AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मनिषा कायंदे कट्टर शिवसैनिक होत्या, कशा काय शिंदे गटात गेल्या काही कळत नाही- छगन भुजबळ

Chhagan Bhujbal on Manisha Kayande inter in Shivsena : मनिषा कायंदे यांच्या शिवसेना प्रवेशावर माजी शिवसैनिकाकडून भाष्य, म्हणाले वाटलं नव्हतं...

मनिषा कायंदे कट्टर शिवसैनिक होत्या, कशा काय शिंदे गटात गेल्या काही कळत नाही- छगन भुजबळ
| Updated on: Jun 19, 2023 | 11:41 AM
Share

नाशिक : मनिषा कायंदे यांनी काल ठाकरे गटाला राम राम करत शिवसेना पक्षात प्रवेश केला. त्यावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. “मनिषा कायंदे कशा काय तिकडे गेल्या, काही कळत नाही. त्या मला कट्टर शिवसैनिक वाटल्या होत्या. उद्धव ठाकरेसोबत राहतील असं वाटतं होतं. पण त्या शिंदेंसोबत गेल्या. त्यांनी हा निर्णय कसा घेतला कळत नाही”, असं म्हणत माजी शिवसैनिक आणि राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते छगन भुजबळ यांनी कायंदेंच्या पक्षांतरावर प्रतिक्रिया दिली आहे.

खरी शिवसेना कोण? हे निवडणुकीत लोक ठरवतील. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आमच्या मनात कायम राहील, असं छगन भुजबळ म्हणालेत.

आज शिवसेनेचा स्थापना दिवस आहे. त्यावरही भुजबळांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनेचा आज 57 वा वर्धापन दिन आहे. सर्व शिवसैनिकांना शुभेच्छा! शिवसेनेच्या पहिल्या वर्धापन दिनापासून आम्ही घोषणा देत जायचो. मिळेल त्या वाहनाने जायचो. 1978 साली मी शिवसेनेचा गटनेता झालो. बाळासाहेब ठाकरेंनी मला शिवाजी पार्कवर बोलण्याची संधी दिली. शिवसेनेने अनेक जबाबदाऱ्या दिल्या, महापौर, आमदार झालो. शिवसैनिकांना शुभेच्छा! सर्व शिवसैनिकांना जय महाराष्ट्र, असं म्हणत छगन भुजबळांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

शिवसेना फुटली हे अजूनही मनाला पटत नाही. शिवसेना फुटली, याचं वाईट वाटतंय. राजकारणात उलट सुलट बोलत असलो. कायद्याच्या उलट सुलट गोष्टी करत असलो तरी लोक ठरवतात. जनता ठरवेन खरी शिवसेना कोणती ते…, असं भुजबळ म्हणालेत.

शिवसैनिकांची एकी , बाळासाहेबांचा शब्द सुटला म्हणजे शिवसैनिक डू ऑर डाय हा परवलीचा शब्द घेवून निघायचे, कशाचीही पर्वा करत नव्हते. ती शिवसेना हळूहळू काही कारणाने विस्कळीत झाली. तरी सुद्धा शिवसेना अभेद्य राहावी, हीच आजही मनात इच्छा आहे, असं ते म्हणालेत.

ठाकरे गटाला गळती लागलेली असताना उद्धव ठाकरे यांना काय सल्ला द्याल असं विचारण्यात आलं उद्धव ठाकरे यांना सल्ला देण्याची आवश्यकता नाही. उद्धव ठाकरे यांच्याकडे आजही जुने नेते, शिवसैनिक आहेत. ते चर्चा करू शकतात. गळती थांबवू शकतात. त्यामुळे मी त्यांना काही सल्ला देण्याची गरज नाही, असं भुजबळांनी म्हटलं आहे.

संघाच्या शाखेत राजकारण होत नाही! मोहन भागवतांनी स्पष्टच सांगित
संघाच्या शाखेत राजकारण होत नाही! मोहन भागवतांनी स्पष्टच सांगित.
फडणवीसांकडून मेक इन इंडिया व औद्योगिक विकासावर भर
फडणवीसांकडून मेक इन इंडिया व औद्योगिक विकासावर भर.
भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर जाणार! फडणवीसांनी व्यक्त केला
भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर जाणार! फडणवीसांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाला सलमान खान आला म्हणून काय बिघडलं? संजय शिरसाट यांचा प्रश्न
कार्यक्रमाला सलमान खान आला म्हणून काय बिघडलं? संजय शिरसाट यांचा प्रश्न.
छगन भुजबळांचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्र! पत्रात काय?
छगन भुजबळांचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्र! पत्रात काय?.
पंतप्रधानांच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेला गती मिळाली! फडणवीसांचं मत
पंतप्रधानांच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेला गती मिळाली! फडणवीसांचं मत.
संत गजानन महाराज प्रकट दिन सोहळा; लाखो भाविकांची शेगावात मांदियाळी
संत गजानन महाराज प्रकट दिन सोहळा; लाखो भाविकांची शेगावात मांदियाळी.
प्रकट दिनानिमित्त गजानन महाराजांच्या मंदिरात भक्तांची गर्दी
प्रकट दिनानिमित्त गजानन महाराजांच्या मंदिरात भक्तांची गर्दी.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अहिल्यानगरमध्ये दाखल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अहिल्यानगरमध्ये दाखल.
19 ते 25 वर्षात लग्न, 3 मुलं व्हावी असं शास्त्र सांगतं - मोहन भागवत
19 ते 25 वर्षात लग्न, 3 मुलं व्हावी असं शास्त्र सांगतं - मोहन भागवत.