AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नारायण राणे यांना भाजपाने मुंबईची जबाबदारी का दिली? निलेश राणेंनी सांगितलं नेमकं कारण

भाजप नेते निलेश राणे यांनी अजित पवार यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे. संख्याबळ आहे तोपर्यंत सर्व ठिक आहे. असं अजित पवार म्हणाले होते.

नारायण राणे यांना भाजपाने मुंबईची जबाबदारी का दिली? निलेश राणेंनी सांगितलं नेमकं कारण
| Updated on: Oct 15, 2022 | 2:03 PM
Share

रत्नागिरी : भाजप (BJP) नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे. संख्याबळ आहे तोपर्यंत सर्व ठिक आहे. मात्र मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर खरी परिस्थिती समोर येईल. जीथपर्यंत संख्याबळ आहे तिथपर्यंतच हे सरकार टीकेल असं अजित पवार यांनी म्हटलं होतं. अजित पवारांवर निलेश राणे यांनी जोरदार निशाणा साधला आहे.

काय म्हणाले निलेश राणे?

महाविकास आघाडी सरकार देखील संख्याबळ होतं म्हणूनच टीकलं होतं, ते दुसऱ्या एखाद्या फॉर्म्युल्यावर नव्हतं. संख्याबळासाठीच सर्व एकत्र आले होते. अजित पवार हे विरोधी पक्षनेते आहेत. त्यामुळे त्यांना असं बिनपगारी बोलावं लागतं. मात्र अजित पवार का बोलतात? कशासाठी बोलतात हे आम्हाला चांगलं माहित आहे. त्यांचा प्रभाव सध्या राहिलेला नाही. त्यामुळे अधून-मधून आठवण करून देण्यासाठी ते बोलत असतात असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे.

‘मुंबई महापालिकेत भाजपाची सत्ता येईल’

दरम्यान आगामी निवडणुकांमध्ये मुंबईत ठाकरे गटाला रोखण्याची जबाबदारी भाजपाकडून नारायण राणे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. यावर देखील निलेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. साहेब हे आमदार होण्यापूर्वी  1985 ला चेंबूरमधून नगरसेवक म्हणून निवडून आले. साहेबांची सुरुवातच शाखाप्रमुख म्हणून मुंबईतून झाली.

ते 1990 ला आमदार झाले. मात्र त्यांनी कायम आपलं लक्ष मुंबईकडे ठेवलं. मुंबईमध्ये त्यांना माणणारा एक वेगळा वर्ग आहे. त्यामुळे पक्षाकडून त्यांना जी जबाबदारी सोपवण्यात आली आहे, ती ते पूर्व करतील. मुंबई महापालिकेवर भाजपाचा झेंडा फडकेल याची मला खात्री आहे, असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे.

Follow Us
महागाईचा फटका! एलपीजी गॅसची किंमत वाढली, किंमत 3000 च्या पुढे...
महागाईचा फटका! एलपीजी गॅसची किंमत वाढली, किंमत 3000 च्या पुढे....
डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यूमागचे सत्य समोर, नेमकं काय घडलं?
डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यूमागचे सत्य समोर, नेमकं काय घडलं?.
8 वर्षांची प्रतीक्षा संपली, आजपासून मिसिंग लिंक सर्वसामान्यांसाठी खुला
8 वर्षांची प्रतीक्षा संपली, आजपासून मिसिंग लिंक सर्वसामान्यांसाठी खुला.
मुस्लिम लग्नपत्रिकेत छत्रपती शिवाजी महाराज-टिपू सुलतानचा उल्लेख?
मुस्लिम लग्नपत्रिकेत छत्रपती शिवाजी महाराज-टिपू सुलतानचा उल्लेख?.
मुख्यमंत्री फडणवीस- शिंदेंच्या हस्ते मिसिंग लिंकचं लोकार्पण
मुख्यमंत्री फडणवीस- शिंदेंच्या हस्ते मिसिंग लिंकचं लोकार्पण.
कोंढव्याला पाकिस्तान संबोधल्याप्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल
कोंढव्याला पाकिस्तान संबोधल्याप्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल.
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश; 1745 कोटींचा साठा....
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश; 1745 कोटींचा साठा.....
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा, सुळे अडकल्या....
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा, सुळे अडकल्या.....
मराठीचं नाव घेतल्यावर मिरच्या का झोंबतायत?, राऊतांचा फडणवीसांवर हल्ला
मराठीचं नाव घेतल्यावर मिरच्या का झोंबतायत?, राऊतांचा फडणवीसांवर हल्ला.
आता मुंबई-पुणे प्रवास सुसाट! अर्ध्या तासाची बचत, आज होणार मिसिंग लिंक
आता मुंबई-पुणे प्रवास सुसाट! अर्ध्या तासाची बचत, आज होणार मिसिंग लिंक.