AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मी कधीही रेल्वेचं तिकीट काढलं नाही, कारण…; रामदास आठवले यांचा भरसभेत खुलासा

Ramdas Athwale on Railway ticket : असेल देशात नरेंद्र मोदींची आंधी, तर मला मिळेल मंत्रिमंडळात संधी!; रामदास आठवले यांची कविता तुफ्फान व्हायरल...

मी कधीही रेल्वेचं तिकीट काढलं नाही, कारण...; रामदास आठवले यांचा भरसभेत खुलासा
| Updated on: Jul 11, 2023 | 11:37 AM
Share

नाशिक : अनेकदा अनेक प्रवासी विनातिकीट प्रवास करत असतात. विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून दंडही आकारला जातो. पण राजकीय मंडळी विनातिकीट प्रवास करत असतील असं कुणाच्या ध्यानी मनीही येऊ शकत नाही. पण केंद्रीय राज्य मंत्र्यांनी आपण विना तिकीट प्रवास करत असल्याचं भर सभेत सांगितलं आहे. केंद्रीय रामदास आठवले यांनी आपण विनातिकीट प्रवास केल्याचं सांगितलं आहे.

मी काही कधी रेल्वेचे तिकीट काढत नव्हतो. कारण प्रत्येकवेळी स्टेशनवर माझ्या स्वागताला शंभर दीडशे माणसं असायची. मग कोणता टीसी मला तिकीट विचारेल? त्यामुळे मी कधीही रेल्वेचं तिकीट काढलं नाही, असं रामदास आठवले यांनी सांगितलं.

नाशिकमध्ये दलित पँथर सुवर्ण महोत्सवी सोहळ्यानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. पँथर चळवळीतील अग्रगण्य नेत्यांचां सत्कार सोहळा पार पडला. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. शालिमारमधल्या कालिदास कलामंदिरात हा कार्यक्रम पार पडला.

पँथर सुवर्ण महोत्सव सोहळ्यात भाषण करताना रामदास आठवले यांनी कविता सादर केल्या. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मंत्रिपदावरही त्यांनी भाष्य केलं.

जर देशात असेल नरेंद्र मोदी यांची आंधी तर मला का मिळणार नाही मंत्री मंडळात संधी जर आमच्यावर कुणी केला अत्याचार, तर आम्ही करतो गावबंदी

तुम्हाला प्यायचा असेल, तर प्या आमचा चहा तुम्हाला नसेल प्यायचा, तर पेऊ नका आमचा चहा पण आमच्याकडे चांगल्या नजरेने पाहा

मी कधी बोललो नाही खोटं मला पँथरने केले मोठं माझ्या नावाने अनेक लोकांनी मोडली बोटं तरी पँथरने मला केलं मोठं मी कधीच कुणाची केली नाही चाकरी आय बहिणींनी दिली मला भाकरी

मला आवडायची नाशिकची चिकन करी म्हणून मी जायचो यांच्या घरी जय भीम चा बुलंद आवाज मी ऐकत होतो गाण्यात म्हणून मी चालत होतो पँथरच्या पाण्यात

आम्ही कुणाच्या विरोधात नाही पण एकदा आम्ही खवळलो, की कुणाच्या बापाला घाबरत नाही

रामदास आठवले यांनी नाशिकमध्ये म्हटलेली केलेली कविता सध्या प्रचंड चर्चेत आहे. सोशल मीडियावर ही कविता तुफ्फान व्हायरल होत आहे.

Follow Us
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला.
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?.
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?.
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप.
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?.
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले.
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा.
भोंदूबाबाकडे गेलेल्या मंत्र्यांना सहआरोपी करा, संजय राऊत यांची मागणी
भोंदूबाबाकडे गेलेल्या मंत्र्यांना सहआरोपी करा, संजय राऊत यांची मागणी.
रुपाली चाकणकर यांनी एक वर्षांपूर्वी खरातला वाचवले- रुपाली ठोंबरे पाटील
रुपाली चाकणकर यांनी एक वर्षांपूर्वी खरातला वाचवले- रुपाली ठोंबरे पाटील.
'चंद्रकांत पाटील यांचे खरात सोबत,'...काय म्हणाले रवींद्र धंगेकर ?
'चंद्रकांत पाटील यांचे खरात सोबत,'...काय म्हणाले रवींद्र धंगेकर ?.