चंद्र – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया – 9 कदम राजेंद्र – महाराष्ट्र नवनिर्माण सेना- 886 खान युसुफ मोहम्मद – अपक्ष – 423 मोहम्मद अझरुद्दीन- बहुजन विकास आघाडी- 143 मिश्रा कृष्णा – अपक्ष- 43 पाटील विनायक- नॅशनल काँग्रेस पार्टी – 2017 शेख मन्सुरी फत्तेमोहम्मद – अपक्ष- 82 सुर्वे सुधाकर- शिवसेना – 4360 दीपक तावडे – भारतीय जनता पार्टी- 656 उस्मानी मकसूद – अपक्ष- 65 यादव विजय शंकर – बहुजन समाज पार्टी- 100

वार्डची लोकसंख्या

या वार्डाचे एकूण लोकसंख्या 58,286 असून यामध्ये अनुसूचित जातीचे 1504 व अनुसूचित जमातीचे 331 नागरिक आहेत 2017 च्या निवडणुकीत एकूण 18 163 नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला होता तर 184 नागरिकांनी नोटाचा वापर केला होता.

वॉर्ड कुठून कुठपर्यंत

या वार्डात सह्याद्री नगर, गणेश नगर व बंदर पाकळी या परिसरांचा समावेश होतो.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.