AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जशास तसं ! ईडीनं मविआ नेत्यांना तासनतास बसवलं आता मुंबई पोलीसांनी राणेंना, 5 तासापासून चौकशी

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची गेल्या तब्बल पाच तासापासून चौकशी सुरू आहे. राणेंचा अटकपूर्व जामीन मजूर झाला असला तरी दिशा सॅलियनच्या पालकांनी केलेल्या तक्रारीवरून ही चौकशी सुरू आहे.

जशास तसं ! ईडीनं मविआ नेत्यांना तासनतास बसवलं आता मुंबई पोलीसांनी राणेंना, 5 तासापासून चौकशी
दिशा सॅलियनबाबतच्या आरोपांमुळे राणेंची चौकशीImage Credit source: tv9
दादासाहेब कारंडे
दादासाहेब कारंडे | Updated on: Mar 05, 2022 | 8:35 PM
Share

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांची गेल्या तब्बल पाच तासापासून चौकशी सुरू आहे. राणेंचा अटकपूर्व जामीन मजूर झाला असला तरी दिशा सॅलियनच्या (Disha Salian case) पालकांनी केलेल्या तक्रारीवरून ही चौकशी सुरू आहे. एकीकडे महाविकास आघाडी सरकारमधील (Mahavikas Aghadi) नेत्यांना ईडी तासनतास बसवत आहे. तर दुसरीकडे राणेंनाही पोलिसांनी तासंतास बसवलं आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे. दिशा सॅलियनचा बलात्कार करून हत्या झाल्याचा खळबळजनक आरोप राणेंनी केला होता. त्यानंतर बदनामी केल्याची तक्रार दिशाच्या पालकांनी राणेंविरोधात केली आहे. याच प्रकरणात मालवणी पोलिसांत राणेंची चौकशी सुरू आहे. नितेश राणे यांच्याविरोधातही ही तक्रार झाली आहे. नितेश राणे आणि मुंबईच्या महापौर यांच्यात यावरून वादही झाला आहे.

बाजू मांडण्यासाठी राणे पोलीस स्टेशनमध्ये

दरम्यान या प्रकरणात नारायण राणे आणि नितेश राणे यांच्याविरोधात मालवणी पोलीस स्टेशनला एफआयर दाखल झाला होता. त्यानंतर नारायण राणे आणि नितेश राणे यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. या प्रकरणावर सुनावणी करताना दिंडोशी न्यायालयानं शुक्रवारी राणे पिता -पुत्राला दिलासा दिला. 10 मार्चपर्यंत नारायण राणे किंवा नितेश राणे यांना अटक करू नये असे आदेश न्यायलयाने पोलिसांना दिले आहेत. दरम्यान आता या प्रकरणात आपली बाजू मांडण्यासाठी नारायण राणे मालवणी पोलीस ठाण्यात पोहोचले आहेत.

राणेंचे गंभीर आरोप

दिशा सालियनवर लैंगिक अत्याचार करून हत्या झाली आहे. ती गरोदरही होती, असा दावा नारायण राणे यांनी केला होता. त्यावर सालियन कुटुंबीयांनी आक्षेप घेतला होता. तसेच आमच्या मुलीची बदनामी थांबवा असं आवाहनही केलं होतं. त्यानंतर सालियन कुटुंबीयांनी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. तसेच या प्रकरणी सालियन कुटुंबीयांनी राज्य महिला आयोगाकडेही दाद मागितली होती. त्यावर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पोलिसांकडून दिशा सालियन मृत्यूप्रकरणाचा अहवाल मागितला होता. अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण आणि दिशा सॅलियन प्रकरणावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी अनेकदा गंभीर आरोप केले आहेत. मात्र सुशांत सिंह राजपूत केसमध्ये सीबीआय चौकशीनंतरही काही बाहेर आलं नाही. दिशाच्या प्रकरणातही राणेंच्या आरोपांमुळे ट्विस्ट आले आहे.

रवी राणांची जेलवारी टळली, आता मनपा आणि पोलीस आयुक्तांवर कारवाईसाठी आक्रमक

‘लढायचं ते जिंकण्यासाठीच’, महापालिका जिंकण्यासाठी मनसेचा नवा नारा; पोस्टरवर पहिल्यांदाच अमित ठाकरे!

Breaking : एसटी कर्मचाऱ्यांसाठी गोपीचंद पडळकर पुन्हा मैदानात, आझाद मैदानात पुकारला एल्गार

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली