AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नारायण राणे यांना भाजपाने मुंबईची जबाबदारी का दिली? निलेश राणेंनी सांगितलं नेमकं कारण

भाजप नेते निलेश राणे यांनी अजित पवार यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे. संख्याबळ आहे तोपर्यंत सर्व ठिक आहे. असं अजित पवार म्हणाले होते.

नारायण राणे यांना भाजपाने मुंबईची जबाबदारी का दिली? निलेश राणेंनी सांगितलं नेमकं कारण
| Updated on: Oct 15, 2022 | 2:03 PM
Share

रत्नागिरी : भाजप (BJP) नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे. संख्याबळ आहे तोपर्यंत सर्व ठिक आहे. मात्र मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर खरी परिस्थिती समोर येईल. जीथपर्यंत संख्याबळ आहे तिथपर्यंतच हे सरकार टीकेल असं अजित पवार यांनी म्हटलं होतं. अजित पवारांवर निलेश राणे यांनी जोरदार निशाणा साधला आहे.

काय म्हणाले निलेश राणे?

महाविकास आघाडी सरकार देखील संख्याबळ होतं म्हणूनच टीकलं होतं, ते दुसऱ्या एखाद्या फॉर्म्युल्यावर नव्हतं. संख्याबळासाठीच सर्व एकत्र आले होते. अजित पवार हे विरोधी पक्षनेते आहेत. त्यामुळे त्यांना असं बिनपगारी बोलावं लागतं. मात्र अजित पवार का बोलतात? कशासाठी बोलतात हे आम्हाला चांगलं माहित आहे. त्यांचा प्रभाव सध्या राहिलेला नाही. त्यामुळे अधून-मधून आठवण करून देण्यासाठी ते बोलत असतात असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे.

‘मुंबई महापालिकेत भाजपाची सत्ता येईल’

दरम्यान आगामी निवडणुकांमध्ये मुंबईत ठाकरे गटाला रोखण्याची जबाबदारी भाजपाकडून नारायण राणे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. यावर देखील निलेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. साहेब हे आमदार होण्यापूर्वी  1985 ला चेंबूरमधून नगरसेवक म्हणून निवडून आले. साहेबांची सुरुवातच शाखाप्रमुख म्हणून मुंबईतून झाली.

ते 1990 ला आमदार झाले. मात्र त्यांनी कायम आपलं लक्ष मुंबईकडे ठेवलं. मुंबईमध्ये त्यांना माणणारा एक वेगळा वर्ग आहे. त्यामुळे पक्षाकडून त्यांना जी जबाबदारी सोपवण्यात आली आहे, ती ते पूर्व करतील. मुंबई महापालिकेवर भाजपाचा झेंडा फडकेल याची मला खात्री आहे, असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे.

Follow Us
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश.
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ....
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ.....
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक.
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली.
रिलायन्स इंडस्ट्रीची अमेरिकेत गुंतवणूक, संजय राऊत यांचा हल्लाबोल
रिलायन्स इंडस्ट्रीची अमेरिकेत गुंतवणूक, संजय राऊत यांचा हल्लाबोल.
व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा; हॉटेल व्यवसाय आणि उद्योग अडचणीत
व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा; हॉटेल व्यवसाय आणि उद्योग अडचणीत.
मिठी नदीच्या नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प उभारा, उद्घाटनाला...
मिठी नदीच्या नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प उभारा, उद्घाटनाला....
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू.
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.