AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

EXCLUSIVE : मुख्यमंत्रिपदाबाबत घरात बसून वक्तव्य योग्य नाही, जयंत पाटील यांची रोखठोक मुलाखत

राष्ट्रवादीच्या कॉंग्रेसमध्ये विलीनिकरणाच्या वावड्या 22 वर्षापासून उठतात. ज्यावेळी राष्ट्रवादी पक्ष वाढायला सुरुवात होते, त्यावेळी काही नतद्रष्ट या वावड्या उठवतात, असं जयंत पाटील (NCP Jayant Patil) म्हणाले.

EXCLUSIVE : मुख्यमंत्रिपदाबाबत घरात बसून वक्तव्य योग्य नाही, जयंत पाटील यांची रोखठोक मुलाखत
जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
| Edited By: Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Jun 09, 2021 | 1:58 PM
Share

अक्षय कुडकेलवार, टीव्ही 9 मराठी, मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसला 10 जूनला 22 वर्ष पूर्ण होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (NCP Jayant Patil) यांनी टीव्ही 9 मराठीशी एक्स्क्लुझिव्ह संवाद साधला. 22 वर्षांचा काळ हा चढउतारांचा होता, महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवारांची नेहमीच महत्वाची भुमिका होती. 2024 पर्यंत राष्ट्रवादी पक्ष अधिक भक्कम होईल आणि जास्त लोक निवडून येतील, असं विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला. (NCP Jayant Patil Exclusive interview on NCP foundation day talks on Sharad Pawar, Maharashtra chief minister post, maha vikas aaghadi, shiv sena, BJP )

शरद पवारांचे जुने सहकारी त्यांच्या भागात प्रभावी होते म्हणून त्यांना प्रस्थापित म्हटले गेले, मात्र त्यातूनच आर आर पाटील यांच्यासारखे नेते पुढे आले, अशी आठवण त्यांनी यावेळी सांगितली.

मुख्यमंत्रिपदाबाबत घरात बसून वक्तव्य योग्य नाही

राष्ट्रवादी पक्ष येत्या विधानसभा निवडणुकीपर्यंत अधिक भक्कम होईल आणि जास्त लोक निवडून येतील, असं जयंत पाटील म्हणाले. त्यावेळी त्यांना मुख्यमंत्रिपदाबाबत प्रश्न विचारण्यात आला. कोणत्याही राजकीय पक्षाला मुख्यमंत्रिपदासारखं सर्वोच्च पदाची आस्था असणं साहजिक आहे. 2024 मध्ये राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री व्हावा अशी तुमच्या पक्षाची महत्वकांक्षा नाही का? असा प्रश्न जयंत पाटील यांना विचारण्यात आला. त्यावर जयंत पाटील म्हणाले, “घरात बसून कुठल्याही महत्वकांक्षा व्यक्त करणे योग्य नाही, जे पक्ष अधिक चांगला झाला, जनतेने साथ दिली तर त्या त्या वेळी योग्य निर्णय शरद पवार घेतील. आज पहिलं काम आहे पक्ष बलवान करणे. महाराष्ट्रातील नागरिकांना जे प्रश्न भेडसावत आहेत, ते सोडवणे, लोकांचं जीवनमान सुधारणं हे आमच्या पक्षाचं ध्येय आहे”

दुसऱ्या पक्षातील नेतेही शरद पवारांच्या प्रेमात

शरद पवारांच्या कार्यपद्धतीकडे सर्वच नेते आदराने बघतात, दुसऱ्या पक्षातील नेते सुद्धा शरद पवारांकडे आदराने बघतात. अनेक लोक या पक्षात येण्याची इच्छा बाळगतात, मात्र कोरोनामुळे अडचणी आल्या आहेत, असं जयंत पाटील म्हणाले. शरद पवार हे केंद्रात दहा वर्ष कृषीमंत्री होते. कृषीमंत्री कसा असावा आणि तो काय काय करु शकतो हे पवारसाहेबांनी दाखवून दिलं, असं जयंत पाटील यांनी सांगितलं.

शरद पवार यूपीए अध्यक्ष व्हावे का?

देशात फार कमी लोक आहेत ज्यांना देश चालवण्याचा अनुभव आहे त्यांच्यापैकी शरद पवार आहेत. यूपीएतील इतर पक्ष काय विचार करतात हे माहित नाही, मात्र त्यांचा कार्यकर्ता या नात्याने माझी हीच इच्छा आहे, असं जयंत पाटील यांनी नमूद केलं.

तीन पक्षांचं सरकार राहावं

आमचा मित्रपक्ष काँग्रेस होता, आहे आणि राहिल, मात्र आता एक नवीन मित्रपक्ष मिळाला आहे, भविष्यात देखील तीन पक्षाचे सरकार राहावे, अशी कमेंट त्यांनी महाविकास आघाडीवर केली.

सोडून गेलेले हळूहळू परत येतील

भाजपाने अडचणी केल्या म्हणून काही लोक राष्ट्रवादी सोडून गेले, काही दबावापोटी कुणी पक्ष सोडला असेल त्यांनी पक्षात यायला हरकत नाही. आम्हाला बेरजेचे राजकारण करायचे आहे, सोडून गेलेल्याविषयी आम्हाला आकस नाही. हळूहळू सर्वच नेते परत येतील, असा दावा जयंत पाटील यांनी केला.

राष्ट्रवादीच्या कॉंग्रेसमध्ये विलीनिकरणाच्या वावड्या 22 वर्षापासून उठतात. ज्यावेळी राष्ट्रवादी पक्ष वाढायला सुरुवात होते, त्यावेळी काही नतद्रष्ट या वावड्या उठवतात. तसंच पवार साहेबानंतर कोण हे नाव घेऊन पक्षात वितुष्ट निर्माण करायची गरज नाही, असंही ते म्हणाले.

मोदी – ठाकरे भेट

राजकारण करणाऱ्यांनी वैयक्तिक भेटीगाठी करु नये ही अपेक्षा चुकीची आहे. मात्र कुणाला कुठलाही निर्णय घेताना, बदलताना संपूर्ण समाजाला विश्वासात घ्यावे लागते, अशी प्रतिक्रिया जयंत पाटलांनी नरेंद्र मोदी-उद्धव ठाकरे भेटीवर दिली.

कॉंग्रेसची स्वबळावरची भाषा

जबाबदारी असते त्यावेळी संयमाने बोलावे लागते, कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास टिकावा म्हणून कदाचित ते बोलत असावे. एक सरकारमध्ये असताना अॅडव्हान्समध्ये भाष्य करणं मला योग्य वाटत ना, असं भाष्य त्यांनी काँग्रेसच्या स्वबळाच्या घोषणेवर केलं.

अंतर्गत कलह मी मॅनेज करत नाही, मॅनेज करण्याचा प्रयत्न केला की तो बाहेर येतो. मी सरळ वागतो, असं जयंत पाटील म्हणाले.

VIDEO : जयंत पाटील EXCLUSIVE 

(NCP Jayant Patil Exclusive interview on NCP foundation day talks on Sharad Pawar, Maharashtra chief minister post, maha vikas aaghadi, shiv sena, BJP )

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
Akhil Chitre : पाकिस्तानच्या बॉर्डरवर आलोय का? अखिल चित्रे पोलीस अधिकाऱ्यात जुंपली; आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं वातावरण तापलं!.

Akhil Chitre : पाकिस्तानच्या बॉर्डरवर आलोय का? अखिल चित्रे पोलीस अधिकाऱ्यात जुंपली; आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं वातावरण तापलं!

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ.

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ

दिल्लीच्या आंदोलनावेळी कॉकरोच जनता पार्टीचे इन्स्टाग्राम सस्पेंड, पुढच्या क्षणात रिकव्हर, नेमकं काय घडलं?.

दिल्लीच्या आंदोलनावेळी कॉकरोच जनता पार्टीचे इन्स्टाग्राम सस्पेंड, पुढच्या क्षणात रिकव्हर, नेमकं काय घडलं?

मोदींचा घातपात करण्याचा कट होता का? एकनाथ शिंदे यांचा राहुल गांधींना सवाल.

मोदींचा घातपात करण्याचा कट होता का? एकनाथ शिंदे यांचा राहुल गांधींना सवाल

ICC Ranking: वनडेत गिलचं अव्वल स्थान 1 गुणाने हुकलं, मालिका पराभव आणि इतक्या धावांमुळे नुकसान.

ICC Ranking: वनडेत गिलचं अव्वल स्थान 1 गुणाने हुकलं, मालिका पराभव आणि इतक्या धावांमुळे नुकसान

जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?.

जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?