AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंतप्रधान मोदी म्हणाले ‘जुन्या गोष्टी सुधारण्यात सात वर्षे गेली’, तर ‘तुम्ही नेमकं केलं काय?’ राष्ट्रवादीचा सवाल

हलद्वानी इथे पार पडलेल्या सभेत बोलताना 'माझं 7 वर्षाचं रेकॉर्ड तपासून पाहा, जुन्या गोष्टी सुधारण्यातच माझा वेळ जात आहे', असं पंतप्रधान मोदी म्हणाले होते. मोदींच्या याच वक्तव्याचा धागा पकडत आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) प्रश्न उपस्थित करण्यात आलाय.

पंतप्रधान मोदी म्हणाले 'जुन्या गोष्टी सुधारण्यात सात वर्षे गेली', तर 'तुम्ही नेमकं केलं काय?' राष्ट्रवादीचा सवाल
शरद पवार, पंतप्रधान नरेंद्र मोदी
| Edited By: | Updated on: Dec 31, 2021 | 5:49 PM
Share

मुंबई : उत्तराखंड दौऱ्यावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी काँग्रेसवर (Congress) जोरदार निशाणा साधला. हलद्वानी इथे पार पडलेल्या सभेत बोलताना ‘माझं 7 वर्षाचं रेकॉर्ड तपासून पाहा, जुन्या गोष्टी सुधारण्यातच माझा वेळ जात आहे’, असं पंतप्रधान मोदी म्हणाले होते. मोदींच्या याच वक्तव्याचा धागा पकडत आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) प्रश्न उपस्थित करण्यात आलाय. सात वर्षात पंतप्रधानांनी नक्की कोणत्या गोष्टीत सुधारणा केली? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसकडून ट्विटरद्वारे विचारण्यात आला आहे.

पंतप्रधान मोदी यांनी या काळात एकतर अनेक सरकारी कंपन्यांचे खासगीकरण केले वा आधीच्या योजनांचे नाव बदलून किंवा त्यात बदल करुन पुन्हा जनतेसमोर सादर केल्या. अनेक सरकारी कंपन्या विकण्याचा उपक्रम त्यांनी आखून ठेवलाय. भारतीय रेल्वेचे खासगीकरण कऱण्याचेही त्यांचे मनसुबे आहेत. भाजप विरोधात असताना त्यांनी आधार कार्डला विरोध केला. पुढे सत्तेत आल्यावर मागील सरकारने आखलेल्या रस्त्यावरच पावलं टाकत, आधारकार्डचा राजमार्ग स्वीकारून लोकांना आधारकार्ड बनवण्याची सक्ती केली. इतकेच नव्हे तर आधी जीएसटी प्रस्तावाला विरोध करून सत्तेत आल्यावर जीएसटी धोरण आणले, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसकडून लगावण्यात आला आहे.

‘मोदींनी कोणत्या जुन्या गोष्टी सुधारल्या?’

त्याचबरोबर ‘माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी देशाला आधुनिकतेची ओळख पटवून दिली. याच विचाराचा अवलंब करून डिजीटलायझेशनचा नारा मोदींनी दिला. अशा एक ना अनेक मागील सरकारच्या गोष्टीच पुढे नेत मोदी काम करत असताना कोणत्या जुन्या गोष्टी सुधारण्यात आल्या असा प्रश्न देशवासियांना पडला आहे’, अशी टीकाही राष्ट्रवादीच्या ट्विटर हँडलवरुन पंतप्रधान मोदींवर करण्यात आलीय.

इतर बातम्या : 

‘राजन तेली यांची मोठी मेहनत, खचू नका, जोमानं कामाला लागा ‘, देवेंद्र फडणवीसांचा सल्ला

Narayan Rane : ‘गड आला पण सिंह गेला’! राजन तेलींच्या पराभवाबाबत नारायण राणेंची प्रतिक्रिया काय?

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.