AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नारायण राणे यांना भाजपाने मुंबईची जबाबदारी का दिली? निलेश राणेंनी सांगितलं नेमकं कारण

भाजप नेते निलेश राणे यांनी अजित पवार यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे. संख्याबळ आहे तोपर्यंत सर्व ठिक आहे. असं अजित पवार म्हणाले होते.

नारायण राणे यांना भाजपाने मुंबईची जबाबदारी का दिली? निलेश राणेंनी सांगितलं नेमकं कारण
| Updated on: Oct 15, 2022 | 2:03 PM
Share

रत्नागिरी : भाजप (BJP) नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे. संख्याबळ आहे तोपर्यंत सर्व ठिक आहे. मात्र मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर खरी परिस्थिती समोर येईल. जीथपर्यंत संख्याबळ आहे तिथपर्यंतच हे सरकार टीकेल असं अजित पवार यांनी म्हटलं होतं. अजित पवारांवर निलेश राणे यांनी जोरदार निशाणा साधला आहे.

काय म्हणाले निलेश राणे?

महाविकास आघाडी सरकार देखील संख्याबळ होतं म्हणूनच टीकलं होतं, ते दुसऱ्या एखाद्या फॉर्म्युल्यावर नव्हतं. संख्याबळासाठीच सर्व एकत्र आले होते. अजित पवार हे विरोधी पक्षनेते आहेत. त्यामुळे त्यांना असं बिनपगारी बोलावं लागतं. मात्र अजित पवार का बोलतात? कशासाठी बोलतात हे आम्हाला चांगलं माहित आहे. त्यांचा प्रभाव सध्या राहिलेला नाही. त्यामुळे अधून-मधून आठवण करून देण्यासाठी ते बोलत असतात असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे.

‘मुंबई महापालिकेत भाजपाची सत्ता येईल’

दरम्यान आगामी निवडणुकांमध्ये मुंबईत ठाकरे गटाला रोखण्याची जबाबदारी भाजपाकडून नारायण राणे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. यावर देखील निलेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. साहेब हे आमदार होण्यापूर्वी  1985 ला चेंबूरमधून नगरसेवक म्हणून निवडून आले. साहेबांची सुरुवातच शाखाप्रमुख म्हणून मुंबईतून झाली.

ते 1990 ला आमदार झाले. मात्र त्यांनी कायम आपलं लक्ष मुंबईकडे ठेवलं. मुंबईमध्ये त्यांना माणणारा एक वेगळा वर्ग आहे. त्यामुळे पक्षाकडून त्यांना जी जबाबदारी सोपवण्यात आली आहे, ती ते पूर्व करतील. मुंबई महापालिकेवर भाजपाचा झेंडा फडकेल याची मला खात्री आहे, असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे.

काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.