AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सिंधुदुर्गातील नेत्यासाठी नाणारचा खटाटोप : खासदार विनायक राऊत

भाजपला टक्कर (Nanar project Shivsena Bjp) देण्यासाठी शिवसेना प्रकल्पग्रस्तांसोबत मैदानात उतरली आहे. नाणार जवळील तारळ गावात प्रकल्पग्रस्तांनी मुख्यमंत्र्याच्या विरोधात निषेध सभा घेण्यात आली.

सिंधुदुर्गातील नेत्यासाठी नाणारचा खटाटोप : खासदार विनायक राऊत
| Updated on: Sep 22, 2019 | 6:00 PM
Share

रत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून रत्नागिरीतील नाणार रिफायनरी प्रकल्पावरुन भाजप-शिवसेनेत (Nanar project Shivsena Bjp) वाद उफाळून आला आहे. मुख्यमंत्र्यांनी रद्द झालेल्या रिफानरी प्रकल्पाला केलेल्या समर्थनानंतर  आता याचे राजकीय पडसाद सुद्धा उमटू लागले आहेत. त्यामुळे आता भाजपला टक्कर (Nanar project Shivsena Bjp) देण्यासाठी शिवसेना प्रकल्पग्रस्तांसोबत मैदानात उतरली आहे. नाणार जवळील तारळ गावात प्रकल्पग्रस्तांनी मुख्यमंत्र्याच्या विरोधात निषेध सभा घेण्यात आली. नाणार प्रकल्प सिंधुदुर्गातील एका नेत्यासाठी आणला जात असल्याचा आरोप खासदार विनायक राऊत यांनी केला. त्यामुळे नाणार रिफायनरीच्या मुद्यावरून कोकणात विधानसभेची निवडणूक गाजणार असल्याचे दिसत आहे.

रिफायनरी प्रकल्पाचा निषेध करताना खासदार विनायक राऊत यांनी स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांचे नाव न घेता टीका केली. “हा प्रकल्प हा सिंधुदुर्गातील एका नेत्यासाठी आणला जात असल्याचा आरोप राऊत यांनी केला. या नेत्याच्या 300 एकर जमिनीचे तीन हजार कोटी रुपये या प्रकल्पामुळे अडकले आहेत. त्यामुळे या सर्व खटाटोप सुरु असल्याचे विनायक राऊत म्हणाले. या प्रकल्पाच्या समर्थकांना लोकसभेत मिळालेल्या 298 मतांवरून त्यांची लायकी काय आहे हे मुख्यमंत्र्यांनी तपासावे असा उपरोधिक टोलाही विनायक राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.”

कोकणात महाजनादेश यात्रेनिमित्त आलेल्या मुख्यमंत्र्यांनी (Nanar project Shivsena Bjp) रद्द झालेल्या नाणार रिफानरीबद्दल सकारात्मक भूमिका घेतली. यामुळे या प्रकल्पाला एक प्रकारे समर्थन दर्शवले गेले. नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत पुन्हा एकदा चर्चा केली जाईल असे सांगत मुख्यमंत्र्यांकडून या प्रकल्पाचे समर्थन केलं गेलं. या विधानामुळे पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपमध्ये जुंपलेल्याचे पहायला मिळत आहे. या विधानाचे राजकीय पडसाद नाणार पंचक्रोशीत उमटत आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी नाणार रिफायनरी विरोधी समितीकडून रविवारी (22 सप्टेंबर) राजापुरातील तारळ इथं निषेध सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी हजारोंच्या संख्येने लोक याठिकाणी उपस्थित होते. यावेळी उपस्थितीत प्रकल्पग्रस्तांकडून प्रकल्पाचा जाहीर निषेध करत मुख्यमंत्र्यांचा निषेध नोंदवला. जर हिमत असेल, तर नाणारमध्ये येऊन चर्चा करुन दाखवा असे खुलं आवाहनही यावेळी प्रकल्पग्रस्तांनी केले.

हजारो प्रकल्पग्रस्तांसोबत शिवसेनेचे खासदार विनायक राऊत आणि राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी सुद्धा प्रकल्पाच्या विरोधातील सूर आळवला. “नाणार प्रकल्पासाठी इंचभर देखील पाय ठेऊ देणार नाही”, असा इशारा राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी यावेळी दिला. नाणार रिफायनरी प्रकल्पासाठी गावात आलात, तर याद राखा, नाणारसाठी गावात पायही ठेवू देणार नाही”,अशी भूमिका साळवी यांनी घेतली आहे.

यामुळे एकूणच काय, विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर सेना आणि भाजप यांच्यात कोकणात राजकीय शिमगा रंगलेला पहायला मिळत आहे. त्यामुळेच नाणार रिफायनरीच्या मुद्यावरून कोकणात विधानसभेची निवडणूक गाजणार असल्याचे दिसत आहे.

Follow Us
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.