AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘बंद मुठी लाख की खुल गई तो खाक की’, जितेंद्र आव्हाड यांचा अजित पवार यांना मोठा इशारा

"कुणी कुणी अग्रवालसाठी फोन केले होते? महाराष्ट्रातील लोकांना कळत आहे की, हे आरोप कोणावर आहेत. कुणी फोन केला असेल? जो माणूस उघडपणे सांगू शकतो मोक्कामधील आरोपीला सोडवलं. त्याच्यासाठी अग्रवाल ही किरकोळ गोष्ट आहे", असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

'बंद मुठी लाख की खुल गई तो खाक की', जितेंद्र आव्हाड यांचा अजित पवार यांना मोठा इशारा
जितेंद्र आव्हाड आणि अजित पवार
| Updated on: May 27, 2024 | 8:51 PM
Share

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा इशारा दिला आहे. विशेष म्हणजे पुणे अपघाताच्या घटनेवरुन जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांना सूचक इशारा दिला आहे. “अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्यात किती सख्य होतं हे सगळ्यांना माहिती आहे. पूर्वीचा इतिहास काढून संदर्भ काढून शरद पवार यांना निष्कारण वादात ओढलं जात आहे. जयंत पाटील, छगन भुजबळ, आर आर पाटलांबद्दल अजित पवारांचं काय मत होतं? अनेक वेळा खासगी चर्चेत बोलले आहात. नको त्या गोष्टी उकरून काढायला नको. त्या रस्त्याला जायची मला गरज मला वाटत नाही”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

“प्रफुल्ल पटेल दिल्लीत शरद पवार यांच्यासोबत चर्चा करायचे. 2004 साली काय घडलं हे प्रफुल्ल पटेलांना चांगलं माहिती आहे. शरद पवार यांच्यासोबत प्रफुल्ल पटेल चर्चा करायचे. ज्येष्ठ मंत्रिमंडळात असताना एकाला मुख्यमंत्रीपद देवून नाराजी पत्कारण सोपं होतं का? राष्ट्रवादी जन्मून त्यावेळी नुकतेच पाच वर्षे झाले होते. मुख्यमंत्री पदापर्यंत हा पक्ष नेवून ठेवला. जुने विषय काढून त्यांना दुर्गंधी परसवणं चांगलं नाही”, असं जितेंद्र आव्हाड अजित पवार गटाला उद्देशून म्हणाले.

जितेंद्र आव्हाड यांचा इशारा काय?

“अजित पवारांना गृहमंत्री या पदाबद्दल प्रचंड आकर्षण होतं. अजित पवारांना कशामुळे त्यांना या पदापासून लांब ठेवण्यात आलं मला माहिती नाही. अग्रवाल प्रकरण असो, पुण्यातील शरद मोहोळ हत्या असो, ते इंदापूरमधील हत्या असो, पुण्यात झालेलं असलेले गँगवाँर असो, आपण पुण्याचे पालकमंत्री असताना हे घडत असताना ते का बोलत नाहीत? अग्रवाल हे प्रकरण इतकं गंभीर आहे त्यांच्यावर ते बोलताना दिसत नाहीत”, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली.

“ब्रम्हा कंस्ट्रक्शनचे संबंध कोणाशी आहेत? राष्ट्रवादी काँग्रेसचं पुण्यातील ऑफीस विकत घेण्याचा दबाव टाकून काढून घेण्याचा प्रयत्न कोणामुळे कुठे आणि कसा झाला? अग्रवालचा कसा समावेश आणि सहभाग होता? आपल्या कुठल्या साथीदारांचे प्रयत्न होते? आपल्या साथीदारानं काय सांगितलं? किती रक्कम आणू देतो असं सांगितलं होतं? बंद मुठी लाख की खुल गई तो खाक की”, असा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांना दिला. “जे शांत झालं ते शांत राहू द्या. नको तिथे चिमटे काढण्याचा प्रयत्न करू नका. जे शांत झाले ते शांत राहू द्या ना”, असाही इशारा त्यांनी दिला.

आव्हाडांचा धनंजय मुंडेंवर निशाणा

“तुमचे लाडके मंत्री धनंजय मुंडे कुठे गेले का? यावर भाष्य केलं नाही. दुष्काळ परिस्थिती गंभीर असताना कृषीमंत्री गैरहजर कसा राहिला, हे विचारणं चुकीचं आहे का? दहा हजार टँकर सध्या विविध जिल्ह्यात आहेत. कृषीमंत्री विचारून गेले आहेत का? ते जिथे असतील तिथून महाराष्ट्रावर नजर ठेवून असतील? कृषीमंत्र्यांचं उत्तरदायित्व महाराष्ट्राशी आहे. तुमचे लाडके कुठे गेले कधी गेले माहिती नाही. धनंजय मुंडेंनी महाराष्ट्राशी लाड करावेत”, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली.

आव्हाडांचा सुनील तटकरे यांच्यावर निशाणा

यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी खासदार सुनील तटकरे यांच्यावरही टीका केली. “कोकण पट्यातील मुस्लिमांनी तुम्हाला दार बंद करून प्रवेश नाकारला, त्यांचा राग शरद पवारांवर काढता. शरद पवारांनी कुणाशी बैठक घेतली ते जाहीर करा. कर्नाटकच्या निवडणुकीत हेचं घडलं. उत्तर प्रदेशाच्या निवडणुकीतही हेच घडलं. मत दिली नाहीत ती पवारांमुळे दिली नाहीत हे बोलायला तुम्ही मोकळे. बस करा आता, पवार पुराण बंद करा. पंचपक्वानाच्या ताटावरूव बसून सह्या करत होते. आता पत्रावळीवर बसले आहात”, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली.

Follow Us
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.
शांतता सामर्थ्यवानांची असते; राऊतांना नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर
शांतता सामर्थ्यवानांची असते; राऊतांना नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर.
लोकसभेत विरोधकांचा गदारोळ, सभागृहात जोरदार घोषणाबाजी
लोकसभेत विरोधकांचा गदारोळ, सभागृहात जोरदार घोषणाबाजी.
युद्धामुळे संभाजीनगरमध्ये एलपीजी गॅस पुरवठ्यावर परिणाम
युद्धामुळे संभाजीनगरमध्ये एलपीजी गॅस पुरवठ्यावर परिणाम.
आता सोशल मीडियावर बदनामी करणं महागात पडणार
आता सोशल मीडियावर बदनामी करणं महागात पडणार.
इराण-इस्रायल युद्धाचा थेट महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना फटका
इराण-इस्रायल युद्धाचा थेट महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना फटका.
... म्हणून चर्चा टाळली जातेय; राहुल गांधींचे गंभीर आरोप
... म्हणून चर्चा टाळली जातेय; राहुल गांधींचे गंभीर आरोप.
मुंबईत व्यावसायिक एलपीजी गॅसचा तीव्र तुटवडा
मुंबईत व्यावसायिक एलपीजी गॅसचा तीव्र तुटवडा.
पुण्यात व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळेना; इस्राईल-इराण युद्धाचा परिणाम
पुण्यात व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळेना; इस्राईल-इराण युद्धाचा परिणाम.
जालन्यातील अवैध गर्भपात प्रकरणात दानवेंचे भाजपवर आरोप
जालन्यातील अवैध गर्भपात प्रकरणात दानवेंचे भाजपवर आरोप.