AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Manoj Jarange Patil : ‘या उपोषणात माझा शेवट झाला, तरी…’ मनोज जरांगे आता आर-पारच्या तयारीत

Manoj Jarange Patil : "मराठ्यांमुळे राज्यात सरकार आले आहे, कुण्या आमदाराने म्हणावे आम्हाला मराठ्यांनी मतदान केले नाही. मी सरकारबाबत अशावादी आहे. आमचे समीकरण जुळले नाही, म्हणून नाही तर सुफडा साफ झाला असता. मी लोकसभेला आणि विधानसभेला म्हणलो नाही की, याला पाडा किंवा त्याला पाडा" असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

Manoj Jarange Patil : 'या उपोषणात माझा शेवट झाला, तरी...' मनोज जरांगे आता आर-पारच्या तयारीत
Manoj Jarange Patil
| Updated on: Dec 17, 2024 | 1:14 PM
Share

“मराठा समाजाला सरसगट आरक्षण देण्यात यावे. जे पुरावे सापडले आहेत, त्या आधारे आरक्षण देण्यात यावे. सग्या सोयऱ्यांची जी अधिसूचना काढली, त्याची अंमलबजावणी या अधिवेशनात करावी. या राज्यातील शेतकरी मराठा म्हणजे कुणबी आहेत आणि 83 क्रमांकावर तसे आहे आणि त्या आधारे मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे” अशी मागणी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केली. “मराठा समाजातील तरुणांवर ज्ये केसेस झाल्या, त्या परत घेण्यात याव्यात” अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली. “राज्य सरकारने शिंदे समिती गठीत केली, त्या समितीला मुदतवाढ दिली. ती समिती काम करत नाही, सरकारला विनंती आहे, शिंदे समितीला नोंदी शोधायच काम सुरु करायला लावा” अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली.

“सरकारने मराठा समाजाला EWS मधून आरक्षण तात्काळ लागू करावे. ओबीसी आणि ईसीबीसी तिन्ही आरक्षण सुरु ठेवावे. उद्या आमच्या मागण्यांचे निवेदन जालना जिल्हाधिकाऱ्यांना देणार आहोत. अंतरवली सराटीमध्ये 25 जानेवारीला उपोषण सुरू करणार आहोत” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. “सरकार, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना शेवटची विनंती आहे, तुम्ही आम्हाला धोका दिला आहे. आम्ही तुमच्या विरोधात ब्र शब्द काढला नाही. राज्यातील मराठा समाजाने 25 जानेवारी पूर्वी सर्व कामे उरकून घ्यायचे आहे. उपोषणाला बसणारे किंवा पाठिंबा देणाऱ्यांनी आपल्या सर्व वस्तू घेऊन अंतरवाली सराटीमध्ये यायचे आहे” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

‘मुलांची मागणी आहे, म्हणून आम्ही ews मागतो’

“आता आरक्षण घेतल्याशिवाय अंतरवाली सोडायची नाही. मी मरायला तयार आहे. मराठा समाजाचा अपेक्षा भंग कधी होऊ देणार नाही. उपोषण केल्यामुळे मला त्रास होतो आणि या उपोषणात माझा शेवट होऊ शकतो. माझा शेवट झाला, तरी मी मॅनेज होणार नाही, फुटणार नाही” असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. “सर्वात महत्वाचे आम्हाला आरक्षण ओबीसीमध्ये पाहिजे, मुलांची मागणी आहे, म्हणून आम्ही ews मागतो” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

Follow Us
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!.
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार......
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच...
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच....