AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nana Patole : मध्यावधी होतील पण शिवसेनेचा कार्यक्रम झाल्यावरच..! पटोले यांनीच सांगितली भाजपाची रणनिती

सध्याच्या राजकीय घडामोडी घडत असतानाच शिंदे गटाला मान्यता मिळाली आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपाची जी रणनिती आहे त्यामधून तर शिवसेना संपवायची ही भाजपाची रणनिती आहे. त्यामुळे शिवसेना चिन्ह राहील की नाही अशी शंका उपस्थित होत आहे. बिहारमध्ये असा प्रयोग भाजपाने केला आहे. तोच प्रयोग आता महाराष्ट्रात करतील असे चित्र आहे.

Nana Patole : मध्यावधी होतील पण शिवसेनेचा कार्यक्रम झाल्यावरच..! पटोले यांनीच सांगितली भाजपाची रणनिती
कॉंग्रेस नेते नाना पटोलेImage Credit source: tv9 marathi
राजेंद्र खराडे
राजेंद्र खराडे | Updated on: Jul 04, 2022 | 11:15 AM
Share

मुंबई :  (BJP) भाजपा आणि शिंदे गटाच्या माध्यमातून सरकारची स्थापना होताच आता मध्यावधी निवडणुका लागतील असा सूर (MVA) महाविकास आघाडी सरकारमधून निघत आहे. आतापर्यंत राष्ट्रवादीचे शरद पवार, शिवसेनेचे खा. संजय राऊत यांनी याबाबत विधान केले असले तरी कॉंग्रेसचे (Nana Patole) नाना पटोले यांनी मात्र, भाजपाची रणनिती आणि शिवसेनेची होत असलेली स्थिती सांगून मध्यावधीबाबत विधान केले आहे. भाजपाने केवळ या सरकार स्थापनेचा विचार करुनच एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदावर बसवले असे नाहीतर यामागे मोठे नियोजन असल्याचे पटोले म्हणाले. शिवाय ज्या पध्दतीने सध्या भाजपाची रणनिती आहे त्यानुसार तर शिवसेनेचा कार्यक्रमच होईल अशी स्थिती आहे. भाजपाला शिवसेनेचे अस्तित्वच संपवायचे आहे असेच सध्याचे चित्र असून त्यानंतरच राज्यात मध्यावधी निवडणुका लागतील असा अंदाज कॉंग्रेसचे नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे. त्यामळे मध्यावधी निवडणुकांना घेऊन कॉंग्रेसनेही यामध्ये आपला सूर आवळला आहे.

शिवसेना संपवायची हाच भाजपाचा ‘प्लॅन’

सध्याच्या राजकीय घडामोडी घडत असतानाच शिंदे गटाला मान्यता मिळाली आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपाची जी रणनिती आहे त्यामधून तर शिवसेना संपवायची ही भाजपाची रणनिती आहे. त्यामुळे शिवसेना चिन्ह राहील की नाही अशी शंका उपस्थित होत आहे. बिहारमध्ये असा प्रयोग भाजपाने केला आहे. तोच प्रयोग आता महाराष्ट्रात करतील असे चित्र आहे. ही सर्व प्रक्रिया आणि शिवसेनेचा कार्यक्रम करायला आणखी 5 ते 6 महिने लागतील आणि त्यानंतर राज्यात मध्यावधी निवडणुका लागतील असा अंदाज नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.

बहुमत सिध्द करणे ही केवळ औपचारिकता पण…

विधानसभा अध्यक्ष निवडीच्या दरम्यान सर्वकाही स्पष्ट झाले आहे. शिवाय एकनाथ शिंदे याच्या गटाला आता मान्यताही देण्यात आली आहे. त्यामुळे शिंदे गट आणि भाजपाचे बहुमत सिध्द होणार यामध्ये आता काही नवीन राहिले नाही. बहुमत तर सिध्द होणार आता केवळ औपचारिकता राहिले असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले आहे. पण त्यानंतर सरकारची खरी परीक्षा असणार आहे. राज्यातील परस्थिती पावसाने दिलेली ओढ, शेतकऱ्यांवरील संकट याचा निपटारा करताना सरकारचे कसब पणाला लागणार असल्याचे पटोले म्हणाले आहेत.

शेतकऱ्यांच्या मदतीबाबत सरकारला पत्र

विधानसभेत बहुमत सिध्द होईल मात्र, त्यानंतर सरकारची खरी परिक्षा सुरु होणार आहे. कारण राज्यात जुलै महिना उजाडला तरी समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे पेरणी होऊनही खरीप संकटात आहे. शिवाय अनेक जिल्ह्यामध्ये खत, बियाणांचा तुटवडा आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे पेरणी करुनही नुकसान झाले आहे त्यांचे पंचनामे करुन मदत मिळावी व खत, बियाणांचा पुरवठा केला जावा यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्रव्यवहार केला असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले आहे.

Follow Us
कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
Devendra Fadnavis On Shetkari Karjmafi | कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में.....
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणत संजय राऊतांनाही खोचक टोला
भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
Devendra Fadnavis UNCUT | मोदींच्या 12 वर्षांचा महाअहवाल! भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले....
Devendra Fadnavis | भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले मोदी सरकारच्या 12 वर्षांचे रिपोर्ट कार्ड
पवारांचा एल्गार! पोलिसांनी परवानगी नाकारली तरी अन्नत्याग आंदोलनावर ठाम
Rohit Pawar | रोहित पवारांचा एल्गार! पोलिसांनी परवानगी नाकारली तरी अन्नत्याग आंदोलनावर ठाम
इकडे शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा, तिकडे राऊत म्हणाले.....
इकडे शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा, तिकडे राऊत म्हणाले, पश्चात्ताप झाला असेल तर या... रोख कुणाकडे?
काँग्रेसच्या झेंड्याखाली या...राऊतांच्या एका वक्तव्याने चर्चांना उधाण
Sanjay Raut UNCUT | काँग्रेसच्या झेंड्याखाली या... संजय राऊतांच्या त्या एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मुंबईकरांनो सावधान! फक्त महिनाभराचं पाणी उरलं; तलावांमध्ये केवळ....
मुंबईकरांनो सावधान! फक्त महिनाभराचं पाणी उरलं; तलावांमध्ये केवळ एवढे टक्के साठा...
विधान परिषदेआधी पवारांच्या गोटात भूकंप; 3 आमदारांनी घेतला मोठा निर्णय
tv9 Marathi Special Report | विधान परिषदेआधी पवारांच्या गोटात भूकंप; 3 आमदारांनी घेतला मोठा निर्णय! राजकारणातील सर्वात मोठा ट्विस्ट
राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसमध्ये विलीन होणार?
Nana Patole On NCP Merger | राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसमध्ये विलीन होणार? नाना पटोलेंच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!